शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

अंधारलेल्या बरड वस्तीवर ३० वर्षांनंतर पोहोचला प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:05 IST

सिल्लोड : तालुक्यातील अनाड येथून जवळच तीस वर्षांपूर्वी बरड वस्ती वसली आहे. तेव्हापासून या वस्तीवर ना वीज होती, ना ...

सिल्लोड : तालुक्यातील अनाड येथून जवळच तीस वर्षांपूर्वी बरड वस्ती वसली आहे. तेव्हापासून या वस्तीवर ना वीज होती, ना पाणीपुरवठ्याची व्यवस्था. दैनिक लोकमतने यावर ५ जून रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. यानंतर तीस वर्षानंतर या वस्तीवर वीज पोहोचली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी रात्री अंधारातच स्वीच ऑन करुन येथे विजेचा शुभारंभ केला. यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

बरड वस्तीत गेल्या ३० वर्षांपासून केवळ अंधारच नव्हता, तर येथील नागरिकांना तेव्हापासून ना रेशन कार्ड आहे, ना पाणीपुरवठ्याच्या कोणत्याही सुविधा. तरीही बाराशे लोकवस्तीचे हे गाव अंधारातून आपला मार्ग शोधत होते. अनाड ग्रामपंचायतीने या गावाला कोणत्याही सुविधा न दिल्याने तसेच येथे कोणतेही विकास कामे न केल्याने हे गाव दुर्लक्षित होते. बरड वस्तीतील गजानन गदाई, मनीषा मानकर, संदीप मानकर, भटका जोशी समाजाचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू मुके, बाबासाहेब गोंडे या तरुणांनी वस्तीवरील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी शासन स्तरावर लढा देत होते. दैनिक लोकमतने या गावची व्यथा ५ जून २०२१ रोजी ‘ना वीज ना पाणी तरीही तेथे तीस वर्षांपासून मुक्कामी’ या मथळ्याखाली मांडली. यानंतर प्रशासन जागे झाले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली, व सोमवारी या गावात प्रथमच विजेचे आगमण झाले. राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री ८ वाजता अंधारातच स्वीच सुरु करताच प्रथमच बरड वस्ती लखलखून निघाली. यावेळी महावितरण मुख्य अभियंता भुजंगराव खंदारे, उप नगराध्यक्ष अब्दुल समीर, उपविभागिय अधिकारी ब्रिजेश पाटील, उपविभागिय पोलिस अधिकारी विजय मराठे, तहसिलदार विक्रम राजपूत, सोयगावचे तहसिलदार प्रविण पांडे, अशोक सूर्यवंशी, दुर्गाबाई पवार, नजीर अहेमद, दीपक अस्तुरे, विजय पगारे, संजय आकोडे उपस्थित होते.

चौकट

वस्तीतील सर्वांना मिळणार रेशन कार्ड

बरड वस्तीतील लोकांच्या नावाने नमुना नंबर ८ दिले जाईल जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच गावाला तात्काळ नवीन पाणी पुरवठा योजना दिली जाणार असून पाण्याच्या टाकीसाठी दहा लाख रुपये दिले जाईल. चार महिन्यांत गावात पाणी पोहोचविणार तसेच ज्यांना घरे नाहीत, त्यांच्यासाठी घरे मिळवून देण्यासाठी मदत केली जाईल. सर्वांना रेशन कार्ड दिले जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री सत्तार यांनी दिले. यावेळी २० लोकांना प्राथमिक स्वरुपात रेशनकार्ड देण्यात आले.

फोटो : बरड वस्ती येथे स्वीच ऑन करून विजेचा शुभारंभ करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आदी.

210621\img-20210621-wa0397_1.jpg

बरड वस्ती येथे स्वीच ऑन करुन विजेचा शुभारंभ करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आदी.