शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मतमोजणीच्या २७ फेऱ्याअंती ठरणार औरंगाबादचा खासदार; एक हजार कर्मचारी लागणार

By विकास राऊत | Updated: May 21, 2024 13:00 IST

१२ लाख ९९ हजार ४० मतदारांनी कुणाला कौल दिला आहे, यासाठी २७ फेऱ्याअंती मतमोजणी करून निकाल लागणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार, यावरून सट्टाबाजार गरम झालेला आहे. तसेच राजकीय वर्तुळात रोज नव्याने आकडेमोड होत आहेत. बूथनिहाय मतदानाच्या आकड्यांवरूनही राजकीय धुरीण आपलाच उमेदवार निवडून येणार असा दावा करीत आहेत, तर दुसरीकडे प्रशासन ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या तयारीला लागले आहे. १२ लाख ९९ हजार ४० मतदारांनी कुणाला कौल दिला आहे, यासाठी २७ फेऱ्याअंती मतमोजणी करून निकाल लागणार आहे. ४८ हजार ११२ मते प्रत्येकी एका फेरीत मोजली जाणार आहेत. साधारणत: दुपारनंतर चित्र स्पष्ट होईल. १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ४ जूनची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. बीडबायपास परिसरातील एमआयटी कॉलेजच्या आवारातील एका इमारतीत मतमोजणी होईल.

२०४० मतदान केंद्रांवरील बॅलेट युनिट येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले आहेत. मतमोजणीच्या दिवशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सकाळी ६ वा. रुजू व्हावे लागेल. सकाळी ७ वाजता गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर ८ वाजता पोस्टल मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर ८:३० वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल.

मतमोजणी प्रतिनिधी कसे येणार....उमेदवारांना मतमोजणी टेबलासाठी एक प्रतिनिधी नियुक्त करण्याची मर्यादा आहे. ३१ मे पर्यंत आवश्यक कार्यवाही करून ओळखपत्र संबंधितांना घेणे आवश्यक आहे. प्रतिनिधींना ओळखपत्र तसेच अर्जासोबत उमेदवारांनी नियुक्तीसाठी दिलेले पत्र सोबत बाळगावे लागेल. प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात सकाळी सात वाजेपर्यंतच प्रवेश मिळेल. त्यांना चैतन्य टेक्नो स्कूल येथून केंद्रात येण्यासाठी प्रवेशद्वार आहे. निवडणूक संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार, इतर माध्यम प्रतिनिधींना एमआयटी कॉलेजच्या फूड टेक्नॉलॉजी विभाग येथून केंद्रात जाता येईल. मत मोजणी केंद्रात मोबाइल नेण्यास मनाई आहे, तर माध्यम प्रतिनिधींना मीडिया सेंटरमध्ये मोबाइल नेता येईल. कर्मचारी व माध्यम प्रतिनिधींसाठी वाहन पार्किंग तेथेच असेल, असे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी सांगितले.

काय असेल मतमोजणी केंद्रावरविधानसभानिहाय १४ टेबलविधानसभानिहाय पोस्टलसाठी १० टेबलमतमोजणीसाठी १ हजारहून अधिक अधिकारी, कर्मचारीपहिले रॅण्डमायझेशन २७ मे रोजी२८ मे रोजी मतमोजणीचे प्रशिक्षण४ जून रोजी मतमोजणी केंद्रात शेवटचे प्रशिक्षण

सीसीटीव्हीच्या निगराणीत बॅलेट युनिट...मतदान यंत्रे एमआयटी कॉलेज परिसरातील एका इमारतीतील स्ट्रॉंग रूममध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलिस बल, राज्य राखीव पोलिस बल व राज्य पोलिस दलाचे अधिकारी व जवान अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत आहे.-देवेंद्र कटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

किती फेऱ्या होणार...कन्नड २६ फेऱ्या : २ लाख १७ हजार ८९औरंगाबाद मध्य २३ फेऱ्या : २ लाख ११ हजार ५००औरंगाबाद पश्चिम २७ फेऱ्या : २ लाख ३५ हजार ७८४औरंगाबाद पूर्व २२ फेऱ्या : २ लाख ६ हजार ६३३ मतदानगंगापूर २५ फेऱ्या : २ लाख २७ हजार १५२वैजापूर २५ फेऱ्या : २ लाख ८८२एकूण : १२ लाख ९९ हजार ४०

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४