शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
5
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
6
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
7
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
8
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
9
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
10
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
11
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
12
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
13
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
14
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
15
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
16
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
17
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती
18
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
19
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
20
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला

१९ वर्षानंतर कळंबमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा

By admin | Updated: October 23, 2014 00:15 IST

बालाजी आडसूळ , कळंब उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील राणाजगजितसिंह पाटील यांचा विजय अनेक अर्थाने महत्वपूर्ण आहे.

बालाजी आडसूळ , कळंबउस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील राणाजगजितसिंह पाटील यांचा विजय अनेक अर्थाने महत्वपूर्ण आहे. राष्ट्रवादीच्या या विजयाने राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर एक प्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. परंडा, उमरगा या मतदारसंघातून शिवसेना आणि राष्ट्रवादीने आजवर आलटून-पालटून यश मिळविले आहे. मात्र कळंबमध्ये ‘कळंब तालुका म्हणजेच सेना’ असे समीकरण निर्माण झाले होते.१९ वर्षानंतर हे चक्र भेदण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरली आहे.१९९५ आणि १९९९ अशी दहा वर्षे येथून सेनेच्या कल्पनाताई नरहिरे यांनी प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर २००४ साली सेनेचेच दयानंद गायकवाड निवडून आले. त्यानंतर २००९ मध्ये ओम राजेनिंबाळकर यांनी येथे सेनेचा भगवा फडकाविला होता. म्हणजेच मागील १९ वर्षापासून कळंब तालुक्यावर शिवसेनेचे वर्चस्व होते. पक्षश्रेष्ठींनी उमेदवार जाहीर केला की त्याला निवडून आणण्याची केवळ औपचारिकताच शिल्लक राहायची. मात्र यावेळी हे समीकरण राष्ट्रवादीने मोडित काढले. मागील पाच वर्षात राखलेला दांडगा जनसंपर्क आणि विकास कामांसाठीचा पाठपुरावा यामुळेच हे यश मिळाले.तालुक्यातील ५५ गावामधून वरचढ ठरत राष्ट्रवादी काँग्रेसला येथून सहा हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. भाजपाची व्होट बँक असलेल्या गावात संजय पाटील दूधगावकर यांची निराशा झाली असली तरीही त्यांना १३ हजार मते या तालुक्यातून मिळाली आहेत. तर अर्धे मतदान असलेल्या वीस पेक्षा जास्त मोठ्या गावात सेनेची पिछाडी झाली असून, शहरी आणि ग्रामिण अशा सर्वच भागातून राष्ट्रवादीला पाठींबा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रचारादरम्यान गावागावत चुरस होती. त्यामुळे निकालानंतर गावपातळीवरील अनेक कार्यकर्त्यांचे कर्तृत्वही उघड झाले आहे. कळंब शहरातील १८८४४ मतदारापैकी १०९४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. न.प.मध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याने याकडे कोण सरस होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले होेते. शहरातही प्रमुख उमेदवारांनी चांगलीच ताकद पणाला लावली होती. परंतु कळंबमध्ये राकॉला सर्वाधिक ४४७६ त्याखालोखाल, सेनेला ३२१०, भाजपला १८९१ तर काँग्रेसला ४६२ मते मिळाली. अत्यंत प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या शहरात राकाँला साडेबाराशे मतांची निर्णायक आघाडी मिळाली. याठिकाणी शिवसेनेचे गणित मतदारांनी बिघडवून टाकले तर आपली आहे ती संघटनशक्ती पूर्ण क्षमतेने वापरून राकाँने कळंबमध्ये मताधिक्य मिळविले आहे.