शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सचिन तेंडुलकरने उस्मानाबादमधील गाव घेतलं दत्तक

By admin | Updated: August 18, 2016 12:38 IST

खासदार सचिन तेंडुलकरने सासंद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत उस्मानाबादमधील डोंजा गाव घेतलं आहे, त्यामुळे डोंजा ग्रामस्थांच्या आशा उंचावल्या आहेत.

परंडा, दि. 18 - साधारणपणे पाच हजार लोकसंख्या असलेल्या डोंजा या गावाचे येणाऱ्या काळात रूपडे बदलणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. एकेकाळी आपल्या धडाकेबाज खेळीने क्रिकेटचे मैदान गाजविलेल्या खासदार सचिन तेंडुलकरने सासंद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत हे गाव दत्तक घेतले आहे. त्यामुळे डोंजा ग्रामस्थांच्या आशा उंचावल्या आहेत.

केंद्र शासनाच्या वतीने सांसद आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात आली आहे. सदरील योजनेअंतर्गत खासदारांनी एकेक गाव दत्तक घेवून संबंधित गावाचा चौफेर विकास करणे अपेक्षित आहे. सदरील योजनेअंर्तत क्रिकेटचा देव आणि सध्या खासदार असलेल्या सचिन तेंडुलकर यांनी यापूर्वी म्हणजेच पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील गाव दत्तक घेतले होते. आंध्र प्रदेशातील गाव दत्तक घेतल्याने अनेकांनी टीका करून महाराष्ट्रातील गाव दत्तक घेण्याबाबत सूचित केले होते.

त्यानुसार साधारणपणे दोन ते सव्वादोन महिन्यांपूर्वी क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले, सामाजिक कार्यकर्ते अविनाश फाळके, प्रा. मिलिंद बागल यांनी डोंजा या गावामध्ये येऊन पाहणी केली होती. येथील ग्रामस्थांना भेडसाविणाऱ्या प्रश्नांचा त्यांनी आढावा घेतला होता. सदरील अहवाल सादर झाल्यानंतर सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत विकासापासून कोसोदूर असलेले हे डोंजा गाव दत्तक घेत असल्याबाबत पंचायत राज समितीच्या सचिवांना कळविले आहे. दरम्यान, खा. सचिन तेंडुलकर यांनी डोंजा गाव दत्तक घेतल्याचे जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार गावाचा विकास आराखडा संबंधित अधिकाऱ्यांकडून तयार करून घेण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात गावाचा कार्यापालट होणार आहे.

गावासाठी राबविण्यात आलेली पाणीपुरवठा योजना खूप जुनी झाली आहे. ग्रामस्थांनी सांगितल्यानुसार ही योजना राबवून किमान पन्नास वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे सातत्याने तांत्रिक अडचणी उद्भवतात. गावाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यासोबतच पाणी साठविण्यासाठी आवश्यकतेनुसार टाकीही उभारावी लागणार आहे. ४गावातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्नही अत्यंत गंभीर आहे. पावसाळ्यामध्ये ग्रामस्थांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते.

त्यामुळे गावामध्ये सिमेंट रस्त्याची कामे युद्धपातळीवर होणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये सार्वजनिक शौचालयांचीही आवश्यकता आहे. महिला, पुरूषांसाठी सार्वजनिक शौचालये उभारल्यास गाव हागणदारीमुक्त होण्यास मदत होईल.४रेणुका देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्थाही फारशी चांगली नाही. विशेष म्हणजे याच रस्त्यावर भाविकांसह ग्रामस्थांचीही सातत्याने वर्दळ असते. त्यामुळे सदरील रस्त्याचे डांबरीकरण करणेही तितकेचे गरजेचे आहे. गावातील वृक्षांची संख्या लक्षात घेता येणाऱ्या काळात वृक्षलागवडीवर अधिकाअधिक भर देणेही आवश्यक आहे.

खासदार सचिन तेंडूलकर यांनी डोंजा हे गाव दत्तक घेतल्यामुळे विकासपासून कोसोदूर असणाऱ्या या गावाचे आता रूपडे बदलणार आहे. ग्रामस्थांना भेडसाविणाऱ्या प्रश्नांची या निमित्ताने सोडवणूक तर होईलच. परंतु, इतर आवश्यक सोयीसुविधांमध्येही भर पडले, असा विश्वास डोंजा ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्या सूर्यवंशी यांनी सांगितले.