शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेसाठी विद्यार्थी उशिरा आला तर प्रवेश नाकारला; पेपरच उशिरा आला त्याचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 13:29 IST

पेपरची गाडी घेऊन येणारे चालक केंद्र शोधत राहिले, ३ वाजेचा पेपर आला साडेचारला झाला

ठळक मुद्देआरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ, संपूर्ण परीक्षाच संशयाच्या भोवऱ्यात आहे.कुठे चालक जेवायला थांबला, तर कोणी ‘जीपीएस’मुळे गोलगोल फिरत राहिला

औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यभरात रविवारी गट-क संवर्गातील पदांच्या भरतीसाठी सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात लेखी परीक्षा घेण्यात आली. औरंगाबादेत या परीक्षेत एकच गोंधळ पहायला मिळाला. दुपारच्या सत्रातील पेपर चक्क परीक्षा केंद्रांवर ३ ऐवजी तब्बल दीड तास उशिराने साडेचार वाजता पोहोचला. कारण पेपर घेऊन येणाऱ्या वाहनाचा चालक कुठे जेवायला थांबला; तर कोणाची गाडी ‘जीपीएस’मुळे शहरातच गोल फिरत राहिली. या सगळ्याचा परीक्षार्थींना नाहक मनस्ताप सहन करावा लागता. तर थोडा वेळ उशीर झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला प्रवेश नाकारण्यात आला. याविषयी एकच संताप व्यक्त केला.

शहरातील संत मीरा विद्यालय येथील केंद्रावर दुपारच्या सत्रातील परीक्षेसाठी परीक्षार्थी दीड वाजताच पोहोचले होते. दुपारी ३ ते ५ या वेळेत परीक्षा होणार होती. परंतु याठिकाणी दुपारी ४.२५ वाजता पुण्याहून पेपर घेऊन गाडी दाखल झाली. यावेळी पालकांनी चालकाला उशिरा येण्याचे कारण विचारले तेव्हा जेवण करण्यासाठी थांबल्याचे त्याने सांगितले. सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या केंद्रावरही दुपारी ३ वाजेऐवजी ४ वाजता पेपर आला. यासंदर्भात पालकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. असाच प्रकार अन्य केंद्रांवरही झाला. जवळपास तीन तास विद्यार्थी पेपरच्या परीक्षेत ताटकळले.

खाजगी टॅक्सींचा वापर, फक्त चालकचपरीक्षा केंद्रांवर खाजगी टॅक्सींद्वारे पेपर पोहोचविण्यात आले. त्यावर केवळ चालक होते. आरोग्य विभागाचे कर्मचारी अथवा अन्य कोणी देखरेखीसाठी कोणीही नव्हते. जेवणासाठी चालकाने गाडी थांबवली होती. संपूर्ण परीक्षाच संशयाच्या भोवऱ्यात आहे. यासंदर्भात योग्य ती कारवाई झाली पाहिजे, असे पालक सतीश शिंदे म्हणाले.

थर्मल गनऐवजी मेटल डिटेक्टरने तपासणीकोरोनामुळे सर्वत्र थर्मल गनने तपासणी केली जात आहे. परंतु अनेक परीक्षा केंद्रांवर चक्क मेटल डिटेक्टरने तपासणी करण्यात आली. मोबाईल आहे की नाही, हे पाहण्यासाठी अशी तपासणी केली गेली.

दोन मिनिटांसाठी परीक्षेची संधी हुकलीसरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या केंद्रांवर सकाळच्या सत्रात पवन गीते, पंकज राजपूत, संजय गायकवाड या परीक्षार्थींना उशिरा आल्याचे म्हणत प्रवेश नाकारण्यात आला. पवन गीते म्हणाला, बुलढाणा येथून आलाे. सकाळी ९.३५ वाजेपर्यंत येणाऱ्यांना प्रवेश दिला. मी ९.३७ वाजता आलो. परिसरात दोन ते तीन गेट आहे. त्यामुळे केंद्र शोधण्यात वेळ गेला. सदर विद्यार्थी ९.५० वाजता आल्याचे केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

आरोग्य विभाग म्हणाले...सदर परीक्षा ही आऊटसोर्सिंगद्वारे घेण्यात आली आहे. पेपर उशिरा आले. त्यामुळे परीक्षार्थींना वेळ वाढवून दिली हाेती, असे आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्निल लाळे यांनी सांगितले. तर आऊटसोर्सिंगच्या अधिकाऱ्यांनी केंद्रावर पेपर पोहोचल्याचे सांगत अधिक बोलण्याचे टाळले.

टॅग्स :examपरीक्षाAurangabadऔरंगाबाद