शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

औरंगाबादमध्ये पाणी पुरवठा वगळता स्मार्ट सिटीतील सर्व उपक्रम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 15:36 IST

पाणीपुरवठा वगळता स्मार्ट सिटीतील सर्व उपक्रम पूर्ण करण्याचा महापालिकेने, तर पर्यटनवृद्धीसह स्वयंरोजगार वाढीसाठी प्रयत्न करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी संयुक्तरीत्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देपाणीपुरवठा वगळता स्मार्ट सिटीतील सर्व उपक्रम पूर्ण करण्याचा महापालिके निर्धार पर्यटनवृद्धीसह स्वयंरोजगार वाढीसाठी जिल्हा प्रशासनाचा संकल्प

औरंगाबाद : पाणीपुरवठा वगळता स्मार्ट सिटीतील सर्व उपक्रम पूर्ण करण्याचा महापालिकेने, तर पर्यटनवृद्धीसह स्वयंरोजगार वाढीसाठी प्रयत्न करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी संयुक्तरीत्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन २०१८ या वर्षात करण्यात येणार्‍या संकल्पित विकास कामांची माहिती माध्यमांना देण्याच्या सूचना केल्या होत्या. शहराला पाणीपुरवठाच होत नाही, तर शहर कसे स्मार्ट होणार, यावर आयुक्त मुगळीकर म्हणाले, समांतरचे प्रकरण कोर्टात आहे. त्यातील अडचणी दूर होतील, योजना सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला; परंतु मनपाकडे स्वतंत्र काय व्यवस्था आहे, हे त्यांनी सांगितले नाही. शहराची गरज २२५ एमएलडी असून, १२५ एमएलडी पाणी येते. दोन्ही जलवाहिन्या जीर्ण झाल्याचे त्यांनी नमूद केले. 

महापालिकेचा संकल्प असाआयुक्त मुगळीकर म्हणाले, स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. २६ जानेवारीला सोलर सिस्टिमचे उद्घाटन होईल. १४८ कोटींचा एकात्मिक कार्यक्रम सुरू होईल. २ हजार सीसीटीव्ही कॅमेरे, स्मार्ट बसस्टॉप, ११७८ वायफाय स्पॉट हे सर्व ९ महिन्यांत पूर्णत्वास जाईल. क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन स्मार्ट रोडवर सायकल ट्रॅक, हर्सूल तलाव परिसरात सायकल ट्रॅक केला जाईल. १५० सिटीबस घेण्यात येतील. ५५ हजार एलईडी बल्ब बसविण्यात येतील. इलेक्ट्रिक रिक्षा कचरा संकलनासाठी येतील. ५ इलेक्ट्रिक बससह १५० कोटींचे रस्ते केले जातील. भूमिगत गटार योजनेचे काम झाले आहे. नारेगाव कचरा डेपो कचरामुक्त करण्यात येईल. 

जिल्हा प्रशासनाचा संकल्पपाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येईल. मुद्रा योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. ४५८ कोटी रुपयांचा पर्यटन आराखडा अंतिम करून पर्यटनस्थळांचा विकास केला जाईल. घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास, गतिमान प्रशासन, प्लास्टिकमुक्त औरंगाबाद, स्वच्छ भारत अभियानावर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केला. पर्यटनवृद्धीला प्राधान्य असेल. मार्च अखेरपर्यंत आराखडा मंजूर केला जाईल. समृद्धी महामार्ग भूसंपादन, आॅनलाईन फेरफार, मुद्रा योजनेकडे लक्ष देण्याचेही त्यांनी नमूद केले. शेततळे, गाळ काढणे, शेतकरी कर्जमुक्ती या विषयांवरही त्यांनी प्रकाश टाकला. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद