शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

औरंगाबादमध्ये पाणी पुरवठा वगळता स्मार्ट सिटीतील सर्व उपक्रम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 15:36 IST

पाणीपुरवठा वगळता स्मार्ट सिटीतील सर्व उपक्रम पूर्ण करण्याचा महापालिकेने, तर पर्यटनवृद्धीसह स्वयंरोजगार वाढीसाठी प्रयत्न करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी संयुक्तरीत्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देपाणीपुरवठा वगळता स्मार्ट सिटीतील सर्व उपक्रम पूर्ण करण्याचा महापालिके निर्धार पर्यटनवृद्धीसह स्वयंरोजगार वाढीसाठी जिल्हा प्रशासनाचा संकल्प

औरंगाबाद : पाणीपुरवठा वगळता स्मार्ट सिटीतील सर्व उपक्रम पूर्ण करण्याचा महापालिकेने, तर पर्यटनवृद्धीसह स्वयंरोजगार वाढीसाठी प्रयत्न करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी संयुक्तरीत्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन २०१८ या वर्षात करण्यात येणार्‍या संकल्पित विकास कामांची माहिती माध्यमांना देण्याच्या सूचना केल्या होत्या. शहराला पाणीपुरवठाच होत नाही, तर शहर कसे स्मार्ट होणार, यावर आयुक्त मुगळीकर म्हणाले, समांतरचे प्रकरण कोर्टात आहे. त्यातील अडचणी दूर होतील, योजना सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला; परंतु मनपाकडे स्वतंत्र काय व्यवस्था आहे, हे त्यांनी सांगितले नाही. शहराची गरज २२५ एमएलडी असून, १२५ एमएलडी पाणी येते. दोन्ही जलवाहिन्या जीर्ण झाल्याचे त्यांनी नमूद केले. 

महापालिकेचा संकल्प असाआयुक्त मुगळीकर म्हणाले, स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. २६ जानेवारीला सोलर सिस्टिमचे उद्घाटन होईल. १४८ कोटींचा एकात्मिक कार्यक्रम सुरू होईल. २ हजार सीसीटीव्ही कॅमेरे, स्मार्ट बसस्टॉप, ११७८ वायफाय स्पॉट हे सर्व ९ महिन्यांत पूर्णत्वास जाईल. क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन स्मार्ट रोडवर सायकल ट्रॅक, हर्सूल तलाव परिसरात सायकल ट्रॅक केला जाईल. १५० सिटीबस घेण्यात येतील. ५५ हजार एलईडी बल्ब बसविण्यात येतील. इलेक्ट्रिक रिक्षा कचरा संकलनासाठी येतील. ५ इलेक्ट्रिक बससह १५० कोटींचे रस्ते केले जातील. भूमिगत गटार योजनेचे काम झाले आहे. नारेगाव कचरा डेपो कचरामुक्त करण्यात येईल. 

जिल्हा प्रशासनाचा संकल्पपाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येईल. मुद्रा योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. ४५८ कोटी रुपयांचा पर्यटन आराखडा अंतिम करून पर्यटनस्थळांचा विकास केला जाईल. घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास, गतिमान प्रशासन, प्लास्टिकमुक्त औरंगाबाद, स्वच्छ भारत अभियानावर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केला. पर्यटनवृद्धीला प्राधान्य असेल. मार्च अखेरपर्यंत आराखडा मंजूर केला जाईल. समृद्धी महामार्ग भूसंपादन, आॅनलाईन फेरफार, मुद्रा योजनेकडे लक्ष देण्याचेही त्यांनी नमूद केले. शेततळे, गाळ काढणे, शेतकरी कर्जमुक्ती या विषयांवरही त्यांनी प्रकाश टाकला. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद