शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

जीवनोन्नती योजनेला प्रशासनाचा कोलदांडा

By admin | Updated: October 31, 2014 00:34 IST

उस्मानाबाद : महिला बचत गटांसाठी शासनाने राबविलेल्या ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ योजनेला खीळ बसविण्याचे काम बँकांकडून होत असल्याचे दिसत आहे़

उस्मानाबाद : महिला बचत गटांसाठी शासनाने राबविलेल्या ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ योजनेला खीळ बसविण्याचे काम बँकांकडून होत असल्याचे दिसत आहे़ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला आॅक्टोबर २०१४ अखेरपर्यंत १५३६ गटांचे उद्दीष्ठ दिलेले असताना केवळ ३९७ गटांचे प्रस्ताव बँकांकडे पाठविण्यात आले आहेत़ तर बँकांनी यातील १३९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असली तरी प्रत्यक्ष मात्र केवळ ३८ गटांना कर्जवाटप करण्यात आले आहे़ एकूणच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व बँकेच्या अधिकाऱ्यांनी ‘जीवनोन्नती’ला खीळ बसविण्याचे काम केल्याचे चित्र दिसत आहे़महिला बचत गटाच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागातील महिलांना मोठे रोजगार उपलब्ध होत आहेत़ मात्र, अनेक बचत गटांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने या गटांना बँकेमार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ योजना अंमलात आणली आहे़ याबाबत २७ जून २०१३ रोजी परिपत्रक काढले आहे़ यात राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत संलग्न स्वयंसहाय्यता गट, महिलांचे एकजीनसी गट - सर्वसाधारणत: १० ते १५ महिलांचा स्वयंसहाय्यता गट, वयोवृध्द , अपंग, तृतीयपंथी तसेच अस्वच्छ व्यवसायातील महिला व पुरुषांच्या गटांचा यात समावेश करण्यात आला आहे. फिरता निधी ३ ते ६ महिने पंचसुत्राप्रमाणे कार्यरत गटांना १० ते १५ हजार, भांडवली अनुदानाऐवजी समुदाय गुंतवणूक निधी देण्यात येणार आहे़ या अभियानांंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला जिल्ह्यात १ हजार ५३६ महिला बचतगटांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट होते. जिल्ह्यातील ३९७ महिला बचतगटांचे प्रस्ताव अर्थसहाय्य करण्यासाठी विविध बँकेकडे सादर करण्यात आले होते. यात विविध बँकानी १३९ महिला बचतगटाचे कर्जाचे प्रस्ताव मंजूर केले, मात्र ३८ महिला बचतगटांना बँकानी अर्थसहाय्य वाटप केले, तर २७७ महिला बचत गटाचे प्रस्ताव अद्यापही विविध बँकेकडे प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे अर्थसहाय्य देण्यासाठी काही बँकाना उद्दिष्ट देण्यात आले होते. एकाही बँकानी उद्दिष्ट पुर्ण केले नसल्याची माहिती समोर आली आहे.एस.बी.एच तीन बचतगटांना अर्थसहाय्य वाटप केले, ८१ प्रस्ताव या बँकेकडे प्रलंबित आहेत. एम.जी.बी. बँकेने २० जणांना वाटप तर १०८ प्रलंबित, बी.ओ.एम बँकेने सात जणांना अर्थसहाय्य दिले तर ३२ प्रलंबित, एस.बी.आय ने आठ बचतगटांना अर्थसहाय्य वाटप ४७ प्रलंबित, बी.ओ.आय बँकेकडे दोन प्रस्ताव सादर केले होते हे दोन्ही प्रस्ताव अद्याप बँकेकडे प्रलंबित आहेत.युनियन बँकेकडे महिला बचत गटाचे पंधरा प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यातील १२ प्रस्तावांना मंजुरी दिली तर प्रत्यक्षात मात्र एकाही बचत गटाला अर्थसहाय्य मिळाले नाही तर तीन प्रस्ताव बँकेकडे प्रलंबित आहेत. तर अलहाबाद बँकेकडे सादर करण्यात आलेले चारही प्रस्ताव प्रलंबीत आहेत़ अन्य काही बँकाना उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने संबधित बँकेकडे प्रस्ताव सादर केले नसल्याचे दिसून येत आहे़ (प्रतिनिधी)