शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

५० वॅगनमधील पाणी उतरवून घेण्यासाठी प्रशासनाची तयारी अपूर्णच

By admin | Updated: April 16, 2016 00:11 IST

लातूर : मिरजेहून लातूरला रेल्वेद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी अद्याप ५० वॅगनमधील पाणी उतरविण्याची क्षमता स्थानिक पातळीवर निर्माण झाली नाही.

३ पैकी १ किलोमीटर खोदकाम : पाईपलाईनसाठी शासनाकडून पाईपचा पुरवठा नाही; १२ पंप बसणार...लातूर : मिरजेहून लातूरला रेल्वेद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी अद्याप ५० वॅगनमधील पाणी उतरविण्याची क्षमता स्थानिक पातळीवर निर्माण झाली नाही. त्यामुळे सध्या तरी जलपरी १० वॅगनच पाणी घेऊन येत आहे. आतापर्यंत या जलपरीची चौथी खेप शुक्रवारी पूर्ण झाली. रेल्वेस्थानक ते आर्वी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईनचे काम सुरू असून, या कामाला किमान आठ दिवसांचा अवधी लागणार आहे. सद्य:स्थितीत तीनपैकी एक किलोमीटरचे खोदकाम झाले असून, राज्य शासनाकडून पाईपलाईनसाठी पाईपचा पुरवठा झालेला नाही.रेल्वेस्थानकातील ट्रॅकच्या बाजूने एस.आर. देशमुख यांच्या शेतातील विहिरीपर्यंत ५०० एमएमआरसी पाईप टाकण्यात आली असून, देशमुखांची विहीर ते टँकर पॉर्इंटपर्यंत ३.५ एचडी पाईप टाकल्या आहेत. यातून सध्या रेल्वेने आलेले पाणी उचलले जात आहे. मात्र विहिरीवर बारा पंप बसविणे तसेच विहीर ते आर्वी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या तीन किलोमीटर पाईपलाईनचे केवळ खोदकाम सुरू आहे. ४० इंची पाईपलाईन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत टाकली जाणार आहे. हे अंतर तीन किलोमीटरचे आहे. त्यापैकी एक किलोमीटरपर्यंत खोदकाम झाले आहे. प्रगती कन्स्ट्रक्शनमार्फत खोदकाम युद्धपातळीवर सुरू असले तरी पाईपचा पुरवठा शासनाकडून झाला नसल्यामुळे लाईन जोडणी थांबलेली आहे. गुत्तेदारामार्फत मात्र विद्युतपंप आले असून, उद्यापर्यंत विहिरीवर १२ पैकी १० पंप बसणार आहेत. शासनाकडून पाईप पुरवठा होण्याची प्रतीक्षा प्रगती कन्स्ट्रक्शनला आहे. एका पंपाची ४० हजार लिटर प्रती तास पाणी उपसण्याची क्षमता आहे. असे एकूण दहा पंप बसणार आहेत. या दहा पंपाद्वारे ४ लाख ५० हजार लिटर पाणी एका तासात विहिरीतून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत उपसले जाईल. ५० वॅगनमधील २७ लाख लिटर पाणी १० पंपाद्वारे सहा तासांत खाली करण्याची क्षमता या यंत्रणेत आहे. परंतु, खोदकाम आणि पाईपलाईनचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पंप बसविण्यापासून पाईपलाईन करण्याच्या प्रक्रियेला किमान आठ दिवसांचा अवधी लागेल, अशी शक्यता कन्स्ट्रक्शनमार्फत व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)साडेतीन कोटींची पाईपलाईन...रेल्वे ट्रॅकच्या बाजूने विहिरीपर्यंत ५०० एमएमआरसीसी पाईप आणि ३.५ एचडीपी पाईप बसविण्याचे काम ४८ तासांत पूर्ण झाले. हे रेकॉर्डब्रेक काम असून, विहीर ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या पाईपलाईनच्या कामाला मात्र पाईपचा पुरवठा झाला नसल्यामुळे थोडा व्यत्यय आला आहे. या सर्व कामासाठी ३ कोटी ६३ लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. ५० वॅगनमधील २५ लाख लिटर पाणी उतरवून घेण्याची क्षमता ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याशिवाय निर्माण होणार नसल्याचे सध्या दिसत आहे. आज पंप बसणार... ट्रॅकलगत आणि विहिरीपर्यंतची पाईपलाईन पूर्ण झालेली आहे. विहिरीवर एकूण १२ पंप बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी दहा पंपाद्वारे पाणी उपसण्यात येईल. शासनाकडून पाईपचा पुरवठा होणे बाकी आहे. पाईप आल्याबरोबर दोन दिवसांत पाईपलाईनचे काम पूर्ण होईल. ट्रॅकलगतचे काम आम्ही ४८ तासांत पूर्ण केले. त्याच धर्तीवर उर्वरित कामही करण्यात येत असल्याचे प्रगती कन्स्ट्रक्शनचे संचालक गोविंदराव माकणे यांनी सांगितले.