शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

हिमायत बागेतील सर्व रस्ते प्रशासनाने खोदले, काटे टाकले; फिरण्यास आलेल्या नागरिकांचा संताप

By मुजीब देवणीकर | Updated: May 20, 2024 15:57 IST

हिमायत बागेतील रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना पायी चालणेही अशक्य झाले आहे

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक वनसंपदा लाभलेल्या हिमायत बागेत दररोज सकाळी आणि संध्याकाळी हजारो नागरिक फिरण्यासाठी येतात. प्रशासनाने शनिवारी अचानक हिमायत बागेतील अंतर्गत सर्व कच्चे रस्ते खोदून ठेवले. ते एवढ्यावरच थांबले नाही तर काही ठिकाणी बाभळीचे काटेही टाकले. फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना त्यामुळे आत जाताच आले नाही. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रस्ते जसेच्या तसे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

शहरात आता ऑक्सिजन हब उरले नाहीत, त्यामुळे हिमायत बागकडे एक मोठे ऑक्सिजन हब म्हणून बघितले जाते. वर्षानुवर्षे या ठिकाणी शेकडो आबालवृद्ध सकाळी-संध्याकाळी वॉकसाठी येतात. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी अनेकदा इतिहासप्रेमींनी वॉक कार्यक्रमही आयोजित केले.

साधारण ३०० ते ४०० वर्षे जुनी झाडे या ठिकाणी आहेत. अत्यंत प्रसन्न, शांत वातावरण असते. आरोग्य जपण्यासाठी आणि दिवसभराचा थकवा घालविण्यासाठी अनेक नागरिक येथे वॉकसाठी येतात. शनिवारी सायंकाळी नागरिक फिरण्यासाठी आले तेव्हा सर्व बाजूने खड्डे खोदून ठेवल्याचे दिसले. काही ठिकाणी बाभळीचे काटे टाकले होते. नागरिकांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडली. हिमायत बाग प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला असता ते उपलब्ध झालेे नाहीत.

कोणाच्या इशाऱ्यावर हे कृत्य?हिमायत बाग प्रशासनाने विविध फळ विक्रीचे वार्षिक कंत्राट दिले आहे. कंत्राट घेतलेल्या व्यक्तींना हिमायत बागेत सर्वसामान्य नागरिकांनी येऊच नये असे वाटते. त्यांनी यापूर्वी अनेकदा नागरिकांना त्रास दिला आहे. त्यांच्याच इशाऱ्यावर प्रशासन नाचत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

रस्ते जसेच्या तसे करून द्याहिमायत बागचे प्रशासन परभणी कृषी विद्यापीठांतर्गत चालते. हिमायत बाग परिसर जैवविविधतेअंतर्गत येतो. त्यामुळे रस्ते जसेच्या तसे करून द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- प्रा. मकसूद दायमी, नागरिक

संयमाचा अंत पाहू नयेसुशिक्षित आणि विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदांवर असलेले नागरिक येथे येतात. वर्षानुवर्षांची परंपरा मोडीत काढणे चुकीचे आहे. हा परिसर खासगी नाही. शासनाचा आहे. नागरिकांना वॉकसाठी अडविता येत नाही. हिमायत बाग प्रशासनाने नागरिकांचा अंत पाहू नये.- अय्युब खान, नागरिक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटन