शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

हिमायत बागेतील सर्व रस्ते प्रशासनाने खोदले, काटे टाकले; फिरण्यास आलेल्या नागरिकांचा संताप

By मुजीब देवणीकर | Updated: May 20, 2024 15:57 IST

हिमायत बागेतील रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना पायी चालणेही अशक्य झाले आहे

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक वनसंपदा लाभलेल्या हिमायत बागेत दररोज सकाळी आणि संध्याकाळी हजारो नागरिक फिरण्यासाठी येतात. प्रशासनाने शनिवारी अचानक हिमायत बागेतील अंतर्गत सर्व कच्चे रस्ते खोदून ठेवले. ते एवढ्यावरच थांबले नाही तर काही ठिकाणी बाभळीचे काटेही टाकले. फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना त्यामुळे आत जाताच आले नाही. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रस्ते जसेच्या तसे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

शहरात आता ऑक्सिजन हब उरले नाहीत, त्यामुळे हिमायत बागकडे एक मोठे ऑक्सिजन हब म्हणून बघितले जाते. वर्षानुवर्षे या ठिकाणी शेकडो आबालवृद्ध सकाळी-संध्याकाळी वॉकसाठी येतात. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी अनेकदा इतिहासप्रेमींनी वॉक कार्यक्रमही आयोजित केले.

साधारण ३०० ते ४०० वर्षे जुनी झाडे या ठिकाणी आहेत. अत्यंत प्रसन्न, शांत वातावरण असते. आरोग्य जपण्यासाठी आणि दिवसभराचा थकवा घालविण्यासाठी अनेक नागरिक येथे वॉकसाठी येतात. शनिवारी सायंकाळी नागरिक फिरण्यासाठी आले तेव्हा सर्व बाजूने खड्डे खोदून ठेवल्याचे दिसले. काही ठिकाणी बाभळीचे काटे टाकले होते. नागरिकांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडली. हिमायत बाग प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला असता ते उपलब्ध झालेे नाहीत.

कोणाच्या इशाऱ्यावर हे कृत्य?हिमायत बाग प्रशासनाने विविध फळ विक्रीचे वार्षिक कंत्राट दिले आहे. कंत्राट घेतलेल्या व्यक्तींना हिमायत बागेत सर्वसामान्य नागरिकांनी येऊच नये असे वाटते. त्यांनी यापूर्वी अनेकदा नागरिकांना त्रास दिला आहे. त्यांच्याच इशाऱ्यावर प्रशासन नाचत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

रस्ते जसेच्या तसे करून द्याहिमायत बागचे प्रशासन परभणी कृषी विद्यापीठांतर्गत चालते. हिमायत बाग परिसर जैवविविधतेअंतर्गत येतो. त्यामुळे रस्ते जसेच्या तसे करून द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- प्रा. मकसूद दायमी, नागरिक

संयमाचा अंत पाहू नयेसुशिक्षित आणि विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदांवर असलेले नागरिक येथे येतात. वर्षानुवर्षांची परंपरा मोडीत काढणे चुकीचे आहे. हा परिसर खासगी नाही. शासनाचा आहे. नागरिकांना वॉकसाठी अडविता येत नाही. हिमायत बाग प्रशासनाने नागरिकांचा अंत पाहू नये.- अय्युब खान, नागरिक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटन