शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तपासासाठी द्यावे लागले अतिरिक्त पोलीस

By admin | Updated: November 26, 2014 01:10 IST

औरंगाबाद : मुकुंदवाडी ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निष्क्रियतेचा कळसच गाठलाय. शेकडो गुन्ह्यांचे तपास रखडलेत

औरंगाबाद : मुकुंदवाडी ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निष्क्रियतेचा कळसच गाठलाय. शेकडो गुन्ह्यांचे तपास रखडलेत. अनेक गुन्ह्यांच्या तपासाची कागदपत्रे पूर्ण झालेली नाहीत. परिमाणी, या ठाण्याला न्यायालयीन कामकाजात अनंत अडचणी येत आहेत. अनेकदा तंबी देऊनही या पोलिसांना काहीच फरक पडला नाही. त्यामुळे मुकुंदवाडी पोलिसांचे हे खरकटे (गुन्ह्यांचे तपास, कागदपत्रे) काढण्यासाठी पोलीस मुख्यालयातून वीस जमादारांची मुकुंदवाडी ठाण्यात तात्पुरती नियुक्ती करण्याची नामुष्की पोलीस आयुक्तांवर आली आहे.सुमारे सव्वाशे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा असलेल्या या ठाण्याची हद्द तशी पाहिली तर इतर पोलीस ठाण्यांच्या तुलनेत खूप मोठी आहे असे नाही. हद्दीच्या तुलनेत येथे नियुक्त पोलिसांची संख्या पुरेशी आहे; परंतु पूर्वीपासूनच येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारीवर वचक ठेवलाच नाही. काही कर्मचाऱ्यांनी आपल्या ‘आर्थिक’ हितसंबंधामुळे ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांना खतपाणीच घातले. त्यामुळेच आज आयुक्तालयातील एक त्रासदायक पोलीस ठाणे, अशी मुकुंदवाडीची ओळख निर्माण झालेली आहे. येथील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीचा आलेख प्रचंड वाढलेला आहे. पहिल्यांदाच आली अशी नामुष्की!मुकुंदवाडी ठाण्यातील गुन्ह्यांच्या वाढलेल्या ‘पेंडन्सी’बाबत पोलीस आयुक्त, उपायुक्तांनी येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेकदा तंबी दिली. मात्र, त्यांच्यात काहीच फरक पडलेला नाही. शेवटी रखडलेल्या गुन्ह्यांच्या तपासाला मदत करण्यासाठी आणि गुन्ह्यांची अपूर्ण कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी पोलीस मुख्यालयातील २० अनुभवी तपासिक अंमलदार देण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला. मुकुंदवाडी पोलिसांचे हे ‘खरकटे’ काढण्यासाठी शनिवारपासून हा अतिरिक्त फौजफाटा ठाण्यात पाठविण्यात आला आहे. आयुक्तालयाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडल्याचे सूत्रांनी सांगितले. ही बाब मुकुंदवाडी ठाण्यासाठी लज्जास्पदच मानली जात आहे.1मुकुंदवाडी ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेने इतका कळस गाठला आहे की, घडलेल्या गुन्ह्याचा दोन- दोन दिवस एफआयआरही लिहिला जात नाही. फिर्यादीची संगणकावर तक्रार बनविल्यानंतर त्याच्याकडून कोऱ्या एफआयआरवर स्वाक्षरी घेतली जाते आणि दोन, तीन दिवसांनी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रजिस्टरवर हस्तलिखित एफआयआर लिहिला जात आहे. 2या ठाण्यात आजघडीला कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी निम्मे कर्मचारी हे गेल्या आठ-दहा वर्षांपासून याच ठाण्यात तळ ठोकून बसलेले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे हद्दीतील गुन्हेगार, अवैध धंदेवाल्यांशी हितसंबंध वाढलेले आहेत. या हितसंबंधांमुळेच गुन्हेगारांना अभय मिळत असून, गुन्हेगारी वाढत आहे. शिवाय हितसंबंधांमुळेच अनेक तपास प्रलंबित ठेवण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.आजघडीला मुकुंदवाडी ठाण्याच्या एका एका तपासिक अंमलदाराकडे किमान ५० गुन्ह्यांचे तपास प्रलंबित आहेत. त्यातच या ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एका गुन्ह्याचा तपास लागतो ना लागतो तोच दुसऱ्या आखणी दोन, तीन गुन्ह्यांच्या तपासाची जबाबदारी या अंमलदाराच्या अंगावर येऊन पडते. त्यामुळे गुन्ह्यांची ‘पेंडन्सी’ प्रचंड वाढलेली आहे. शेकडो गुन्ह्यांचा तपास तर रखडलेला आहेच. त्याचबरोबर घडलेल्या गुन्ह्यांची येथील पोलिसांनी कागदोपत्री कारवाईही पूर्ण केलेली नाही. कागदपत्रे अपूर्ण असलेल्या गुन्ह्यांची संख्याही शेकडोच्या घरात आहे. अपूर्ण कागदपत्रांमुळे न्यायालयीन कामालाही अडचणी येत आहेत.