शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेते धावले, नेते नाही पावले !

By admin | Updated: August 10, 2015 00:59 IST

शिरीष शिंदे / व्यंकटेश वैष्णव , बीड पांढरं कपाळ घेवून काळ्या मातीची सेवा करणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी सिने अभिनेता नाना पाटेकरसह सिनेसृष्टी धावून आली

शिरीष शिंदे / व्यंकटेश वैष्णव , बीडपांढरं कपाळ घेवून काळ्या मातीची सेवा करणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी सिने अभिनेता नाना पाटेकरसह सिनेसृष्टी धावून आली. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या जीवावर खुर्ची मिळवणारे नेते मात्र आत्महत्येचे राजकारण करीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच दंग आहेत. चंदेरी दुनियेत वेगवेगळ्या भूमिका साकारणारे अभिनेते रविवारी बीडमध्ये सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेत दिसले.नानांच्या जोडीला बीडचा भूमिपूत्र सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे, लेखक अरविंद जगताप, नितीन नेरूळकर, अमोल अंकुटे हे देखील होते. या सर्वांनी ११२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी १५ हजार रूपये एवढी आर्थिक मदत तर दिलीच शिवाय मानसिक आधारही दिला. यावेळी त्यांनी ना गाजावाजा केला ना फोटोसेशन केले. माध्यमांपासून चार हात दूर राहत त्यांनी शेतकरी कुटुंबियासमवेत मनमोकळ्या गप्पा मारल्या.जिल्हयातील दुष्काळी परिस्थितीने शेवटचे टोक गाठले आहे. अशा परिस्थितीतही स्वत: सत्ताधारीच जिल्हा प्रशासनाला निवेदन देताना पहावयास मिळत आहे तर दुसरीकडे सामाजिक उत्तरदायित्वावच्या भावनेतून नानांन सारखी माणसं बळीराजाच्या मदतीला धावून येतात. तसे पाहिले तर जिल्ह्यातील नागरिकांचे आणि नानांचे यापूर्वी कसलेच ऋणानुबंध नाहीत. नानांना भविष्यात बीडच्या जनतेकडे मते मागायला यायचे नाही. नि:स्वार्थपणे नानांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली आहे. त्यांच्यासह मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांचे मनोबल वाढवले आहे. निराश चेहऱ्यांसह बसलेल्या आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना हे नविनच होते. ‘क्रांतीवीर’ चित्रपट गाजविणाऱ्या नानाने ‘क्रांतीदिनी’च मदतीचा हात दिला.देव करो आणि आमच्यासारखी वेळ कोणावरही न येवो. घरातला कर्ता निघून गेल्यावर कुटुंबाच्या हालअपेष्टा काय असतात, हे आम्ही सध्या भोगतो आहोत. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी आम्हाला मदत दिली. पण आम्हाला जगण्यासाठी समाजातून हिम्मत द्या, आमच्या हाताला काम द्या तेंव्हाच आम्ही आमच्या पोराबाळांचा सांभाळ करू शकू...असे भावोद्गार ज्योती मोराळे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने काढले. या व्यथा मांडतानाच ज्योती मोराळे या मंचावरच कोसळल्या. त्यानंतर स्वत: नाना पाटेकर व इतर सर्वजण धावत जावून त्यांना धीर दिला.रोज दैनिकात शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या वाचून त्रास होतो. सरकार पोहोचेल तेव्हा पोहोचेल. आपलेही काही कर्तव्य आहे, या भावनेतून हे काम मी केले आहे. पांढरी फटफटीत कपाळं पहायला खूप त्रास होतो. हे प्रत्येकजण करत असतो. ज्याच्या-त्याच्या परीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करावी, असे आवाहन नाना पाटेकर यांनी केले आहे.भाषणे संपल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटंूबियांना बंद पाकीटातील १५ हजार रुपयांची रक्कम व्यासपीठावर बोलावून देण्याऐवजी नाना व्यासपीठाच्या पायऱ्यावर बसला. मकरंद याने नावे पुकारली व नानाने बसून पाकीटे वाटली. यातून नानाचा साधेपणा समोर आला.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीला सेलिब्रेटी धावून आले. त्यांच्याशिवाय बीड येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांनी १ लाख १२ हजार रुपयांची रोख रक्कम देवून दिलासा दिला.