शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

अभिनेते धावले, नेते नाही पावले !

By admin | Updated: August 10, 2015 00:59 IST

शिरीष शिंदे / व्यंकटेश वैष्णव , बीड पांढरं कपाळ घेवून काळ्या मातीची सेवा करणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी सिने अभिनेता नाना पाटेकरसह सिनेसृष्टी धावून आली

शिरीष शिंदे / व्यंकटेश वैष्णव , बीडपांढरं कपाळ घेवून काळ्या मातीची सेवा करणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी सिने अभिनेता नाना पाटेकरसह सिनेसृष्टी धावून आली. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या जीवावर खुर्ची मिळवणारे नेते मात्र आत्महत्येचे राजकारण करीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच दंग आहेत. चंदेरी दुनियेत वेगवेगळ्या भूमिका साकारणारे अभिनेते रविवारी बीडमध्ये सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेत दिसले.नानांच्या जोडीला बीडचा भूमिपूत्र सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे, लेखक अरविंद जगताप, नितीन नेरूळकर, अमोल अंकुटे हे देखील होते. या सर्वांनी ११२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी १५ हजार रूपये एवढी आर्थिक मदत तर दिलीच शिवाय मानसिक आधारही दिला. यावेळी त्यांनी ना गाजावाजा केला ना फोटोसेशन केले. माध्यमांपासून चार हात दूर राहत त्यांनी शेतकरी कुटुंबियासमवेत मनमोकळ्या गप्पा मारल्या.जिल्हयातील दुष्काळी परिस्थितीने शेवटचे टोक गाठले आहे. अशा परिस्थितीतही स्वत: सत्ताधारीच जिल्हा प्रशासनाला निवेदन देताना पहावयास मिळत आहे तर दुसरीकडे सामाजिक उत्तरदायित्वावच्या भावनेतून नानांन सारखी माणसं बळीराजाच्या मदतीला धावून येतात. तसे पाहिले तर जिल्ह्यातील नागरिकांचे आणि नानांचे यापूर्वी कसलेच ऋणानुबंध नाहीत. नानांना भविष्यात बीडच्या जनतेकडे मते मागायला यायचे नाही. नि:स्वार्थपणे नानांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली आहे. त्यांच्यासह मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांचे मनोबल वाढवले आहे. निराश चेहऱ्यांसह बसलेल्या आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना हे नविनच होते. ‘क्रांतीवीर’ चित्रपट गाजविणाऱ्या नानाने ‘क्रांतीदिनी’च मदतीचा हात दिला.देव करो आणि आमच्यासारखी वेळ कोणावरही न येवो. घरातला कर्ता निघून गेल्यावर कुटुंबाच्या हालअपेष्टा काय असतात, हे आम्ही सध्या भोगतो आहोत. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी आम्हाला मदत दिली. पण आम्हाला जगण्यासाठी समाजातून हिम्मत द्या, आमच्या हाताला काम द्या तेंव्हाच आम्ही आमच्या पोराबाळांचा सांभाळ करू शकू...असे भावोद्गार ज्योती मोराळे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने काढले. या व्यथा मांडतानाच ज्योती मोराळे या मंचावरच कोसळल्या. त्यानंतर स्वत: नाना पाटेकर व इतर सर्वजण धावत जावून त्यांना धीर दिला.रोज दैनिकात शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या वाचून त्रास होतो. सरकार पोहोचेल तेव्हा पोहोचेल. आपलेही काही कर्तव्य आहे, या भावनेतून हे काम मी केले आहे. पांढरी फटफटीत कपाळं पहायला खूप त्रास होतो. हे प्रत्येकजण करत असतो. ज्याच्या-त्याच्या परीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करावी, असे आवाहन नाना पाटेकर यांनी केले आहे.भाषणे संपल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटंूबियांना बंद पाकीटातील १५ हजार रुपयांची रक्कम व्यासपीठावर बोलावून देण्याऐवजी नाना व्यासपीठाच्या पायऱ्यावर बसला. मकरंद याने नावे पुकारली व नानाने बसून पाकीटे वाटली. यातून नानाचा साधेपणा समोर आला.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीला सेलिब्रेटी धावून आले. त्यांच्याशिवाय बीड येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांनी १ लाख १२ हजार रुपयांची रोख रक्कम देवून दिलासा दिला.