शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

अभिनेते धावले, नेते नाही पावले !

By admin | Updated: August 10, 2015 00:59 IST

शिरीष शिंदे / व्यंकटेश वैष्णव , बीड पांढरं कपाळ घेवून काळ्या मातीची सेवा करणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी सिने अभिनेता नाना पाटेकरसह सिनेसृष्टी धावून आली

शिरीष शिंदे / व्यंकटेश वैष्णव , बीडपांढरं कपाळ घेवून काळ्या मातीची सेवा करणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी सिने अभिनेता नाना पाटेकरसह सिनेसृष्टी धावून आली. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या जीवावर खुर्ची मिळवणारे नेते मात्र आत्महत्येचे राजकारण करीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच दंग आहेत. चंदेरी दुनियेत वेगवेगळ्या भूमिका साकारणारे अभिनेते रविवारी बीडमध्ये सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेत दिसले.नानांच्या जोडीला बीडचा भूमिपूत्र सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे, लेखक अरविंद जगताप, नितीन नेरूळकर, अमोल अंकुटे हे देखील होते. या सर्वांनी ११२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी १५ हजार रूपये एवढी आर्थिक मदत तर दिलीच शिवाय मानसिक आधारही दिला. यावेळी त्यांनी ना गाजावाजा केला ना फोटोसेशन केले. माध्यमांपासून चार हात दूर राहत त्यांनी शेतकरी कुटुंबियासमवेत मनमोकळ्या गप्पा मारल्या.जिल्हयातील दुष्काळी परिस्थितीने शेवटचे टोक गाठले आहे. अशा परिस्थितीतही स्वत: सत्ताधारीच जिल्हा प्रशासनाला निवेदन देताना पहावयास मिळत आहे तर दुसरीकडे सामाजिक उत्तरदायित्वावच्या भावनेतून नानांन सारखी माणसं बळीराजाच्या मदतीला धावून येतात. तसे पाहिले तर जिल्ह्यातील नागरिकांचे आणि नानांचे यापूर्वी कसलेच ऋणानुबंध नाहीत. नानांना भविष्यात बीडच्या जनतेकडे मते मागायला यायचे नाही. नि:स्वार्थपणे नानांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली आहे. त्यांच्यासह मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांचे मनोबल वाढवले आहे. निराश चेहऱ्यांसह बसलेल्या आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना हे नविनच होते. ‘क्रांतीवीर’ चित्रपट गाजविणाऱ्या नानाने ‘क्रांतीदिनी’च मदतीचा हात दिला.देव करो आणि आमच्यासारखी वेळ कोणावरही न येवो. घरातला कर्ता निघून गेल्यावर कुटुंबाच्या हालअपेष्टा काय असतात, हे आम्ही सध्या भोगतो आहोत. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी आम्हाला मदत दिली. पण आम्हाला जगण्यासाठी समाजातून हिम्मत द्या, आमच्या हाताला काम द्या तेंव्हाच आम्ही आमच्या पोराबाळांचा सांभाळ करू शकू...असे भावोद्गार ज्योती मोराळे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने काढले. या व्यथा मांडतानाच ज्योती मोराळे या मंचावरच कोसळल्या. त्यानंतर स्वत: नाना पाटेकर व इतर सर्वजण धावत जावून त्यांना धीर दिला.रोज दैनिकात शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या वाचून त्रास होतो. सरकार पोहोचेल तेव्हा पोहोचेल. आपलेही काही कर्तव्य आहे, या भावनेतून हे काम मी केले आहे. पांढरी फटफटीत कपाळं पहायला खूप त्रास होतो. हे प्रत्येकजण करत असतो. ज्याच्या-त्याच्या परीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करावी, असे आवाहन नाना पाटेकर यांनी केले आहे.भाषणे संपल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटंूबियांना बंद पाकीटातील १५ हजार रुपयांची रक्कम व्यासपीठावर बोलावून देण्याऐवजी नाना व्यासपीठाच्या पायऱ्यावर बसला. मकरंद याने नावे पुकारली व नानाने बसून पाकीटे वाटली. यातून नानाचा साधेपणा समोर आला.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीला सेलिब्रेटी धावून आले. त्यांच्याशिवाय बीड येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांनी १ लाख १२ हजार रुपयांची रोख रक्कम देवून दिलासा दिला.