शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
5
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
6
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
8
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
9
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
10
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
11
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
12
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
14
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
15
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
16
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
17
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
18
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
19
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
20
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

तपासणीच्या नावाखाली मनमानी करणा-या रेल्वे अधिका-यांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 19:07 IST

दक्षिण मध्य रेल्वेतर्फे २ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाईच्या नावाखाली अधिका-यांच्या दंडेलशाहीला तिकीट काढून प्रवास करणा-यांना सामोरे जावे लागले.

ठळक मुद्दे२ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत कारवाई करण्यात आली. ४२ तिकीट निरीक्षक, ९ रेल्वे सुरक्षा बलाचे जवान यांच्या मदतीने फुकट्या प्रवाशांवर कारवाई झालीडेलशाही रेल्वे अधिका-यांना चांगलीच महागात पडणार असून, याप्रकरणी संबंधित कर्मचारी-अधिका-यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेतर्फे २ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाईच्या नावाखाली अधिका-यांच्या दंडेलशाहीला तिकीट काढून प्रवास करणा-यांना सामोरे जावे लागले. ही दंडेलशाही रेल्वे अधिका-यांना चांगलीच महागात पडणार असून, याप्रकरणी संबंधित कर्मचारी-अधिका-यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ‘दमरे’चे प्रिन्सिपल चीफ कमर्शियल मॅनेजर एम.जी. शेखरम यांनी दिली.

रेल्वेस्टेशनवर बुधवारी (दि.८) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शेखरम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. फुकट्या प्रवाशांबरोबर जनरल तिकीट असताना स्लीपर बोगीतून प्रवास करणा-यांचे प्रमाण अधिक आहे. अनधिकृत विक्रेते फिरतात. याविषयी तक्रारी आल्याने कारवाई केली जात आहे. रेल्वेमध्ये एकूण ९ प्रकारे तपासणी केली जाते. २ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत कारवाई करण्यात आली. ४२ तिकीट निरीक्षक, ९ रेल्वे सुरक्षा बलाचे जवान यांच्या मदतीने फुकट्या प्रवाशांवर कारवाई झाली; परंतु नियमानुसार तिकीट काढून प्रवास करणा-यांना कोणताही त्रास होणार नाही, याची कोणतीही खबरदारी अधिका-यांनी घेतली नाही. 

असभ्य भाषेत प्रवाशांकडे तिकिटांची विचारणा करण्यात आली. प्रवाशांची अक्षरश: कॉलर धरून सराईत गुन्हेगारांप्रमाणे त्यांना ओढून नेले. माध्यमांच्या छायाचित्रकारांनाही या कारवाईचे छायाचित्र घेण्यापासून मज्जाव केला. हा प्रकार ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून समोर आणला. अखेर या सर्व प्रकारांविषयी खेद व्यक्त करीत हा प्रकार करणा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शेखरम यांनी दिली. यावेळी स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, धनंजयकुमार सिंग उपस्थित होते.

पाच मिनिटांत रांगेतून जावे...तिकीट घेण्यासाठी प्रवाशांना रांगेत ब-याच वेळ थांबावे लागते. त्यातून रेल्वे सुटण्याचे प्रकार होतात; परंतु तिकीट घेण्यासाठी ५ मिनिटांवर कोणीही रांगेत उभे राहू नये, अशी व्यवस्था करण्यावर भर आहे. कर्मचारी संख्या अपुरी पडत असल्याने निवृत्त कर्मचा-यांना घेण्याचा निर्णय घेतला आहे. रोख रकमे व्यतिरिक्तची कामे ते करतील, अशी माहिती शेखरम यांनी दिली.

५०५ जणांवर कारवाई

औरंगाबादेत विनातिकीट ४३७ प्रवाशांवर, तर अतिरिक्त सामान, अनधिकृत विक्रेते अशा एकूण ५०५ जणांवर कारवाई करण्यात आली. यातून १ लाख ४९ हजार ६३५ रुपयांचा दंड वसूल झाला. अशाप्रकारे कारवाई क रण्यासाठी रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा अधिका-यांना आहे. कोणत्याही प्रकारे अतिरिक्त खर्च करण्यात आला नसल्याचे शेखरम यांनी सांगितले.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासी