शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत वाहतूक शाखा आणि आरटीओकडून २१३ बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 13:46 IST

या कारवाईत वाळूज आणि छावणी, सिडको, शहर वाहतूक विभागांतर्गत २१३ रिक्षा जप्त करण्यात आल्या. 

औरंगाबाद : महावीर चौकात वाहतुकीला अडसर ठरेल अशा प्रकारे रिक्षा उभ्या करणाऱ्या रिक्षाचालकांच्या छायाचित्रांसह ‘लोकमत’ने शुक्रवारी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाने शुक्रवारी दिवसभर विविध रस्त्यांवर बेशिस्त आणि नियम तोडून वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात कारवाई केली. या कारवाईत वाळूज आणि छावणी, सिडको, शहर वाहतूक विभागांतर्गत २१३ रिक्षा जप्त करण्यात आल्या. 

शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) येथून प्रवासी वाहतूक करणारे रिक्षाचालक मनमानी पद्धतीने वागतात, ते रस्त्यावर रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. वाहतूक पोलिसांनाही रिक्षाचालक जुमानत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारी प्रकाशित केले. या वृत्ताची गंभीर दखल वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाने घेतली. दोन्ही विभागांनी संयुक्तपणे  शुक्रवारी सकाळपासून महावीर चौकात मोहीम राबवून बेशिस्त ४८ रिक्षा जप्त केल्या. वाळूज विभागातही तब्बल ४७ रिक्षांवर कारवाई केली. या सर्व रिक्षा छावणी ठाण्याच्या आवारात नेऊन उभ्या केल्या.

छावणी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक निरीक्षक खटाणे, आरटीओ निरीक्षक श्रीमती भामरे यांनी रिक्षाचालकांचे लायसन्स, बॅच, परमिट, रिक्षाचा विमा, पीयूसीसह अन्य कागदपत्रांची पडताळणी केली. या पडताळणीत किरकोळ नियम मोडणाऱ्या ३२ रिक्षाचालकांना वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई करून सोडून दिले, तर अन्य रिक्षा जप्त करून रिक्षामालकांना सोमवारी आरटीओ कार्यालयात हजर राहण्याचे आदेशित केले. शहर विभाग क्रमांक-२ मध्ये पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी ४० रिक्षा जप्त करून मध्यवर्ती बसस्थानक येथे उभ्या करून ठेवल्या, तर विभाग क्रमांक-१ मध्ये पोलीस निरीक्षक भारत काकडे यांनी ३९ रिक्षा जप्त केल्या.  सिडको विभागात निरीक्षक गिरमे आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी ३७ रिक्षांवर कारवाई केली. 

रिक्षाचालकांची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाहीआज जप्त केलेल्या रिक्षांपैकी ज्या रिक्षांची कागदपत्रे नाहीत, त्या भंगारात काढून रस्त्यावरून कायमस्वरूपी हटविल्या जातील. शिवाय अन्य रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करून रिक्षा मुक्त केल्या जातील. रिक्षाचालकांची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही.- भारत काकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षाRto officeआरटीओ ऑफीस