शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तीन तासांत दोघांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:56 IST

रस्त्याची चाळणी : नागपूर -मुंबई महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

लासूर स्टेशन : अवघ्या तीन तासांत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात मोटारसायकलवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नागपूर -मुंबई महामार्गावरील आरापूर-वसूसायगाव दरम्यानच्या तीन किलोमीटर अंतरावर रविवारी घडली.या महामार्गावर गेल्या सहा दिवसांत झालेल्या चार अपघातात चार जणांचा बळी गेला आहे. अत्यंत दयनीय अवस्था झालेला नागपूर -मुंबई महामार्ग हा दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.नारायण मुरलीधर लंबे (४८, रा.भोकरगाव ता. वैजापूर) असे रविवारी दुपारी अडीच वाजता झालेल्या अपघातातील मयताचे नाव आहे. तर सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या अपघातातील मयताचे नाव संदीप नारायण राठोड (२८, रा.राणेगाव, ता. शेवगाव) असे आहे.नारायण व त्यांचे भाऊ राजाराम हे दोघे कांदा चाळीसाठी स्टील बघण्यासाठी करोडी परिसरातील कंपनीत गेले होते. परत येत असताना दुपारी अडीच वाजता आरापूर शिवारात एका हॉटेलसमोर वैजापूरकडून येणारा ट्रक क्रमांक सी. जी. ०७. आर. यू.९२२२ व औरंगाबादकडून येणारी मोटारसायकल क्रमांक जी. जे. ०५ सी.सी. २७३९ यांची समोरासमोर धडक झाल्याने नारायण यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे भाऊ राजाराम मुरलीधर लंबे हे गंभीर जखमी झाले.या अपघातानंतर तीन तासात वसूसायगाव येथील गतिरोधकाजवळ आयशर टेम्पोने मोटरसायकलस्वारास चिरडल्याची घटना घडली. संदीप नारायण राठोड हा त्याचा मामेभाऊ किशोर उत्तम चव्हाण (रा. अंबड तालुका) याच्यासोबत मोटारसायकल क्रमांक एम. एच. २३. ए. क्यू. ५२७५ वरून औरंगाबाद येथून येत असताना पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक एम. एच. २३. डब्ल्यू. ९९७ने धडक दिली. यात चाकाखाली चिरडल्याने संदीपचा जागीच मृत्यू झाला. लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. भाग्यश्री डोंगरे व डॉ. सोनाली जानकर यांनी दोघांना तपासून मयत घोषित केले. नागपूर -मुंबई महामार्गाची अक्षरश: चाळणी झाली असून, खड्डे वाचविण्यासाठी वाहनधारकांना रॉग साईडने वाहन घ्यावे लागते. त्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.गेल्या सहा दिवसात गेले चार बळी२३ एप्रिल रोजी विश्वंभर मदन मोगरे (२७, रा. आहेर बोरगाव, ता. सेलू. जि. परभणी), २७ रोजी शिवनाथ सोमनाथ साठे (३२, रा. माळीवाडा ता. जि. औरंगाबाद) व २९ एप्रिल रोजी हे दोघे गतप्राण झाले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू