शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

तीन तासांत दोघांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:56 IST

रस्त्याची चाळणी : नागपूर -मुंबई महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

लासूर स्टेशन : अवघ्या तीन तासांत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात मोटारसायकलवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नागपूर -मुंबई महामार्गावरील आरापूर-वसूसायगाव दरम्यानच्या तीन किलोमीटर अंतरावर रविवारी घडली.या महामार्गावर गेल्या सहा दिवसांत झालेल्या चार अपघातात चार जणांचा बळी गेला आहे. अत्यंत दयनीय अवस्था झालेला नागपूर -मुंबई महामार्ग हा दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.नारायण मुरलीधर लंबे (४८, रा.भोकरगाव ता. वैजापूर) असे रविवारी दुपारी अडीच वाजता झालेल्या अपघातातील मयताचे नाव आहे. तर सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या अपघातातील मयताचे नाव संदीप नारायण राठोड (२८, रा.राणेगाव, ता. शेवगाव) असे आहे.नारायण व त्यांचे भाऊ राजाराम हे दोघे कांदा चाळीसाठी स्टील बघण्यासाठी करोडी परिसरातील कंपनीत गेले होते. परत येत असताना दुपारी अडीच वाजता आरापूर शिवारात एका हॉटेलसमोर वैजापूरकडून येणारा ट्रक क्रमांक सी. जी. ०७. आर. यू.९२२२ व औरंगाबादकडून येणारी मोटारसायकल क्रमांक जी. जे. ०५ सी.सी. २७३९ यांची समोरासमोर धडक झाल्याने नारायण यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे भाऊ राजाराम मुरलीधर लंबे हे गंभीर जखमी झाले.या अपघातानंतर तीन तासात वसूसायगाव येथील गतिरोधकाजवळ आयशर टेम्पोने मोटरसायकलस्वारास चिरडल्याची घटना घडली. संदीप नारायण राठोड हा त्याचा मामेभाऊ किशोर उत्तम चव्हाण (रा. अंबड तालुका) याच्यासोबत मोटारसायकल क्रमांक एम. एच. २३. ए. क्यू. ५२७५ वरून औरंगाबाद येथून येत असताना पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक एम. एच. २३. डब्ल्यू. ९९७ने धडक दिली. यात चाकाखाली चिरडल्याने संदीपचा जागीच मृत्यू झाला. लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. भाग्यश्री डोंगरे व डॉ. सोनाली जानकर यांनी दोघांना तपासून मयत घोषित केले. नागपूर -मुंबई महामार्गाची अक्षरश: चाळणी झाली असून, खड्डे वाचविण्यासाठी वाहनधारकांना रॉग साईडने वाहन घ्यावे लागते. त्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.गेल्या सहा दिवसात गेले चार बळी२३ एप्रिल रोजी विश्वंभर मदन मोगरे (२७, रा. आहेर बोरगाव, ता. सेलू. जि. परभणी), २७ रोजी शिवनाथ सोमनाथ साठे (३२, रा. माळीवाडा ता. जि. औरंगाबाद) व २९ एप्रिल रोजी हे दोघे गतप्राण झाले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू