शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

नव्या बदलाचा स्वीकार करा - टोपे

By admin | Updated: December 21, 2014 00:06 IST

जालना : शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक यशस्वी पिढी निर्माण करते असे प्रतिपादन राजेश टोपे यांनी मत्स्योदरी पुरस्कार वितरण प्रसंगी शनिवारी मत्स्योदरी महाविद्यालयात आयोजित

जालना : शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक यशस्वी पिढी निर्माण करते असे प्रतिपादन राजेश टोपे यांनी मत्स्योदरी पुरस्कार वितरण प्रसंगी शनिवारी मत्स्योदरी महाविद्यालयात आयोजित शिक्षक मेळाव्यात केले. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्राने नवा बदल स्वीकारावा असे आवाहनही केले.मत्स्योदरी शिक्षण संस्थेद्वारे मराठवाड्यातील शिक्षण विषयक कार्य करणाऱ्या प्राध्यापक, साहित्यिक, संशोधक यांना त्यांच्या कार्याबद्दल दिला जाणारा मत्स्योदरी शिक्षण पुरस्कार या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ.आर.एस.सोळुंके यांना प्रदान करण्यात आला. ११ हजार रू. रोख, स्मृतीचिन्ह व शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच मत्स्योदरी शिक्षण संस्थेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेबद्दल सेवा पुरस्काराचे वितरणही याप्रसंगी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अंकुशराव टोपे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना टोपे म्हणाले की, शिक्षण व्यवस्थेने येवू घातलेल्या नव्या बदलाचा शिक्षण क्षेत्राने स्वीकार करावा. मत्स्योदरी शिक्षण संस्था परिवर्तन व बदल याचा नेहमीच स्वीकार करते असेही टोपे म्हणाले. पुरस्काराचे मानकरी डॉ. आर. एस. सोळुंके यांनी सत्काराला उत्तर देतांना सद्यस्थितील शिक्षण व्यवस्थेला बदलाची परिवर्तनाची गरज असून अध्ययन व अध्यापनांचे तरूण पिढीवर संस्कार रूजविता येतात ही शिक्षकांची जबाबदारी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. तर प्रमुख वक्ते प्राचार्य शिवाजीराव देवडे यांनी जीवन जगतांना सत्याचा मार्ग शिक्षकांनी अवलंबिला पाहिजे, आपला देश सर्व सामान्यांचा व श्रमकऱ्यांचा देश आहे, त्यांनाही कर्मकांडांनी ग्रासले आहे, या कर्मकांडाचे अडथळे शिक्षण क्षेत्रातही आहेत ते दूर व्हावे यासाठी शिक्षण क्षेत्रात प्रयत्न झाले पाहिजे.आपल्या अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड.टोपे म्हणाले की, शिक्षकांनी मिळणाऱ्या अध्ययन अध्यापन कार्याचा अनुभव विद्यार्थ्यांना पुरेपुर कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी डॉ.बी.आर.गायकवाड, प्रा.डॉ.राजेंद्र गायकवाड, प्रा.डॉ.भागवतराव कटारे, श्रीरंग पैठणे, राजेश राऊत, अ‍ॅड.राधाकृष्ण गायकवाड, डॉ.शेंडगे, डॉ.संजय शिंदे, संभाजी पाटील, प्रा.मोरे, डॉ.अरूण तवार, धोपटे यांच्यासह प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.कार्तिक गावंडे तर आभार डॉ.संजय पाटील यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)