शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नव्या बदलाचा स्वीकार करा - टोपे

By admin | Updated: December 21, 2014 00:06 IST

जालना : शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक यशस्वी पिढी निर्माण करते असे प्रतिपादन राजेश टोपे यांनी मत्स्योदरी पुरस्कार वितरण प्रसंगी शनिवारी मत्स्योदरी महाविद्यालयात आयोजित

जालना : शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक यशस्वी पिढी निर्माण करते असे प्रतिपादन राजेश टोपे यांनी मत्स्योदरी पुरस्कार वितरण प्रसंगी शनिवारी मत्स्योदरी महाविद्यालयात आयोजित शिक्षक मेळाव्यात केले. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्राने नवा बदल स्वीकारावा असे आवाहनही केले.मत्स्योदरी शिक्षण संस्थेद्वारे मराठवाड्यातील शिक्षण विषयक कार्य करणाऱ्या प्राध्यापक, साहित्यिक, संशोधक यांना त्यांच्या कार्याबद्दल दिला जाणारा मत्स्योदरी शिक्षण पुरस्कार या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ.आर.एस.सोळुंके यांना प्रदान करण्यात आला. ११ हजार रू. रोख, स्मृतीचिन्ह व शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच मत्स्योदरी शिक्षण संस्थेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेबद्दल सेवा पुरस्काराचे वितरणही याप्रसंगी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अंकुशराव टोपे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना टोपे म्हणाले की, शिक्षण व्यवस्थेने येवू घातलेल्या नव्या बदलाचा शिक्षण क्षेत्राने स्वीकार करावा. मत्स्योदरी शिक्षण संस्था परिवर्तन व बदल याचा नेहमीच स्वीकार करते असेही टोपे म्हणाले. पुरस्काराचे मानकरी डॉ. आर. एस. सोळुंके यांनी सत्काराला उत्तर देतांना सद्यस्थितील शिक्षण व्यवस्थेला बदलाची परिवर्तनाची गरज असून अध्ययन व अध्यापनांचे तरूण पिढीवर संस्कार रूजविता येतात ही शिक्षकांची जबाबदारी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. तर प्रमुख वक्ते प्राचार्य शिवाजीराव देवडे यांनी जीवन जगतांना सत्याचा मार्ग शिक्षकांनी अवलंबिला पाहिजे, आपला देश सर्व सामान्यांचा व श्रमकऱ्यांचा देश आहे, त्यांनाही कर्मकांडांनी ग्रासले आहे, या कर्मकांडाचे अडथळे शिक्षण क्षेत्रातही आहेत ते दूर व्हावे यासाठी शिक्षण क्षेत्रात प्रयत्न झाले पाहिजे.आपल्या अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड.टोपे म्हणाले की, शिक्षकांनी मिळणाऱ्या अध्ययन अध्यापन कार्याचा अनुभव विद्यार्थ्यांना पुरेपुर कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी डॉ.बी.आर.गायकवाड, प्रा.डॉ.राजेंद्र गायकवाड, प्रा.डॉ.भागवतराव कटारे, श्रीरंग पैठणे, राजेश राऊत, अ‍ॅड.राधाकृष्ण गायकवाड, डॉ.शेंडगे, डॉ.संजय शिंदे, संभाजी पाटील, प्रा.मोरे, डॉ.अरूण तवार, धोपटे यांच्यासह प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.कार्तिक गावंडे तर आभार डॉ.संजय पाटील यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)