शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

बँकांवर राहणार एसीबीची नजर

By admin | Updated: June 10, 2016 23:42 IST

हिंगोली : दलालांचा आधार घेतल्याशिवाय बँका कर्जच देत नसल्याच्या तक्रारींमुळे बँकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी आदेशित केले.

हिंगोली : दलालांचा आधार घेतल्याशिवाय बँका कर्जच देत नसल्याच्या तक्रारींमुळे बँकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी आदेशित केले.जिल्हा कचेरीतून सभागृहात झालेल्या बैठकीस जि. प. अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते, आ. जयप्रकाश मुंदडा, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. रामराव वडकुते, सीईओ मधुकर आर्दड, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९६८.५० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करावयाचे असल्याचे सांगण्यात आले. सध्या १३ हजार शेतकऱ्यांचे ६८ कोटींचे पुनर्गठन झाले. केवळ १७ टक्के शेतकऱ्यांना कर्ज वाटले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक अपेक्षित कर्जवाटप करीत नसल्याचा मुद्दा समोर आला. या दोन्ही बँकेची आर्थिकस्थिती चांगली नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र ती चांगली असल्याचे समोर असल्याचे कर्ज वाटपाचा आदेश दिला. राष्ट्रीयीकृत सर्वच बँकांची कर्जवाटपाचा टक्का कमी आहे. त्यांनी व इतर सर्व बँकांनी २० जूनपर्यंत कर्जवाटप पूर्ण न केल्यास कठोर कारवाईचा आदेशही त्यांनी दिला.पीककर्जासाठी सर्च रिपोर्टचा मुद्दा आ. मुंदडा यांनी उपस्थित केला. त्यावेळी कुणीही फेरफार अथवा सर्च रिपोर्ट मागू नये. असे आदेशित केले तर दलालांच्या सुळसुळाटाबाबत आ. मुटकुळे यांनी आरोप केला होता. तर आ. वडकुते यांनी सेनगावात २०० शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा चढवूनही कर्ज वाटप झाले नसल्याचा आरोप केला.हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. अ‍ॅक्सीस, आयसीआयसीआय आदी खाजगी बँका पीककर्ज अजिबात देत नाहीत, अशीही सर्वात्रिक तक्रार होती. त्यावरही पालकमंत्र्यांनी या बँका येथे व्यवसाय करत असतील तर त्यांनी कर्ज दिलेच पाहिजे, असे ठासून सांगितले. अन्यथा परवाना रद्द करू, असे बजावले.आमदार घेणार मेळावेपीककर्ज वाटपाचे काम गतिमान होण्यासाठी सर्व आमदार तालुक्याला बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कर्जमेळावे घेतील, असे पालकमंत्र्यांनी जाहीर केले. यापूर्वी त्यांनी चावडी बैठका घेतील, असे सांगितले होते. तसा प्रकार यावेळी झाला तर शेतकऱ्यांनी कर्ज मिळणे दुरापास्तच आहे. कारण दुष्काळ मदतीचे २० ते २५ कोटीचे वाटप अजून बाकी आहे.(जिल्हा प्रतिनिधी)