शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

मापात फेरफार करणार्‍यांना अभय

By admin | Updated: May 25, 2014 01:30 IST

औरंगाबाद : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे विभागीय कार्यालय उपनियंत्रक वैधमानपशास्त्र, सहायक नियंत्रक व निरीक्षक वैधमानपशास्त्र कार्यालय सहजपणे नागरिकांना सापडत नाही.

 औरंगाबाद : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे विभागीय कार्यालय उपनियंत्रक वैधमानपशास्त्र, सहायक नियंत्रक व निरीक्षक वैधमानपशास्त्र कार्यालय सहजपणे नागरिकांना सापडत नाही. पर्यायाने या कार्यालयांपर्यंत तक्रारी पोहोचत नाहीत व भ्रष्टाचार करणार्‍यांना आपोआप अभय मिळत आहे. जिल्ह्यातील किराणा दुकान, लहान हॉटेल, भाजी विके्रते, कापूस, ज्वारी, बाजरी, गहू व्यापार्‍यांच्या मापांची तपासणी हा विभाग करीत आहे. जिल्हा व शहरात अनेक दुकानदार विक्रेते प्रमाणित मापे वापरत नाहीत. एक किलो, अर्धा किलो, २५०, १००, ५० व २० ग्रॅमच्या वजनांची वैधमापनशास्त्र विभागाकडून मंजुरी घेत नाहीत. लिटरच्या मापाला खालून ठोकलेले असण्याची शक्यता असते. या विक्रेत्यांच्या तक्रारी करण्यासाठी ग्राहकांना ही दोन्ही कार्यालये सहजपणे सापडत नाहीत. २०१३-१४ या वर्षात सहायक नियंत्रक कार्यालयाकडे ग्राहकांच्या फक्त आठ तक्रारी आल्या आहेत. ग्राहकांनो जागरूक व्हा, असे सरकार वारंवार सांगत असले तरी फसवणूक झालेल्यांना तक्रार करण्यासाठी संबंधित कार्यालय सापडत नाही. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, विक्रेत्याकडून वजनानुसार वस्तू मिळाव्यात, व्यापार्‍यांकडून मापात फेरफार होऊ नये म्हणून शासनाने १९५८ मध्ये वजनमापे विभाग स्थापन केला. जिल्ह्याच्या ठिकाणी विभागाचे स्वत:चे व काही ठिकाणी ते भाडेतत्त्वावर घेतलेले आहे. औरंगाबादेत वजनमापे विभागाची तीन कार्यालये आहेत. मात्र, तिन्ही कार्यालये अडगळीला असल्याने ग्राहक त्यांच्यापर्यंत तक्रार करण्यास पोहोचतच नाहीत. विभागीय कार्यालय उपनियंत्रक वैधमानपशास्त्र, मराठवाडा सांस्कृतिक मंडळ रोड, ज्युबिली पार्क येथे आहे. कार्यालय बंगल्यात असल्यामुळे येथे आहे का नाही, असा प्रश्न आहे. सहायक नियंत्रक कार्यालय मध्यवर्ती सुविधा इमारत, सिडको एन-७ येथे आहे. या कार्यालयाचा फलक झाडांच्या आड असल्यामुळे जवळ जाऊनही कार्यालय सापडत नाही. विशेष म्हणजे ही इमारत विभागाच्या मालकीची आहे. निरीक्षक, वैधमापनशास्त्र विभाग १, २, ३, जबिंदा कॉर्नर, देवानगरी, दर्गारोड, शहानूरवाडी येथे आहे. येथे जाण्यासाठी ग्राहकांना दोन ते तीन वेळा रिक्षा बदलावी लागते. कार्यालय भूमिगत असल्यामुळे दिसत नाही. दुकानदारांकडून मापात फेरफार करून ग्राहकांची फसवणूक अनेक ठिकाणी केली जात आहे. तक्रार करण्यासाठी वजनमापे विभागाची कार्यालये सापडत नाहीत. त्यामुळे तक्रारदारांची अडचण होत आहे. विभागाने मोक्याच्या ठिकाणी कार्यालय घ्यावे. -संपत रोडगेवजनमापे विभाग सापडत नसल्यामुळे तक्रारदार तेथे जाऊ शकत नाहीत. यामुळे ग्राहकांचे संरक्षण होत नाही. त्यामुळे या विभागाचा उपयोग काय? असा प्रश्न नागरिक विचार आहेत. शासनाला वैधमापनशास्त्र विभागामार्फत वर्षाला लाखो रुपये महसूल मिळतो तरी कार्यालये अडगळीच्या जागी का? ग्राहकांची विळवणूक व फसवणूक कधी थांबणार?२०१३ -१४ वर्षात कार्यालयाकडे ग्राहकांनी केलेल्या आठ तक्रारींसंदर्भात चौकशी केली असता पाच दुकानदार दोषी आढळले. त्यांच्यावर कारवाई झाली आहे. तीन तक्रारी खोट्या आढळल्या. -र.धों. दराडे, सहायक नियंत्रक, वैधमापनशास्त्र