शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

प्रशासकीय राजवटीत नागरिकांच्या कामाला बगल; अधिकारी-कर्मचारी करतात टोलवाटोलवी

By विजय सरवदे | Updated: August 22, 2024 18:31 IST

ऑन दी स्पॉट: नागरिक म्हणतात, पदाधिकाऱ्यांची गरज

छत्रपती संभाजीनगर : प्रशासकीय राजवटीत झटपट कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती. पण, ती फोल ठरली आहे. जिल्हा परिषदेत आता सदस्य, पदाधिकाऱ्यांची खरंच गरज आहे. हीच मंडळी प्रशासनाच्या मानगुटीवर बसून कामे करून घेऊ शकतात, अशा बोलक्या प्रतिक्रिया मंगळवारी जिल्हा परिषदेत कामांसाठी आलेल्या विविध नागरिकांच्या आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना हे दुपारी १ वाजेपर्यंत कार्यालयात नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत होते; पण मधूनच त्यांना फोन आला आणि ते एका तातडीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निघून गेले. दुसरे अधिकारी अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये व्यस्त होते. त्यामुळे आमच्या व्यथा कोणापुढे मांडाव्या, असे अनेक जण सांगत होते. मंगळवारी जि. प. मुख्यालयात गर्दी झाली होती. यात काही सरपंच, ठेकेदार, पेन्शनधारक, सामान्य नागरिक तसेच काही दलालदेखील दिसून आले. प्रातिनिधिक स्वरूपात काही जणांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा समोर आलेली वस्तुस्थिती अशी,

कोणीच व्यवस्थित बोलत नाहीतग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी रस्ते, ड्रेनेज लाईन यासारखी विकासकामांची बोगस बिले उचलली आहेत. यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. आयुक्तालयाने जि. प. प्रशासनाकडून उत्तर मागितले होते. त्यासंबंधीची विचारणा करण्यासाठी आलो होतो; पण इथे कोणीच व्यवस्थित बोलत नाही. टोलवाटोलवीची उत्तरे देऊन बोळवण करतात. सामान्य माणसांची कामे करणारी संस्था म्हणून जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. मात्र, आमचा भ्रमनिराश झाला.-महादेव ठोके, कोळी बोडखा, ता. पैठण

कामे केली; पण बिले निघत नाहीत‘जलजीवन मिशन’अंतर्गत आमच्या ग्रामपंचायतीने गावात कामे केली; पण अद्याप या कामाचे बिल निघालेले नाही. मध्यंतरी ६ कोटी रुपयांचा निधी पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाला होता. त्यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आलो होतो. मात्र, क्रमवारीने बिले अदा केली जात असल्याचे सांगण्यात आले.-अमोल काकडे, सरपंच, पोखरी

मर्जीतल्या ठेकेदारांचे भरणपोषणजिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून मर्जीतल्या मोजक्या ठेकेदारांचेच भरणपोषण केले जात आहे. सामान्य ठेकेदारांना येथे वावच नाही. अनेक कामांच्या प्रशासकीय मान्यता (प्रमा) दडवून ठेवल्या जातात. ‘प्रमा’ मिळाली नाही, तर निविदा भरता येत नाही. त्यामुळे आपोआप स्पर्धेतून बाहेर राहावे लागते. ही मोठी साखळी आहे. सदस्य मंडळ, पदाधिकारी अस्तित्वात नसल्यामुळे सध्या अधिकारी राज सुरू आहे.-अमित वाहुळ, कंत्राटदार

पेन्शनर्सबद्दलही आपुलकी नाहीरजा रोखीकरण, ग्रॅज्युएटी, सातव्या वेतन आयोगाचा हप्ता आदी विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक कधी करणार, याबद्दल विचारणा करण्यासाठी वयोमानानुसार पेन्शनर्स सतत चकरा मारू शकत नाहीत. नियमानुसार प्रशासनाने दोन-तीन महिन्यांतून एकदा पेन्शन अदालत घेतली पाहिजे. ४ मे २०२३ नंतर जि. प.मध्ये पेन्शन अदालत झाली झालीच नाही. बघू, घेता येईल, अशी उत्तरे अधिकारी देत आहेत.-वसंत सबनीस, अध्यक्ष, पेन्शनर्स असोसिएशन

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद