शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

‘आम आदमी’ कासवगतीने

By admin | Updated: November 16, 2014 23:38 IST

उस्मानाबाद : शासनाने २००७ मध्ये सुरु केलेल्या आम आदमी विद्यार्थी योजना जिल्ह्यामध्ये कासवगतीने सुरु आहे. जिल्ह्यासाठी ४७ हजार ३७६ इतके उद्दीष्ट दिले असता,

उस्मानाबाद : शासनाने २००७ मध्ये सुरु केलेल्या आम आदमी विद्यार्थी योजना जिल्ह्यामध्ये कासवगतीने सुरु आहे. जिल्ह्यासाठी ४७ हजार ३७६ इतके उद्दीष्ट दिले असता, आजवर अवघ्या ८ हजार ९४७ विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरली आहेत. तर १० हजाराच्या आसपास आवेदनपत्रही महा आॅनलाईनकडे पडून आहे. त्यामुळे उद्दीष्ट प्राप्तीसाठी आणखी ३० हजार ३२५ विद्यार्थ्यांचा शोध संबंधित यंत्रणेला घ्यावा लागणार आहे.ग्रामीण भागातील १८ ते ५९ वयोगटातील भूमिहीन, एक हेक्टर बागायती व दोन हेक्टर कोरडवाहू जमीनधारक कुटुंबप्रमुखांना विमा संरक्षण देण्याच्या उद्देशाने आम आदमी विमा योजना हाती घेण्यात आली. भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून लाभार्थ्यांचा विमा उतरविण्यात येतो. या योजनेच्या माध्यमातून विमाधारक कुटुंब प्रमुखाचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्यास ३० हजार रुपये. अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास ३७ हजार ५०० तर दोन्ही हातपाय निकामी झाल्यास ७५ हजार रुपये दिले जातात. त्याचप्रमाणे विमाधारकाच्या इ. ९ वी ते १२ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या दोन आपत्यास प्रतिमहा १०० रुपयाप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते. इतर योजनांचा लाभ घेत असला तरी संबंधित लाभार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून ही योजना महत्वाची असली तरी याकडे स्थानिक प्रशासनाकडून फारसे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यासाठी ४७ हजार ३७६ विद्यार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दीष्ट दिले होते. त्यापैकी प्रशासनाकडून १७ हजार ५१ विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महा-आॅनलाईनकडे सादर केली होती. मात्र येथून अवघी ८ हजार ९४७ विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरण्यात आली आहेत. आजही ९ ते १० हजाराच्या आसपास आवेदनपत्र महा-आॅनलाईनकडे पडून आहेत. त्यामुळे आणखी ३० हजार ३२५ विद्यार्थ्यांचा प्रशासनाला शोध घेवून त्यांना या योजनेत समाविष्ट करायचे आहे. यासाठी डिसेंबर अखेर ही डेडलाईन आहे. दरम्यान, यापुढे विशेष घटक योजनेचा लाभ मिळाला किंवा नाही, हे पाहण्यासाठी थेट लाभार्थ्यांचे मेळावे घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)योजनेची कासवगती लक्षात घेता महसूल विभाग, समाज कल्याण आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव ग.कि.वाघ यांनी मुख्याध्यापक, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आम आदमी योजनेचा लाभ गरजुंपर्यंत पर्यंत पोहचवा, असे आवाहन करतानाच या योजनेची जनजागृती करण्याची जबाबदारी महसूल, शिक्षण आणि समाजकल्याण विभागाची असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. योजना राबविताना येणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार राजश्री मुळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकीरडे, समाजकल्याण अधिकारी मिनगिरे, नायब तहसीलदार राजेश जाधव यांची उपस्थिती होती.आम आदमी योजनेचा लाभ घेण्यासाठी भूमिहीन असल्याचा पुरावा (पाच एकरापेक्षा कमी जिरायती आणि अडीच एकरपेक्षा कमी बागायती जमीनधारक), मुले इयत्ता ९ वी ते १२ वी इयत्तेत शिकत असल्याचा पुरावा (बोनाफाईड दाखला, किंवा गुणपत्रिका) गरजेचा आहे. ४याबाबतच्या अधिक माहितीसाठी संबंधितांनी शाळेचे मुख्याध्यापक, गावचे तलाठी अथवा तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कार्यशाळेत करण्यात आले.