शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

आद्या-आरोही होणार ब्रह्मवादिनी; दोन सख्ख्या बहिणींची होणार मौंज

By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 10, 2024 20:16 IST

मुलींच्या मौंजीविषयी शास्त्राधार ‘कूर्मपुराणात’ दिला आहे; मराठवाड्यात प्रथमच दोन सख्ख्या बहिणींची मौंज होत आहे.

छत्रपती संभाजीनगर : नमस्कार, आज आम्ही आमच्या मुलींच्या मौंजचे आमंत्रण देण्यासाठी आलो आहोत. अरे, असे आश्चर्यचकित होण्यासारखे काय झाले? ..तुम्ही बरोबर ऐकले, आमच्या ‘आद्या’ आणि ‘आरोही’ या दोघींची मौंज... हे ऐकून तुमची उत्सुकता वाढल्याचे दिसत आहे. आपल्या वैदिक हिंदू धर्मात मुलगा व मुलगी असा भेदच मुळी केलेला नाही. मध्यंतरीच्या काळात मुलींची मौंज करण्याची प्रथा बंद झाली होती; पण आता मुलांप्रमाणे मुलींची मौंजही केली जात आहे, असे निमंत्रण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

छत्रपती संभाजीनगरात बीड बायपासवरील रहिवासी अजिंक्य व आराध्या यांच्या दोन्ही सुकन्यांचा ‘उपनयन संस्कार’ दि. ११ फेब्रुवारीला होत आहे. या मौंजीबद्दल शहरात चर्चा होत आहे. मराठवाड्यात दोन्ही सख्ख्या बहिणींवर ‘उपनयन संस्कार’ होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.

आतापर्यंत ४८ मुलींची मौंज लावणाऱ्या कोल्हापूरच्या पंडितांना आमंत्रणमुलींची मौंज लावण्याची प्रथा मराठवाड्यात नवीन असली तरी कोल्हापूर, पुणे येथे ही जुनी प्रथा पुन्हा नव्याने रुजली आहे. कोल्हापूरचे विद्यावाचस्पती संस्कृत पारंगत वेदमूर्ती मुदूल जोशी यांनी आतापर्यंत ४८ मुलींचे ‘उपनयन संस्कार’ केले आहेत. आता ‘आद्या’ (वय ८ ) आणि ‘आरोही’ (वय ५) यांचे उपनयन संस्कार करून ते अर्धशतक पूर्ण करतील.

मुलाच्या व मुलींच्या मौंजीत काय फरक?मुलगा-मुलगी१) मुलांना ‘बटू’ म्हणतात - मुलींना ‘ब्रह्मवादिनी’ म्हणतात२) मुलांचे मुंडण करतात- मुलींचे मुंडण नसते, चौल संस्कार, प्रायश्चित्त असते.३) पांढऱ्या धाग्याचे जानवे घालतात - मुलीसाठी यज्ञोपवित ‘लाल’ रंगाचे असते.४) मूल जानवे डाव्या खांद्याकडून उजवीकडे कंबरेपर्यंत परिधान करतात.--- मुली लाल रंगाचे जानवे माळेप्रमाणे गळ्यात घालतात.

‘कूर्मपुराणात’ माहितीमुलींच्या मौंजीविषयी शास्त्राधार ‘कूर्मपुराणात’ दिला आहे. जसा मुलाला उपनयनानंतर ‘वेदाध्ययनाचा’ अधिकार आहे. तसाच तो अधिकार मुलीलादेखील आहे. ‘ज्ञान’ लिंग, वय, वर्णभेद करत नाही. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा या वैदिका विदुषींचे उपनयन केल्याचा व त्यांनी आपल्या ज्ञानाने वैदिक परंपरेत ठसा उमटवल्याचा उल्लेख आहे.

मुलींच्या व्रतबंधनाची पद्धत पुन्हा सुरूआज या जगात मुलीही मुलाप्रमाणे पूर्णत: स्वावलंबी जीवन जगत आहेत. पूर्वापार चालत आलेली मुलींच्या व्रतबंधनाची पद्धत काही काळाने काही कारणात्सव बंद पडली. गुरुजींनी आम्हाला मुलींच्या मौंजीबद्दल सांगितले. ते मला पटले. माझ्या आई-वडिलांनी तशी इच्छा व्यक्त केली आणि आम्ही माझ्या दोन्ही मुलींची मौंज करण्याचे ठरविले.-अजिंक्य दलाल

संक्षिप्त:१) मराठवाड्यात प्रथमच दोन सख्ख्या बहिणींची मौंज होत आहे.२) आर्य समाजाच्या वतीने दि. १७ ऑगस्ट २०१६ मध्ये शहरात विविध जातींच्या ३० मुलींवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले होते.३) पुणे, कोल्हापूर येथे मुलींवरील उपनयन संस्कार केले जात आहेत.४) उत्तर प्रदेशात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्रीश्री रविशंकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली काही वर्षांपासून मुलींवर उपनयन संस्कार केले जात आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक