शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आद्या-आरोही होणार ब्रह्मवादिनी; दोन सख्ख्या बहिणींची होणार मौंज

By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 10, 2024 20:16 IST

मुलींच्या मौंजीविषयी शास्त्राधार ‘कूर्मपुराणात’ दिला आहे; मराठवाड्यात प्रथमच दोन सख्ख्या बहिणींची मौंज होत आहे.

छत्रपती संभाजीनगर : नमस्कार, आज आम्ही आमच्या मुलींच्या मौंजचे आमंत्रण देण्यासाठी आलो आहोत. अरे, असे आश्चर्यचकित होण्यासारखे काय झाले? ..तुम्ही बरोबर ऐकले, आमच्या ‘आद्या’ आणि ‘आरोही’ या दोघींची मौंज... हे ऐकून तुमची उत्सुकता वाढल्याचे दिसत आहे. आपल्या वैदिक हिंदू धर्मात मुलगा व मुलगी असा भेदच मुळी केलेला नाही. मध्यंतरीच्या काळात मुलींची मौंज करण्याची प्रथा बंद झाली होती; पण आता मुलांप्रमाणे मुलींची मौंजही केली जात आहे, असे निमंत्रण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

छत्रपती संभाजीनगरात बीड बायपासवरील रहिवासी अजिंक्य व आराध्या यांच्या दोन्ही सुकन्यांचा ‘उपनयन संस्कार’ दि. ११ फेब्रुवारीला होत आहे. या मौंजीबद्दल शहरात चर्चा होत आहे. मराठवाड्यात दोन्ही सख्ख्या बहिणींवर ‘उपनयन संस्कार’ होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.

आतापर्यंत ४८ मुलींची मौंज लावणाऱ्या कोल्हापूरच्या पंडितांना आमंत्रणमुलींची मौंज लावण्याची प्रथा मराठवाड्यात नवीन असली तरी कोल्हापूर, पुणे येथे ही जुनी प्रथा पुन्हा नव्याने रुजली आहे. कोल्हापूरचे विद्यावाचस्पती संस्कृत पारंगत वेदमूर्ती मुदूल जोशी यांनी आतापर्यंत ४८ मुलींचे ‘उपनयन संस्कार’ केले आहेत. आता ‘आद्या’ (वय ८ ) आणि ‘आरोही’ (वय ५) यांचे उपनयन संस्कार करून ते अर्धशतक पूर्ण करतील.

मुलाच्या व मुलींच्या मौंजीत काय फरक?मुलगा-मुलगी१) मुलांना ‘बटू’ म्हणतात - मुलींना ‘ब्रह्मवादिनी’ म्हणतात२) मुलांचे मुंडण करतात- मुलींचे मुंडण नसते, चौल संस्कार, प्रायश्चित्त असते.३) पांढऱ्या धाग्याचे जानवे घालतात - मुलीसाठी यज्ञोपवित ‘लाल’ रंगाचे असते.४) मूल जानवे डाव्या खांद्याकडून उजवीकडे कंबरेपर्यंत परिधान करतात.--- मुली लाल रंगाचे जानवे माळेप्रमाणे गळ्यात घालतात.

‘कूर्मपुराणात’ माहितीमुलींच्या मौंजीविषयी शास्त्राधार ‘कूर्मपुराणात’ दिला आहे. जसा मुलाला उपनयनानंतर ‘वेदाध्ययनाचा’ अधिकार आहे. तसाच तो अधिकार मुलीलादेखील आहे. ‘ज्ञान’ लिंग, वय, वर्णभेद करत नाही. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा या वैदिका विदुषींचे उपनयन केल्याचा व त्यांनी आपल्या ज्ञानाने वैदिक परंपरेत ठसा उमटवल्याचा उल्लेख आहे.

मुलींच्या व्रतबंधनाची पद्धत पुन्हा सुरूआज या जगात मुलीही मुलाप्रमाणे पूर्णत: स्वावलंबी जीवन जगत आहेत. पूर्वापार चालत आलेली मुलींच्या व्रतबंधनाची पद्धत काही काळाने काही कारणात्सव बंद पडली. गुरुजींनी आम्हाला मुलींच्या मौंजीबद्दल सांगितले. ते मला पटले. माझ्या आई-वडिलांनी तशी इच्छा व्यक्त केली आणि आम्ही माझ्या दोन्ही मुलींची मौंज करण्याचे ठरविले.-अजिंक्य दलाल

संक्षिप्त:१) मराठवाड्यात प्रथमच दोन सख्ख्या बहिणींची मौंज होत आहे.२) आर्य समाजाच्या वतीने दि. १७ ऑगस्ट २०१६ मध्ये शहरात विविध जातींच्या ३० मुलींवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले होते.३) पुणे, कोल्हापूर येथे मुलींवरील उपनयन संस्कार केले जात आहेत.४) उत्तर प्रदेशात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्रीश्री रविशंकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली काही वर्षांपासून मुलींवर उपनयन संस्कार केले जात आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक