शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरमध्ये ३२ वर्षांपूर्वी टेकऑफ घेताच कोसळले होते विमान, कर्तबगारांना हिरावून नेणाऱ्या दुर्घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या : अपघातात ५५ जणांचा झाला होता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 09:53 IST

Plane Crash In Chhatrapati Sambhajinagar: अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाचे विमान कोसळल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. या भीषण घटनेमुळे ३२ वर्षांपूर्वी म्हणजे २६ एप्रिल १९९३ मध्ये छत्रपती संभाजीनगरात कर्तबगारांना हिरावून नेणाऱ्या विमान अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या. या अपघातात ५५ जणांचा मृत्यू झाला होता.

छत्रपती संभाजीनगर - अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाचे विमान कोसळल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. या भीषण घटनेमुळे ३२ वर्षांपूर्वी म्हणजे २६ एप्रिल १९९३ मध्ये छत्रपती संभाजीनगरात कर्तबगारांना हिरावून नेणाऱ्या विमान अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या. या अपघातात ५५ जणांचा मृत्यू झाला होता.

इंडियन एअरलाइन्सच्या दिल्ली-जयपूर-उदयपूर-छत्रपती संभाजीनगर-मुंबई विमानाने मुंबईसाठी उड्डाण घेतले होते. मात्र, उड्डाणासाठी आवश्यक उंची विमानाला गाठता आली नाही. त्यामुळे धावपट्टीला लागूनच असलेल्या बीड महामार्गावरील उभ्या उंच ट्रकला विमानाचे मागील चाक चाटून गेले. विमानाचे उड्डाण पाहण्यासाठी चालकाने तेथे हा ट्रक उभा केला होता. त्यात कापसाच्या गाठी होत्या. ट्रकला चाटून गेल्यानंतर विमानाचे मागील एक चाक निखळून पडले. पुढे चिकलठाणा परिसरातील उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीवर विमान आदळले व भरकटत जाऊन एका शेतात पडले. त्यानंतर त्याचे तुकडे होऊन आग लागली होती.

विमानाच्या मागील भागातील सर्व, तर समोरच्या भागातील काही प्रवासी मृत्युमुखी पडले. यातील काहीजण जळून, तर काही गुदमरून मृत्यू पावले. छत्रपती संभाजीनगरच्या जडणघडणीत  मोलाचा वाटा असलेल्या व्हिडिओकाॅनचे नंदलाल धूत, ए. डी. जोशी, पी. यू. जैन-ठोले, हाॅटेल गुरूचे जव्हारानी, राजेंद्र मोटार्सचे दीपक मुनोत, व्ही. ए. जाधव यांच्यासह ५५ जणांचा दुर्दैवी मृत्यू शहरवासीयांच्या मनाला चटका लावून गेला. 

विमान जुने होते, रनवे छोटा होता...या अपघातात जे काही बोटावर मोजण्या इतके प्रवासी वाचले त्यातील मी एक आहे. तो कडक उन्हाचा दिवस होता. तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सियस होते. हवा विरळ होती. विमान जुने होते, रनवे छोटा होता. मात्र, आज गुजरातमध्ये विमान अपघात झाला तेव्हा विमान टेकऑफ करुन ६२५ फूट उंचीवर पोहोचले होते. सुरुवात चांगली झाली. टेकऑफ नंतरची उंचीही समाधानकारक गाठली होती. पण नंतर इंजिनची ताकद कमी पडली असावी, तांत्रिक किंवा संगणकीय बिघाड झाला असावा. जगात दररोज १० लाख टेकऑफ व लॅंडिंग होतात पण त्यात कधी तरी एखादा अपघात होतो. त्यामुळे विमानाचा प्रवास आजही सुरक्षितच आहे. पण विमान अपघात झाल्यावर कोणीच वाचत नाही, हे सुद्धा तेवढेच सत्य आहे.- अनिल भालेराव; देवगिरी प्रांत संघचालक 

विमानाचे तीन तुकडे, उड्या मारून बाहेर पडलेले प्रवासी सुदैवाने सुखरूप३२ वर्षांपूर्वीच्या या दुर्घटनेत ५३ प्रवासी आणि २ कर्मचारी अशा ५५ जणांचा बळी गेला होता. विमानाचे तीन तुकडे झाले होते. या तुकड्यांतून पटापट उड्या मारून बाहेर पडलेले प्रवासी सुदैवाने सुखरूप राहिले. विमान अपघाताचे रंगीत छायाचित्र दुसऱ्या दिवशीच्या अंकात केवळ ‘लोकमत’मध्येच प्रसिद्ध झाले होते. दुर्घटनेनंतरचे हे पहिले छायाचित्र ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी स्वत: कॅमेऱ्यात टिपले हाेते.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबाद