शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

चिंतेची बाब; उच्च शिक्षणाकडे तरुणाईची पाठ, ‘ग्रॉस एनरोलमेंट रेशो’त महाराष्ट्र आठव्या स्थानी

By प्रसाद आर्वीकर | Updated: February 9, 2024 17:39 IST

एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या याचे प्रमाण दरवर्षी निश्चित केले जाते. त्यावरून प्रत्येक राज्याचा ‘ग्रॉस एनरोलमेंट रेशो’ (जीईआर) ठरविला जातो.

नांदेड : पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा राज्याचा रेशो ३४.९ इतका कमी असून, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आठव्या स्थानावर फेकला गेला आहे. पदवी प्रवेशाचे घटते प्रमाण या सर्वेक्षणातून समोर येत असून, विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाकडे वळावे, यासाठी शिक्षण विभागाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या याचे प्रमाण दरवर्षी निश्चित केले जाते. त्यावरून प्रत्येक राज्याचा ‘ग्रॉस एनरोलमेंट रेशो’ (जीईआर) ठरविला जातो. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानंतर देशातील सर्व राज्यांचा जीईआर जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य देशात आठव्या क्रमांकावर आहे. चंडीगडमध्ये जीईआर सर्वाधिक ६६.१ एवढा आहे. याचाच अर्थ चंडीगडमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. दिल्ली, तामिळनाडू, केरळ, उत्तराखंड या राज्यांचा जीईआर अधिक आहे. त्यामुळे राज्यात उच्च शिक्षणाकडे विद्यार्थी पाठ का फिरवतात. बारावीनंतर पुढील प्रवेशासाठी विद्यार्थी गळती का होते? याचा शोध उच्च शिक्षण विभागाकडून घेतला जात आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत.

कोरोनानंतर परिस्थिती बदलली का?२०२० मध्ये देशात कोरोनाचे संकट निर्माण झाले होते. या संकटात अनेक बदल झाले. शिक्षण पूर्ववत झाले. पण, त्यानंतर परिस्थिती बदलली असल्याचे संस्थेच्या अहवालावरून दिसत आहे. राज्यात २०१९-२० मध्ये पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी १३ लाख ६४ हजार ४४८ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी ९२ टक्के म्हणजे १२ लाख ५७ हजार ७५६ विद्यार्थ्यांनी पदवीचे प्रवेश घेतले. यावर्षी केवळ ८ टक्के जागा रिक्त होत्या. मात्र, २०२०-२१ मध्ये पदवीसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रमाण ७७.९ टक्के असून, २२ टक्के जागा रिक्त राहिल्या. तर २०२१-२२ मध्ये यात थोडी वाढ झाली. ७९ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि २१ टक्के जागा रिक्त राहिल्या.

राज्यनिहाय जीईआरचंडीगड : ६६.१दिल्ली : ४७.६तामिळनाडू : ४६.९उत्तराखंड : ४५.७सिक्कीम : ३९.९तेलंगणा : ३९.१महाराष्ट्र : ३४.९

टॅग्स :Educationशिक्षणNandedनांदेड