शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दोन लाखांचे कर्ज; वर्षाला पाच टक्के व्याज; पिढीजात व्यावसायिकांना पीएम विश्वकर्मा योजना वरदान

By प्रशांत तेलवाडकर | Updated: October 27, 2023 12:59 IST

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कारागिरांना करावी लागणार प्रतीक्षा

छत्रपती संभाजीनगर : देशात असे कोट्यवधी कारागीर आहेत जे आपला खानदानी व्यवसाय तेवढ्याच नेटाने करत आहेत. त्यांच्याकडे पारंपरिक कौशल्य आहे, त्या व्यवसायाला लागणारे साहित्य खरेदीसाठी मुबलक रक्कम नाही. अशा कारागिरांसाठी केंद्र सरकारने ‘पंतप्रधान विश्वकर्मा योजना’ सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खानदानी कारागिरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण, योजनेसाठी पहिल्या टप्प्यात आपल्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला नाही.

काय आहे पी.एम.विश्वकर्मा योजना?ज्यांचे खानदानी व्यवसाय आहेत. जसे लोहार, सोनार, कुंभार, सुतार, मोची अशा १८ पारंपरिक व्यवसायांचा समावेश पी.एम. विश्वकर्मा योजनात समावेश होतो. यात केवळ कर्जच नाही तर कौशल्य प्रशिक्षणही मिळणार आहे. प्रशिक्षण कालावधीत स्टायपेंडही देण्यात येणार आहे.

व्याजदर कमीकर्ज मंजूर होण्याआधी खानदानी कारागिरांना ७ दिवसांचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर साहित्य खरेदीसाठी पहिल्या टप्प्यात १ लाख रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. ते कर्ज परतफेड केले की, लगेच २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येईल. विशेष म्हणजे वर्षाला ५ टक्के व्याजदर आकारला जाईल.

कोणाला मिळते कर्ज१) १८ पारंपरिक व्यवसायातील खानदानी कारागिर या योजनेचा फायदा घेऊ शकतात.२) लाभार्थीचे वय १८ वर्षापेक्षा जास्त आणि ५० वर्षांपेक्षा कमी असावे.३) मान्यताप्राप्त संस्थेचे संबधित ट्रेडचे प्रमाणपत्र असावे.

कागदपत्रे काय लागतात ?या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, बँक पासबुक आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.

ऑनलाइन अर्ज कसा कराल ?अधिकृत बेवसाइट pmvishwakarma.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे.

पिढीजात कारागिरांना सुवर्णसंधीपीएम विश्वकर्मा योजना पिढीजात व्यवसाय करणाऱ्या कारागिरांसाठी व्यवसायवाढीसाठी सुवर्णसंधी आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगरसह आणखी ७ जिल्ह्यांचा समावेश नाही. मात्र, पुढील टप्प्यात समावेश होऊ शकतो. तेव्हा जिल्ह्यातील कारागिरांना या योजनेचा लाभ घेता येईल.-मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय