शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीच्या ८६४ रुपयांच्या बियाणांसाठी १२००रुपयांची मागणी; डमी ग्राहक पाठवून कृषी विभागाची कारवाई

By बापू सोळुंके | Updated: June 8, 2024 20:41 IST

सात दुकाने बंद करण्याचे आदेश, शेतकऱ्यांकडून फोन पे द्वारे १२००रुपये घेताच भरारी पथकाने दुकानदारावर कारवाई केली.

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना लुटण्याची एकही संधी व्यापारी सोडत नसल्याचा अनुभव कृषी विभागाने शनिवारी जिल्ह्यात विविध कृषी सेवा केंद्रावर पाठविलेल्या डमी ग्राहकांना आणि अधिकाऱ्यांना आला. खरीप हंगामासाठी कपाशीच्या बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करून ८६४ रुपये किंमतीच्या कपाशी बियाणासाठी शेतकऱ्यांकडून १२००रुपये उकळले जात असल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांना लुटणाऱ्या पाच दुकानदारांवर कृषी विभागाने कारवाई सुरू केली असून या दुकानांचे परवाने निलंबित करण्यात येणार आहे.

माजी कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघ असलेल्या सिल्लोड तालुक्यात कपाशी बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करून काही दुकानदार जादा दराने कपाशी बियाणांची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाच्या राज्य भरारी पथकाला मिळाली. अशा दुकानदारांविरोधात धडक कारवाई करण्यासाठी भरारी पथकाने शनिवारी सिल्लोड येथील कांचन ॲग्रो एजन्सी मध्ये डमी ग्राहक पाठवून कपाशीच्या बियाणाची मागणी केली. तेव्हा कपाशीच्या ४७५ ग्रॅम च्या एका पाकिटाची किंमत ८६४रुपये असताना बाराशे रुपयांत हे पाकिट विक्री केले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून फोन पे द्वारे १२००रुपये घेताच भरारी पथकाने दुकानदारावर कारवाई केली.

अशाच प्रकारे सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील माऊली कृषी सेवा केंद्रात राशी कंपनीच्या कपाशीच्या बियाणासाठी कृषी विभागाने पाठविलेल्या शेतकऱ्याकडून अकराशे रुपये घेतले. ही रक्कमही संबंधित दुकानदाराने फोन पे च्या माध्यमातून स्विकारली. याच गावातील बळीराजा ॲग्रो एजन्सी चालकाने अन्य एका कंपनीच्या कपाशीच्या वाणाच्या ८६४ रुपये किमतीच्या बियाणासाठी शेतकऱ्याकडून हजार रुपये उकळले. याच गावातील श्रद्धा कृषी सेवा केंद्रचालकाने तुलशी कंपनीच्या बियाणासाठी शेतकऱ्याकडून बाराशे रुपये घेतल्याचे कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. येथील साईनाथ कृषि सेवा केंद्र या विक्रेत्याने कबड्डी वाणाचा स्टॉक नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना बियाणे विक्री केले नाही. यानंतर लगेच भरारी पथकाने संबंधित दुकानाची आणि त्याच्या गोडावूनच झडती घेतली असता तेथे बियाणांची पाकिटे आढळून आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख व कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर. ए. पाटील आणि कृषी अधिकारी संजय व्यास यांनी केली.

पैठण ,कन्नड तालुक्यातही कारवाईकृषी विभागाने पैठण तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील पंचावतार कृषी सेवा केंद्रात डमी ग्राहक पाठवून कब्बडी वाणाची मागणी करण्यास सांगितले. तेव्हा दुकानदाराने १२००रुपयांत एक पाकिट विक्री केले. कन्नड तालुक्यातील पिशोर येथील भाग्यलक्ष्मी कृषी सेवा केंद्राचालकाने कबड्डी हे बियाणांचा स्टॉक असताना दुकानात बियाणे उपलब्ध नसल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. याविषयी संबंधित शेतकऱ्यांनी लेखी तक्रार करताच भरारी पथकाने पुन्हा डमी ग्राहक पाठवून खात्री केली . यानंतर दुकान आणि गोडावूनवर छापा टाकला असता तेथे संबंधित बियाणांचे सात पाकिटे आढळून आली. उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक आणि विकास पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कपाशी बियाणांच्या विशिष्ट वाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करणे आणि शेतकऱ्यांना जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील सात कृषी सेवा केंद्रचालकांना विक्री थांबविण्याचे आदेश देण्यात आले. मंगळवारी त्यांची सुनावणी घेऊन त्यांच्या दुकानांची परवाने निलंबित केली जाईल. -- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक