शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

शहरातील ९४ टक्के नागरिकांना हवेत रस्ते मोकळे; आजूबाजूला बसण्यास जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 15:16 IST

. शहरातील प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमणांचे साम्राज्य पसरले असून,नागरिकांना पायी चालणे सुद्धा अवघड झाले आहे.

ठळक मुद्देशहर विकास आराखड्यानुसार प्रत्येक रस्ता कागदावर रुंद आहे. नागरिक रस्त्यांवरील अतिक्रमणांना वैतागले आहेत.

औरंगाबाद : स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंजअंतर्गत महापालिकेने नागरिकांकडून रस्त्यांबद्दलच्या अपेक्षा जाणून घेतल्या. यात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शहरातील ९४ टक्के नागरिकांनी रस्ते मोकळे हवेत, आजूबाजूला बसण्यास छान जागा हवी. ८३ टक्के नागरिकांना मुलांसाठी रस्त्यावर सुरक्षित जागा असावी, असे वाटते.  

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीझन मिशनने सुरू केलेल्या देशव्यापी स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंजमध्ये औरंगाबाद महापालिकेने सहभाग घेतला आहे. या आव्हानाचा एक भाग म्हणून मनपा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांच्या नेतृत्वात शहरातील विविध रस्त्यांचा कायापालट करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने रस्त्याच्या बाजूला दुतर्फा सुशोभीकरण, हिरवळ, चालण्यास अनुकूल फुटपाथ करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. या आव्हानाला सामोरे जाण्यापूर्वी नागरिकांच्या आशा आकांक्षा, अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न एका सर्व्हेद्वारे केला. ऑनलाइन झालेल्या सर्व्हेमध्ये २८६ जणांनी सहभाग नोंदविला. स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंजचे प्रमुख असलेल्या एएससीडीसीएलच्या सहायक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा मोहन नायर म्हणाल्या, या सर्व्हेतून औरंगाबादेतील नागरिक रस्त्यांचा कायापालट करण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले. 

पादचाऱ्यांना वाहतुकीस अडथळा आणण्यापासून रस्ते सुरक्षित करण्याची आवश्यकता नागरिकांनी व्यक्त केली. सर्वाधिक प्रतिसाद १९ ते ३५ वर्षीय युवकांद्वारे मिळाला. ३६ ते ५० वर्षे वयोगटातील नागरिक दुसऱ्या क्रमांकावर होते. सर्व्हेतील ७८ टक्के नागरिकांना घरापासून चालण्यासाठी ५ ते १० मिनिटांच्या अंतरावर मोकळी जागा हवी आहे. फुटपाथ आणि पार्किंगसाठी एक पर्याय निवडताना ७० टक्के लोकांनी फुटपाथ निवडला आणि ३० टक्के लोकांनी रस्त्यावर पार्किंगसाठी जागा हवीय. दरम्यान, या सर्व्हेत अभिप्राय नोंदवण्यासाठी नागरिकांना अजून आठवडाभराची मुदत देण्यात आली.

अतिक्रमणांना नागरिक किती वैतागले आहेत ते बघा...शहर विकास आराखड्यानुसार प्रत्येक रस्ता कागदावर रुंद आहे. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती निराळी आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमणांचे साम्राज्य पसरले असून,नागरिकांना पायी चालणे सुद्धा अवघड झाले आहे. मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे पाठविण्याचे दायित्व मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे आहे. हा विभाग वर्षभरात किमान दहा रस्त्यांवरील अतिक्रमणे सुद्धा काढत नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यांवरील अतिक्रमणांना वैतागले आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षा