शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

लोकप्रतिनीधींकडून ९० कोटींच्या शिफारशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:04 IST

जिल्हा परिषद : ३५४ रस्त्यांची चाळण, ८९७.१३ किलोमीटरची दुरुस्ती गरजेची औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इतर जिल्हा रस्ते ...

जिल्हा परिषद : ३५४ रस्त्यांची चाळण, ८९७.१३ किलोमीटरची दुरुस्ती गरजेची

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इतर जिल्हा रस्ते विकास (५०५४) योजनेतून रस्त्यांची कामे करण्यासाठी अवघा साडेआठ कोटींचा निधी उपलब्ध आहे. आमदार, खासदारांच्या शिफारशींची या योजनेतून दखल घेतली जाते. २ मंत्री, ५ आमदार, २ खासदारांकडून ९० कोटींच्या रस्त्यांची दुरुस्ती व नव्या कामांची मागणी करण्यात आली असून उपलब्ध निधीत कुणाला प्राधान्य द्यावे, असा पेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागापुढे निर्माण झाला आहे.

अतिवृष्टीमुळे नऊ तालुक्यांतील ३५४ रस्त्यांचे ८९७.१३ किलोमीटर रस्त्यांचे, तर ३५५ नळकांडी पुलांचे नुकसान झाले. रस्ते दुरुस्तीसाठी ९५.०५ कोटी, तर पुलांसाठी ३०.०८ कोटींचा अंदाजित खर्च लागणार आहे. तसेच ६१ नव्या पुलांची बांधणी गरजेची असून त्यासाठी २.९५ कोटींचा खर्च अपेक्षित असून असा ७७० पुनर्बांधणीसाठी १२८ कोटी ५९ लाख ३० हजार रुपयांचा खर्च लागणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात आला मात्र, त्यासाठी निधीची कमतरता आहे. यावर्षी ५०५४ हेडमध्ये साडेआठ कोटींचा निधी मंजूर आहे. त्यातून कामे करण्यासाठी आलेल्या शिफारशींत मंत्री, राज्यमंत्री यांची मर्जी सांभाळली, तर आमदारांची नाराजी, खासदारांनी झुकते माप दिल्यास सत्ताधाऱ्यांकडून बोंब, असा पेच निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींची मागणी असलेले सर्व प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे दिले, तर मंजूर नियतव्ययातून कोणती कामे करायची तीच यादी द्या, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सोमवारी याचा पेच सुटेल व नियोजन सादर करू, असे प्रभारी कार्यकारी अभियंता झेड. ए. काझी यांनी सांगितले.

--

निधी खर्चावर प्रश्नचिन्ह

मार्च महिन्याला सुरुवात झाली. अद्याप नियोजनांतूनच जिल्हा परिषद बाहेर पडली नाही. महिनाभरात मान्यता, अंदाजपत्रक, निविदा व प्रत्यक्ष काम सुरू करणे शक्य होईल असे वाटत नाही. त्यात कोरोनाचे सावट पुन्हा गडद होत असल्याने मार्चअखेरपूर्वी निधी खर्चावर प्रश्नचिन्ह कायम आहे.