शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

‘डीसीसी’साठी ९८़९५ टक्के मतदान

By admin | Updated: May 8, 2015 00:27 IST

उस्मानाबाद : जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५ जागांसाठी गुरूवारी मतदान प्रक्रिया झाली़ जिल्ह्यातील ८५७ मतदारांपैकी

उस्मानाबाद : जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५ जागांसाठी गुरूवारी मतदान प्रक्रिया झाली़ जिल्ह्यातील ८५७ मतदारांपैकी ८४८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून, ९८़९५ टक्के मतदान झाले आहे़ तर ८ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली असून, एका मतदाराला नावात बदल असल्याने मतदानापासून वंचित रहावे लागले़ राष्ट्रवादी-भाजपा विरूध्द काँग्रेस- शिवसेना अशा दुरंगी लढतीतील चुरस पाहता शनिवारी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे़आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासूनच बिनविरोधच्या चर्चेला सुरूवात झाली होती़ उस्मानाबाद ते मुंबई पर्यंत बिनविरोधसाठी चार बैठकाही झाल्या़ अर्ज मागे घेण्याच्या पूर्व संध्येला झालेल्या अखेरच्या बैठकीत जागा वाटपावर अंतीम तोडगा निघाला नाही़ त्यानंतर सत्ताधारी काँग्रेस- राष्ट्रवादी विरूध्द महायुती अशी लढत होईल, असे तर्क लावले जात असतानाच अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी- भाजपाने व काँग्रेस - शिवसेनेने एकत्रित पॅनल टाकल्याचे जाहीर केले़ जिल्ह्याचा राजकीय इतिहास पाहता राष्ट्रवादी काँग्रेसव काँग्रेसने यापूर्वी आघाडी करून जिल्हा बँकेसह इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका लढविल्या आहेत़ मात्र, वेळोवेळी होणारी काँग्रेस व शिवसेनेची छुपी आघाडी सर्वश्रूत होती़ यंदाच्या निवडणुकीत प्रथमच उघडपणे काँग्रेस-शिवसेनेने पॅनल निवडणुकीत उतरविले होते़ तर भाजपा- राष्ट्रवादीने एकत्रित येवून पॅनल उभा केला होता़ प्रचारादरम्यान राष्ट्रवादी- भाजपाकडून आ़ राणाजगजितसिंह पाटील, माजी खा़डॉ़पद्मसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी तर शिवसेना- काँग्रेसकडून आ़ मधूकरराव चव्हाण, आ़ बसवराज पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, तानाजी सावंत, माजी आ़ ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह रासपाचे आ़ महादेव जानकर यांनी प्रचारात उडी घेतली होती़ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत थेट मतदारांपर्यंत पोहचून प्रचार यंत्रणा राबविण्यात आली़ दोन्ही पॅनलकडून बँकेला शासनाकडून मदत मिळवून देण्याचा विश्वास मतदारांसह सर्वसामान्य सभासद, ठेवीदारांना प्रचारादरम्यान देण्यात आला आहे़ सर्वच गटातील मतदार आणि संस्थांवरील सत्ता पाहता विजयाचे आखाडे बांधण्यात आले आहेत़ प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थेट मतदारांशी संपर्क साधून प्रचार यंत्रणा राबविण्यात आली़ जिल्ह्यातील ८ मतदान केंद्रावर गुरूवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत ८५७ मतदारांपैकी ८४८ जणांनी मतदान केले़ जिल्ह्यात सरासरी ९८़९५ टक्के मतदान झाले़ सर्वच मतदान केंद्रावर उमेदवारांसह नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती़ जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया झाली़ पोलीस प्रशासनानेही चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता़ ३८ उमेदवारांचे भवितव्य गुरूवारी मतपेटीत बंद झाले असून, शनिवारी उस्मानाबाद येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील महसूल भवनमध्ये मतमोजणी प्रक्रिया होणार आहे़ या मतमोजणीकडे उमेदवारांसह अवघ्या जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे़(प्रतिनिधी)जिल्हा बँकेची निवडणूक राष्ट्रवादी-भाजपा विरूध्द काँग्रेस- शिवसेना अशी झाली असली तरी ८ अपक्षांनीही निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे़ यातील महेंद्र धुरगुडे यांनी सतीश दंडनाईक यांना पाठींबा दिला होता़ उर्वरित सात अपक्ष उमेदवार किती मतदान खातात याचीही चिंता संबंधित गटातील दोन्ही पॅनलधमील उमेदवारांना आहे़उमरगा तालुक्यातील सोसायटी मतदार संघातील धाकटीवाडी गावातील मतदार लक्ष्मण शिवाजी सास्तुरे यांचे मतदार यादीत लिंबाजी शिवाजी सास्तुरे असे नाव झाले होते़ त्यामुळे मतदार यादीतील नावात बदल झाल्यामुळे सास्तुरे यांना मतदानापासून वंचित रहावे लागले आहे़ उस्मानाबाद तालुक्यातील इतर शेती गटातील मतदार अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील, वाशी तालुक्यातील विकासे मधील इंदापूरचे सरपंच रमेश पाटील, पार्डी येथील विलास चौधरी, तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी येथील उत्तमराव लोमटे, तर उमरगा तालुक्यातील पुष्पा कदम, जितेंद्र शिंदे, अजय मोरे व इतर एकाने मतदानाकडे पाठ फिरविली असून, एकाच्या मतदार यादीतील नावात घोळ झाल्याने त्यांना मतदान करता आले नाही़