लातूर : शहर व जिल्ह्यातील दुष्काळ, टंचाई तक्रार निवारणासाठी वार रुमची स्थापना करण्यात आली असून, सहा दिवसात नागरिकांनी कलेल्या ८८ तक्रारींपैकी ८४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, ४ प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. या तक्रार निवारण कक्षाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, यासाठी २४ तास नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे.लातूर जिल्ह्यातील दुष्काळ आणि टंचाईची दाहकता लक्षात घेवून जिल्हाधिकारी कार्यालयात २१ मार्चपासून २४ तास नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील मराठवाडा विभागात असलेली टंचाई परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चाललेली आहे. परिणामी जनतेशी योग्य संवाद साधण्यासाठी या वार रुमची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, पशुधनांसाठी चारा वेळीच उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठी दुष्काळाची तीव्रता अधिक असलेल्या लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास मदत करण्यासाठी वार रुमची स्थापना करण्यात आली असून, त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातून दररोज नागरिकांच्या तक्रार, मागण्या आणि अडीअडचणी तातडीने सोडविण्यासाठी निर्णय घेण्यात येत आहे. १८ ते २४ एप्रिल २०१६ या कालावधीत टोली फ्री क्रमांकावरुन तथा व्हॉटसअॅपवरुन ८८ तक्रार दाखल झाल्या असून, यातील ८४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत तर ४ प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉररुममध्ये ६ दिवसांत ८८ तक्रारी
By admin | Updated: April 25, 2016 23:31 IST