शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबाद जिल्ह्यातील ८७५ अंगणवाड्या शौचालयाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:12 IST

देशभरातील अंगणवाड्यांसमोर ज्या औरंगाबाद जिल्ह्याने ‘आयएसओ’ मानांकनाचा पॅटर्न ठेवला, त्याच जिल्ह्यातील तब्बल ८७५ अंगणवाड्यांमध्ये शौचालयाची सुविधा नाही

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशभरातील अंगणवाड्यांसमोर ज्या औरंगाबाद जिल्ह्याने ‘आयएसओ’ मानांकनाचा पॅटर्न ठेवला, त्याच जिल्ह्यातील तब्बल ८७५ अंगणवाड्यांमध्ये शौचालयाची सुविधा नाही, तर कित्येक अंगणवाड्यांत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे येणाऱ्या लाखो बालके, किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा माता व सेविकांची मोठी कुचंबणा होत आहे.जिल्ह्यात ३ हजार ४७३ अंगणवाड्या कार्यरत असून, त्यामार्फत सुमारे अडीच लाख बालकांचे नियमित वजन, उंचीची नोंद केली जाते. यासोबतच अंगणवाड्यांमध्ये बालकांचे नियमित लसीकरण केले जाते व त्यांना पूर्व प्राथमिक शिक्षणही दिले जाते. अंगणवाड्यांच्या माध्यमातून किशोरी मुली, स्तनदा माता, गरोदर मातांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले जाते. आरोग्याच्या संदर्भात सेवाही दिल्या जातात. एकीकडे, हगणदारीमुक्त जिल्हा केल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेणाºया जिल्हा परिषद प्रशासनाने मात्र, अंगणवाड्यांतील शौचालयाच्या सुविधेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. अंगणवाड्यांमध्ये लहान बालकांना सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत थांबावे लागते. तेथे त्यांना पोषण आहार व अनौपचारिक शिक्षण दिले जाते. पाच तासांच्या कालावधीत बालकांना लघुशंका आणि शौचास जावे लागते; पण तेथे शौचालयाची सोय नसल्याने बालकांची मोठी गैरसोय होत असून, त्यांना उघड्यावरच बसावे लागते. अशा परिस्थितीत स्वच्छतेबाबत ही बालके कोणते संस्कार घेत असतील, असा प्रश्न उपस्थित झालाआहे.आजही ३ हजार ४७३ पैकी ११८० अंगणवाड्यांना ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे, तर १००० अंगणवाड्या ‘स्मार्ट’ झाल्या आहेत. जिल्ह्यातील २ हजार ५६१ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे, तर तब्बल ९०० अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. त्या अंगणवाड्या कुठे ग्रामपंचायत इमारतीत, समाजमंदिरात, तर कुठे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये व्हरांड्यात, पारावर, भाड्याच्या खोलीत, मंदिरात चालतात. ८७५ अंगणवाड्यांना शौचालयाची सुविधाच नाही, तर ७२२ अंगणवाड्यांमधील शौचालयांची दुरवस्था झालेली आहे. अंगणवाड्यांमध्ये शौचालये व पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विद्यमान महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी अंगणवाड्यांना पाण्याची व्यवस्था करून देण्याचे आवाहन ग्रामपंचायतींना केले आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र