शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

औरंगाबाद जिल्ह्यातील ८७५ अंगणवाड्या शौचालयाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:12 IST

देशभरातील अंगणवाड्यांसमोर ज्या औरंगाबाद जिल्ह्याने ‘आयएसओ’ मानांकनाचा पॅटर्न ठेवला, त्याच जिल्ह्यातील तब्बल ८७५ अंगणवाड्यांमध्ये शौचालयाची सुविधा नाही

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशभरातील अंगणवाड्यांसमोर ज्या औरंगाबाद जिल्ह्याने ‘आयएसओ’ मानांकनाचा पॅटर्न ठेवला, त्याच जिल्ह्यातील तब्बल ८७५ अंगणवाड्यांमध्ये शौचालयाची सुविधा नाही, तर कित्येक अंगणवाड्यांत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे येणाऱ्या लाखो बालके, किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा माता व सेविकांची मोठी कुचंबणा होत आहे.जिल्ह्यात ३ हजार ४७३ अंगणवाड्या कार्यरत असून, त्यामार्फत सुमारे अडीच लाख बालकांचे नियमित वजन, उंचीची नोंद केली जाते. यासोबतच अंगणवाड्यांमध्ये बालकांचे नियमित लसीकरण केले जाते व त्यांना पूर्व प्राथमिक शिक्षणही दिले जाते. अंगणवाड्यांच्या माध्यमातून किशोरी मुली, स्तनदा माता, गरोदर मातांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले जाते. आरोग्याच्या संदर्भात सेवाही दिल्या जातात. एकीकडे, हगणदारीमुक्त जिल्हा केल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेणाºया जिल्हा परिषद प्रशासनाने मात्र, अंगणवाड्यांतील शौचालयाच्या सुविधेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. अंगणवाड्यांमध्ये लहान बालकांना सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत थांबावे लागते. तेथे त्यांना पोषण आहार व अनौपचारिक शिक्षण दिले जाते. पाच तासांच्या कालावधीत बालकांना लघुशंका आणि शौचास जावे लागते; पण तेथे शौचालयाची सोय नसल्याने बालकांची मोठी गैरसोय होत असून, त्यांना उघड्यावरच बसावे लागते. अशा परिस्थितीत स्वच्छतेबाबत ही बालके कोणते संस्कार घेत असतील, असा प्रश्न उपस्थित झालाआहे.आजही ३ हजार ४७३ पैकी ११८० अंगणवाड्यांना ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे, तर १००० अंगणवाड्या ‘स्मार्ट’ झाल्या आहेत. जिल्ह्यातील २ हजार ५६१ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे, तर तब्बल ९०० अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. त्या अंगणवाड्या कुठे ग्रामपंचायत इमारतीत, समाजमंदिरात, तर कुठे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये व्हरांड्यात, पारावर, भाड्याच्या खोलीत, मंदिरात चालतात. ८७५ अंगणवाड्यांना शौचालयाची सुविधाच नाही, तर ७२२ अंगणवाड्यांमधील शौचालयांची दुरवस्था झालेली आहे. अंगणवाड्यांमध्ये शौचालये व पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विद्यमान महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी अंगणवाड्यांना पाण्याची व्यवस्था करून देण्याचे आवाहन ग्रामपंचायतींना केले आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र