शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

औरंगाबाद जिल्ह्यातील ८७५ अंगणवाड्या शौचालयाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:12 IST

देशभरातील अंगणवाड्यांसमोर ज्या औरंगाबाद जिल्ह्याने ‘आयएसओ’ मानांकनाचा पॅटर्न ठेवला, त्याच जिल्ह्यातील तब्बल ८७५ अंगणवाड्यांमध्ये शौचालयाची सुविधा नाही

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशभरातील अंगणवाड्यांसमोर ज्या औरंगाबाद जिल्ह्याने ‘आयएसओ’ मानांकनाचा पॅटर्न ठेवला, त्याच जिल्ह्यातील तब्बल ८७५ अंगणवाड्यांमध्ये शौचालयाची सुविधा नाही, तर कित्येक अंगणवाड्यांत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे येणाऱ्या लाखो बालके, किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा माता व सेविकांची मोठी कुचंबणा होत आहे.जिल्ह्यात ३ हजार ४७३ अंगणवाड्या कार्यरत असून, त्यामार्फत सुमारे अडीच लाख बालकांचे नियमित वजन, उंचीची नोंद केली जाते. यासोबतच अंगणवाड्यांमध्ये बालकांचे नियमित लसीकरण केले जाते व त्यांना पूर्व प्राथमिक शिक्षणही दिले जाते. अंगणवाड्यांच्या माध्यमातून किशोरी मुली, स्तनदा माता, गरोदर मातांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले जाते. आरोग्याच्या संदर्भात सेवाही दिल्या जातात. एकीकडे, हगणदारीमुक्त जिल्हा केल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेणाºया जिल्हा परिषद प्रशासनाने मात्र, अंगणवाड्यांतील शौचालयाच्या सुविधेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. अंगणवाड्यांमध्ये लहान बालकांना सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत थांबावे लागते. तेथे त्यांना पोषण आहार व अनौपचारिक शिक्षण दिले जाते. पाच तासांच्या कालावधीत बालकांना लघुशंका आणि शौचास जावे लागते; पण तेथे शौचालयाची सोय नसल्याने बालकांची मोठी गैरसोय होत असून, त्यांना उघड्यावरच बसावे लागते. अशा परिस्थितीत स्वच्छतेबाबत ही बालके कोणते संस्कार घेत असतील, असा प्रश्न उपस्थित झालाआहे.आजही ३ हजार ४७३ पैकी ११८० अंगणवाड्यांना ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे, तर १००० अंगणवाड्या ‘स्मार्ट’ झाल्या आहेत. जिल्ह्यातील २ हजार ५६१ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे, तर तब्बल ९०० अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. त्या अंगणवाड्या कुठे ग्रामपंचायत इमारतीत, समाजमंदिरात, तर कुठे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये व्हरांड्यात, पारावर, भाड्याच्या खोलीत, मंदिरात चालतात. ८७५ अंगणवाड्यांना शौचालयाची सुविधाच नाही, तर ७२२ अंगणवाड्यांमधील शौचालयांची दुरवस्था झालेली आहे. अंगणवाड्यांमध्ये शौचालये व पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विद्यमान महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी अंगणवाड्यांना पाण्याची व्यवस्था करून देण्याचे आवाहन ग्रामपंचायतींना केले आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र