शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

आॅरिक सिटीमध्ये भूखंड वाटपातून झाली ८१ कोटींची उलाढाल; ३०० पेक्षा अधिक लोकांना मिळेल रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 16:13 IST

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत स्थापन केलेल्या आॅरिकमध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी) ८ औद्योगिक भूखंड वाटपातून तब्बल ८१ कोटी २८ लाख रुपयांची उलाढालझाली आहे.

ठळक मुद्देया ८ औद्योगिक कंपन्यांची प्रत्यक्ष उभारणी झाल्यानंतर किमान ३०० पेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे.

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत स्थापन केलेल्या आॅरिकमध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी) ८ औद्योगिक भूखंड वाटपातून तब्बल ८१ कोटी २८ लाख रुपयांची उलाढालझाली आहे.

शेंद्रा येथील भूखंड वाटपासाठी ‘एमआयडीसी’च्या प्रादेशिक कार्यालयात मंगळवारी बैठक झाली. यावेळी औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडतर्फे भूखंडांचे वितरण क रण्यात आले. यामध्ये एका परदेशी तर ७ भारतीय औद्योगिक कंपन्यांना भूखंडांचे वितरण करण्यात आले. लघु, मध्यम आणि मोठ्या अशा स्वरूपाच्या उद्योगांना हे भूखंड वाटप झाले आहेत. 

या ८ औद्योगिक कंपन्यांची प्रत्यक्ष उभारणी झाल्यानंतर किमान ३०० पेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. याबरोबरच २ निवासी आणि १ कमर्शियल भूखंडाचेही वाटप झाले आहे. आॅरिक सिटीत एकूण जमिनीपैकी ६० टक्के  उद्योग, तर ४० टक्के  निवासी, सामाजिक-सांस्कृतिक उद्देशांसाठी जमिनीचा वापर केला जाणार आहे. त्यानुसार भूखंडाचे वाटप होत आहे.यास औद्योगिक कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतीय कंपन्यांबरोबर परदेशी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आॅरिक सिटी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

एकूण ४३ भूखंड वाटपयाविषयी सरव्यवस्थापक गजानन पाटील म्हणाले, यापूर्वी ३५ भूखंडांचे वाटप झाले होते. आता आणखी ८ भूखंडांचे वाटप झाले असून, त्यातून ८१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. एकूण ४३ भूखंड वाटप झाले आहेत.

टॅग्स :DMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरState Governmentराज्य सरकारbusinessव्यवसाय