शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
3
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
4
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
5
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
7
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
8
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
9
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
10
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
11
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
12
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
13
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
14
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
15
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
16
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
17
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
18
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
19
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
20
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

३७९ ग्रामपंचायतींसाठी ८०.५४% मतदान

By admin | Updated: August 5, 2015 00:42 IST

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२२ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासूनच गल्लीपासून जिल्ह्यापर्यंतच्या पदाधिकारी, नेतेमंडळींनी ग्रामपंचायती

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२२ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासूनच गल्लीपासून जिल्ह्यापर्यंतच्या पदाधिकारी, नेतेमंडळींनी ग्रामपंचायती आपल्याच पक्षाच्या ताब्यात ठेवण्यासाठी धावपळ सुरू केली होती़ उमेदवारी अर्ज भरेपर्यंत आणि मागे घेण्याच्या क्षणापर्यंत अनेक गावातील पक्षांतर्गत कलह, गट-तट व बंडखोरी प्रकर्षाने समोर आली. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४३ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या होत्या़ उर्वरित ३७९ ग्रामपंचायतीच्या सदस्य निवडीसाठी मंगळवारी तब्बल ८०़५४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ यात जिल्ह्यातील ५ लाख ५६ हजार ८१८ मतदारांपैकी ४ लाख ४८ हजार ४९५ मतदारांनी मतदान केले आहे़ सर्वच मतदान केंद्रावरील चोख पोलीस बंदोबस्त व निवडणूक विभागाच्या नियोजनामुळे जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली़ निवडणुकीत उतरलेल्या ६ हजार ७५५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे़ सर्वाधिक ८६़१७ टक्के मतदान परंडा तालुक्यात झाले़ तर सर्वात कमी मतदान उमरगा तालुक्यात ७४़३० टक्के झाले़ तर उस्मानाबाद तालुक्यात ८०़६० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ जिल्ह्यातील २ लाख ६३०४ महिला व २ लाख ४२ हजार १९१ पुरूष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ गुरूवारी होणाऱ्या मतमोजणीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे़