शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा ८० ८३ टक्के निकाल

By admin | Updated: June 18, 2014 01:30 IST

हिंगोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेमध्ये जिल्ह्याचा ८०.८३ टक्के निकाल लागला आहे.

हिंगोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेमध्ये जिल्ह्याचा ८०.८३ टक्के निकाल लागला आहे.राज्य शिक्षण मंडळाने मंगळवारी दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर केला. त्यानुसार जिल्ह्यातील १२ हजार ९४५ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १२ हजार ७९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १० हजार ३४४ विद्यार्थी (८०.८३ टक्के) उत्तीर्ण झाले. त्यामध्ये १ हजार ४२१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ३ हजार ५२१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ४ हजार ३४७ विद्याथी द्वितीय श्रेणीत तर १ हजार ५५ विद्यार्थी पास श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.जुन्या अभ्यासक्रमाचा १४ टक्के निकालजुन्या अभ्यासक्रमानुसार जिल्ह्यातील २ हजार १०१ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैैकी २९६ म्हणजेच १४.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये २ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २९४ विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. (जिल्हा प्रतिनिधी)

जिल्ह्यातील बारा शाळांचा निकाल १०० टक्केजिल्ह्यातील बारा शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या तीन शाळांचा समावेश आहे. हिंगोली शहरातील खाकीबाबा इंग्लिश स्कुल, अनसूया विद्या मंदिर खटकाळी, जिल्हा परिषद शाळा कुर्तडी, जि.प. शाळा साखरा, जि.प. शाळा कवठा ता. सेनगाव, कळमनुरी तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा बोथी, हरुनिसा उर्दु माध्यमिक विद्यालय आखाडा बाळापूर, सह्याद्री हायस्कुल वसमत, संगमेश्वर ज्ञानमंदिर जयपूर, संत नामदेव माध्यमिक विद्यालय वाघजाळी, माध्यमिक आश्रमशाळा बाभुळगाव आणि जवळा येथील एमआयपी उर्दु हायस्कुल या शाळांचा समावेश आहे.

दोन शाळांचा शुन्य टक्के निकालजिल्ह्यातील दोन शाळांचा निकाल शुन्य टक्के लागला आहे. त्यामध्ये हिंगोलीतील सरकळी येथील सत्य गणपती माध्यमिक विद्यालय व देवजना येथील कोणार्क केंद्रीय निवासी आश्रमशाळेचा समावेश आहे.मुलींनीच मारली बाजीदहावीच्या परिक्षेत मुलींनीच पुन्हा एकदा बाजी मारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. जिल्ह्यातील ७ हजार ४४२ मुलांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैैकी ५ हजार ७५७ म्हणजेच ७८. ४१ टक्के मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. जिल्ह्यातील ५ हजार ४५५ मुलींनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी ४ हजार ५८७ म्हणजेच ८४.०९ मुली परिक्षेत उत्तीर्ण झाल्या.

मराठवाड्यात हिंगोली जिल्हा चौथ्या क्रमांकावरशिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, बीड, परभणी, जालना व हिंगोली या पाच जिल्ह्यांमधून निकालात हिंगोली जिल्हा चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. पहिल्या क्रमांकावर बीड (९१.८८ टक्के) जिल्हा असून दुसऱ्या क्रमांकावर जालना (८८.४५ टक्के) तर तिसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद (८८.१४) आणि चौथ्या क्रमांकावर हिंगोली (८०.८३ टक्के) जिल्हा आहे. परभणी (७९.१६ टक्के) जिल्हा पाचव्या क्रमांकावर राहिला आहे.

संस्कृत विषयामुळे वाढले गुणहिंगोली : सर्व भारतीय भाषा तसेच प्रमुख विदेशी भाषांचे मुळ किंवा उगमस्थान असलेल्या ‘संस्कृत’ ने दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांचा निकाल उंचावण्यात मोलाची साथ दिली आहे. बहुतांश विद्यार्थी मातृभाषा असलेल्या मराठीसह हिंदी विषयांमध्येही मागे पडल्याचे चित्र असताना अनेकांनी संस्कृत विषयामध्ये १०० पैकी १०० गुण संपादन केले आहेत. भारतातील एक प्राचीन शास्त्रीय भाषा म्हणून संस्कृतची विशेष ओळख आहे. देशाला एका सुत्रात बांधणारी भाषा म्हणूनही ती ओळखली जाते; परंतु काळानुसार संस्कृत विषयाचे अध्ययन, अध्यापन कमी झाल्याचे दिसत आहे.शालेय विद्यार्थ्यांना आठवीपासूनच पाली, संस्कृत हे विषय शिकविण्यात येत आहेत. दहावी-बारावीला अधिक गुण मिळविण्यासाठी तसेच सोपी भाषा असल्याने विद्यार्थी हिंदी किंवा मराठी या भाषा विषयांऐवजी संस्कृतला अधिक पसंती देताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)