शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

७६ कोटींच्या रस्त्यांच्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:16 IST

जालना रोड आणि बीड बायपास या रस्त्यांसाठी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने तयार केलेला ७८९ कोटी रुपयांचा प्रकल्प आता रद्द होण्याचीच शक्यता आहे. कारण पुढच्या पाच वर्षांसाठी जालना रोड खड्डेमुक्त राहील, यासाठी १३ कोटी रुपयांतून काम करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जालना रोड आणि बीड बायपास या रस्त्यांसाठी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने तयार केलेला ७८९ कोटी रुपयांचा प्रकल्प आता रद्द होण्याचीच शक्यता आहे. कारण पुढच्या पाच वर्षांसाठी जालना रोड खड्डेमुक्त राहील, यासाठी १३ कोटी रुपयांतून काम करण्यात येणार आहे. महावीर चौक ते दिल्लीगेट या रस्त्यावर १० कोटी खर्च होणार असून, ८ नोव्हेंबर रोजी घोषित केलेल्या ७६ कोटी रुपयांच्या रस्ते कामाच्या निविदा शुक्रवारी काढण्यात आल्या. जानेवारी २०१८ पर्यंत हे काम सुरू होणार आहे.दरम्यान बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी पॅचवर्कच्या कामाचा आढावा घेतला. तसेच जिल्ह्यातील विविध रस्ते कामांसह वेरूळ येथील शहाजीराजे स्मारकाची पाहणी करून सौंदर्यीकरण आराखडा बनविण्याचे आदेश दिले.दरम्यान यापुढे रस्त्यावर किमान १० वर्षे खड्डे पडणार नाहीत. सध्याचे खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजविणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ३८ हजार ५०० कोटींच्या रस्त्यांच्या कामांची सुरुवात जानेवारीपासून होणार आहे. ही कामे सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील रस्त्यांचे चित्र नक्कीच बदलेल. राज्याच्या ग्रामीण भागातील बरेच रस्ते हे रोजगार हमी योजनेत केले असल्याने त्याबाबत खात्री देणे शक्य नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात ९६ हजार कि़मी.पर्यंतचे पीडब्ल्यूडीचे रस्ते आहेत. त्यावर एकही खड्डा दिसणार नाही, असा दावाही पाटील यांनी ८ नोव्हेंबर रोजी केला होता. त्याचाच पुनरुच्चार त्यांनी १ डिसेंबर रोजी केला.