शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

पदवीधरसाठी ७६ केंदे्र; आज मतदान

By admin | Updated: June 20, 2014 00:46 IST

लातूर : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २० जून रोजी मतदान घेण्यात येत आहे.

लातूर : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २० जून रोजी मतदान घेण्यात येत आहे. या निवडणुकीत तब्बल २३ उमेदवार रिंगणात राहिले असून, लातूर जिल्ह्यात मतदानासाठी ७६ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या प्रचाराची रणधुमाळी थंडावली असून, शुक्रवारी रिंगणातील २३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. जिल्हाभरात ७६ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी ७ मतदान केंद्र वाढविण्यात आले आहेत. २००८ च्या निवडणुकीत जिल्ह्यात ४० हजार ७५१ मतदार होते. त्यात यावेळी साडेअकरा हजार नवीन मतदारांची भर पडली आहे. एकूण ५२ हजार २३२ पदवीधरांना यावेळी मतदानाचा हक्क बजावता येईल. त्यापैकी ७ हजार ६४ स्त्री मतदार आहेत. तुलनेने पुरुष मतदारांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात ४५ हजार १६८ पुरुष मतदार आहेत. मतदारांना बॅलेट पेपर पुरविण्यात येणार असून, त्यावर स्केच पेनद्वारे पसंती क्रमांक दर्शवायचा आहे. २० जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. मतदारांना मतदारयादीत आपले नाव शोधण्यासाठी आॅनलाईन सर्च इंजिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. लातूर.एनआयसी.इन या संकेतस्थळावर जाऊन यादीतील नाव शोधता येईल. तसेच आपला यादीतील क्रमांक, मतदान केंद्र क्रमांक, मतदान केंद्राचा पत्ता याबाबीही आॅनलाईन जाणून घेता येतील. इतकेच नव्हे तर पोलचिट सुद्धा प्रशासनाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येत आहे. मतदारांनी अडचणीसंदर्भात उपजिल्हा निवडणूक अधिकारी खपले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा काम पाहत आहेत.