शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्तीचा ७५ लाखांचा निधी परत

By admin | Updated: July 12, 2014 00:46 IST

हिंगोली : जिल्हा परिषदेला दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मिळालेल्या निधीपैकी ७५ लाख रुपयांचा निधी प्रशासकीय मान्यता देण्यास उशीर झाल्याने तो शासनाकडे परत जाण्याची नामुश्की जि. प. वर आली आहे.

हिंगोली : जिल्हा परिषदेला दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मिळालेल्या निधीपैकी ७५ लाख रुपयांचा निधी प्रशासकीय मान्यता देण्यास उशीर झाल्याने तो शासनाकडे परत जाण्याची नामुश्की जि. प. वर आली आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला २०११-१२ व २०१२-१३ या वर्षांत एकूण ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यानंतर या निधीतील ९० टक्के रक्कम पंचायत समित्यांमार्फत कामे निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात आली. उर्वरित १० टक्के रक्कम संबंधित कामांच्या पूर्णत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेकडे सादर केल्यानंतर वर्ग करण्याचा निर्णय शासनाच्या नियमानुसार झाला. त्यानंतर १० टक्के निधी गृहीत धरून करण्यात येणाऱ्या कामांना जिल्हा परिषदेची प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक होते. काही ग्रामपंचायतींनी त्यातील कामेही पूर्ण केली; परंतु त्या कामांना प्रशासकीय मान्यता नसल्याने हा निधी उपलब्ध होऊ शकला नाही. शिवाय याबाबतचा पाठपुरावा जिल्हा परिषदेने करणे आवश्यक होते. तसे केले नसल्यामुळे हा निधी खर्च करण्याची २ वर्षांची मुदत संपून गेली. तरीही याबाबत प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने १० टक्के म्हणजेच ७५ लाख रुपयांचा निधी खर्चाविना पडून राहिला. आता मुदत संपल्याने हा निधी संबंधितांना खर्चही करता येत नाही, तो शासनाला परत करावा लागतो. त्यानुसार जवळपास ७५ लाखांचा निधी जिल्हा परिषदेला शासनाला करावा लागणार आहे. प्रशासकीय यंत्रणेतील कामचुकार पद्धतीमुळे निधी परत करण्याची वेळ जिल्हा परिषदेवर आली आहे. त्यामुळे आता या प्र्रकरणातील दोषी व्यक्त कोण आहेत? त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांमधून होत आहे. या मागणीला जि. प. तील वरिष्ठ अधिकारी कितपत प्रतिसाद देतात, याबाबत सध्यातरी साशंकताच वाटते. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत ओघानेच हा विषय चर्चेला आला. त्यानंतर ७५ लाखांंचा निधी परत जात असल्याचे अर्थ विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सदस्यांनी संताप व्यक्त केला. असे असले तरी अधिकृतपणे अर्थ विभागातील अधिकारी याबाबत काही बोलण्यास तयार नाहीत. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य व लेखा वित्त अधिकारी केंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अर्थ समितीच्या बैठकीत याविषयावर चर्चाच झाली नसल्याचे सांगितले. दलित वस्तीचा निधी परत जाणार आहे का? असा प्रतिसवाल केला असता त्यांनी पुन्हा समितीच्या बैठकीत अशी कुठलीही चर्चा झाली नाही, अशीच री ओढली. (जिल्हा प्रतिनिधी)२०११-१२ व २०१२-१३ या वर्षांत जिल्हा परिषदेला दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला.निधीतील शिल्लक राहिलेली १० टक्के रक्कम खर्च करण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही.