शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

धान्य महोत्सवात ७० स्टॉल

By admin | Updated: May 14, 2014 01:00 IST

हिंगोली : शहरातील रामलीला मैदानावर आयोजित धान्य व फळ महोत्सवात ७० स्टॉल उभारण्यात आले आहेत.

हिंगोली : शहरातील रामलीला मैदानावर आयोजित धान्य व फळ महोत्सवात ७० स्टॉल उभारण्यात आले आहेत. बियाण्यांपासून अन्नधान्य, आंबे, गृहोपयोगी साहित्य, मसाल्याचे पदार्थ, डाळीपर्यंत आदी साहित्य खरेदी-विक्री आले आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासन कृषी व पणन विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या संयुक्त विद्यमाने धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रामलीला मैदानावर १३ व १४ मे रोजी होणार्‍या या मोहत्वाचे उद्घाटन जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, तोंडापूर कृषीविज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक पी. पी. शेळके उपस्थित होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.के. पवार, आत्माचे प्रकल्प संचालक पी.के. उगले, उपविभागीय कृषी अधिकारी बी.एस. कच्छवे, उपप्रकल्प संचालक एम.डी. तीर्थकर, पणन अधिकारी दिनेश डागा, तालुका कृषी अधिकारी राधेशाम शर्मा उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी पोयाम यांनी धान्य व फळे महोत्सव हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. अशाप्रकारचे महोत्सव प्रत्येक हंगामात किंवा महिन्याच्या दुसर्‍या रविवारी भरविण्यात यावेत. महोत्सवासाठी शासनाकडून भाडे तत्वावर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यासाठी विविध संस्थेने सहकार्य करण्याचे आवाहन पी. व्ही. बनसोडे यांनी केले. पी.के. उगले यांनी शेतकर्‍यामध्ये बाजार व्यवस्थापनाचे कौशल्य निर्माण करून ग्राहकांना स्वच्छ, निर्भळ व किफायशीर दरात शेतीमाल, फळे व भाजीपाला उपलब्ध करण्याचा प्रयत्न हा महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे सांगितले. सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असल्याने बाजारात बियाणे चढ्या दराने विक्री होण्याची शक्यता आहे. म्हणून उत्पादकांनी या महोत्सवात विक्रीसाठी आलेल्या स्टॉलवर किफायतशीर दामामध्ये सोयाबीनचे बियाणे खरेदी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. (प्रतिनिधी) दिवसभरात झाली २५० ते ३०० क्विंटलची खरेदी महोत्सवात शेतकरी व शेतकरी गटांनी विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे. त्यात फळांमध्ये आंबा, केळी, चिकू, भाजीपाला, निवडलेले धान्य, प्रक्रिया केलेला कृषीमाल, डाळी, मसाल्याचे पदार्थ, गुळ, हळद, स्वीट कॉर्न, सरबत, लोणचे, पापड, विविध रोपे, कलमे आदींचा समावेश आहे. तसेच आगामी खरीप हंगामात लागणारे बियाणे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणले आहे. प्रामुख्याने सोयाबीनच्या बियाण्यांचा समावेश आहे. एकूण ७० स्टॉलवर जवळपास २५० ते ३५० क्विंटल शेतीमाल विक्रीसाठी आला आहे. पहिल्याच दिवशी मालाच्या खरेदी-विक्रीतून पंधरा लाखांची उलाढाल झाली.