शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

धान्य महोत्सवात ७० स्टॉल

By admin | Updated: May 14, 2014 01:00 IST

हिंगोली : शहरातील रामलीला मैदानावर आयोजित धान्य व फळ महोत्सवात ७० स्टॉल उभारण्यात आले आहेत.

हिंगोली : शहरातील रामलीला मैदानावर आयोजित धान्य व फळ महोत्सवात ७० स्टॉल उभारण्यात आले आहेत. बियाण्यांपासून अन्नधान्य, आंबे, गृहोपयोगी साहित्य, मसाल्याचे पदार्थ, डाळीपर्यंत आदी साहित्य खरेदी-विक्री आले आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासन कृषी व पणन विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या संयुक्त विद्यमाने धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रामलीला मैदानावर १३ व १४ मे रोजी होणार्‍या या मोहत्वाचे उद्घाटन जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, तोंडापूर कृषीविज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक पी. पी. शेळके उपस्थित होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.के. पवार, आत्माचे प्रकल्प संचालक पी.के. उगले, उपविभागीय कृषी अधिकारी बी.एस. कच्छवे, उपप्रकल्प संचालक एम.डी. तीर्थकर, पणन अधिकारी दिनेश डागा, तालुका कृषी अधिकारी राधेशाम शर्मा उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी पोयाम यांनी धान्य व फळे महोत्सव हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. अशाप्रकारचे महोत्सव प्रत्येक हंगामात किंवा महिन्याच्या दुसर्‍या रविवारी भरविण्यात यावेत. महोत्सवासाठी शासनाकडून भाडे तत्वावर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यासाठी विविध संस्थेने सहकार्य करण्याचे आवाहन पी. व्ही. बनसोडे यांनी केले. पी.के. उगले यांनी शेतकर्‍यामध्ये बाजार व्यवस्थापनाचे कौशल्य निर्माण करून ग्राहकांना स्वच्छ, निर्भळ व किफायशीर दरात शेतीमाल, फळे व भाजीपाला उपलब्ध करण्याचा प्रयत्न हा महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे सांगितले. सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असल्याने बाजारात बियाणे चढ्या दराने विक्री होण्याची शक्यता आहे. म्हणून उत्पादकांनी या महोत्सवात विक्रीसाठी आलेल्या स्टॉलवर किफायतशीर दामामध्ये सोयाबीनचे बियाणे खरेदी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. (प्रतिनिधी) दिवसभरात झाली २५० ते ३०० क्विंटलची खरेदी महोत्सवात शेतकरी व शेतकरी गटांनी विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे. त्यात फळांमध्ये आंबा, केळी, चिकू, भाजीपाला, निवडलेले धान्य, प्रक्रिया केलेला कृषीमाल, डाळी, मसाल्याचे पदार्थ, गुळ, हळद, स्वीट कॉर्न, सरबत, लोणचे, पापड, विविध रोपे, कलमे आदींचा समावेश आहे. तसेच आगामी खरीप हंगामात लागणारे बियाणे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणले आहे. प्रामुख्याने सोयाबीनच्या बियाण्यांचा समावेश आहे. एकूण ७० स्टॉलवर जवळपास २५० ते ३५० क्विंटल शेतीमाल विक्रीसाठी आला आहे. पहिल्याच दिवशी मालाच्या खरेदी-विक्रीतून पंधरा लाखांची उलाढाल झाली.