शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

बोंडअळीमुळे ७० टक्के नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 01:29 IST

औरंगाबाद तालुक्यातील शेतक-यांच्या कपाशीचे बोंडअळीमुळे ७० ते ८० टक्के नुकसान झाले असून, अर्ज स्वीकारणे व पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

श्रीकांत पोफळे ।लोकमत न्यूज नेटवर्कशेंद्रा : औरंगाबाद तालुक्यातील शेतक-यांच्या कपाशीचे बोंडअळीमुळे ७० ते ८० टक्के नुकसान झाले असून, अर्ज स्वीकारणे व पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ५५०० अर्ज प्राप्त झाले असून, अर्जांचा ओघ सुरूच असल्याची माहिती प्रभारी कृषी अधिकारी आर. एम. राठोड यांनी दिली.औरंगाबाद तालुक्यातील शेतकºयांचे यावर्षी खरिपात मोठे नुकसान झाले आहे. त्यात कापूस महत्त्वाचे पीक आहे. कापूस पिकाचे एकूण क्षेत्र ४५,९३२ हेक्टर आहे. मागील वर्षी तालुक्यातील कापसाचे उत्पादन ७८० मेट्रिक टन झाले होते. त्यात ४५०० भावाने एकूण ३५१ कोटी रुपयांचे उत्पन्न शेतकºयांच्या पदरी पडले होते. यावर्षी १९५ मेट्रिक टन उत्पादन असून, ४५०० रुपयांच्या दराने त्याचे एकूण मूल्य ८.५ ते ९ कोटी उत्पन्न शेतकºयांच्या पदरी पडणार आहे. यंदा ७५ टक्के नुकसान कापूस उत्पादक शेतकºयांना सहन करावे लागणार आहे. दोन महिने पावसाने उघडीप दिली त्यामुळे कपाशीची वाढ खुंटली, परतीच्या पावसाने थोडी फार आशा निर्माण झाली होती; परंतु बोंडअळीने पुन्हा शेतकºयांच्या हसºया चेहºयावर नैराश्य पसरले. लागवडीसाठी केलेला खर्चदेखील निघणार नाही. सर्वच शेतकºयांना फक्त पहिल्या वेचणीत जास्तीत जास्त कापूस चांगल्या दर्जाचा काढता आला. दुसºया वेचणीत बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले व कपाशी बोंडअळीमुळे बाधित झाल्याने तालुक्यातून नुकसानभरपाईची जोरदार मागणी झाली. त्यानंतर सरकारने कृषी विभागाला पंचनाम्याचे आदेश दिले.अर्ज स्वीकारणे व पंचनामे युद्धपातळीवर सुरूतालुका कृषी कार्यालयामार्फत अर्जांचे वाटप करण्यात आले असून, या अर्जांसोबत कापसाचे बियाणे खरेदीचे बिल, सातबारा, आधार कार्ड व बँक पासबुक आदी कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. बाधित शेतकºयांनी कृषी कार्यालयात अर्ज केल्यानंतर कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी प्रत्यक्ष शेतावर पंचनामा करीत आहे. ७० ते ८० टक्के कापूस बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे.