शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

बोंडअळीमुळे ७० टक्के नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 01:29 IST

औरंगाबाद तालुक्यातील शेतक-यांच्या कपाशीचे बोंडअळीमुळे ७० ते ८० टक्के नुकसान झाले असून, अर्ज स्वीकारणे व पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

श्रीकांत पोफळे ।लोकमत न्यूज नेटवर्कशेंद्रा : औरंगाबाद तालुक्यातील शेतक-यांच्या कपाशीचे बोंडअळीमुळे ७० ते ८० टक्के नुकसान झाले असून, अर्ज स्वीकारणे व पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ५५०० अर्ज प्राप्त झाले असून, अर्जांचा ओघ सुरूच असल्याची माहिती प्रभारी कृषी अधिकारी आर. एम. राठोड यांनी दिली.औरंगाबाद तालुक्यातील शेतकºयांचे यावर्षी खरिपात मोठे नुकसान झाले आहे. त्यात कापूस महत्त्वाचे पीक आहे. कापूस पिकाचे एकूण क्षेत्र ४५,९३२ हेक्टर आहे. मागील वर्षी तालुक्यातील कापसाचे उत्पादन ७८० मेट्रिक टन झाले होते. त्यात ४५०० भावाने एकूण ३५१ कोटी रुपयांचे उत्पन्न शेतकºयांच्या पदरी पडले होते. यावर्षी १९५ मेट्रिक टन उत्पादन असून, ४५०० रुपयांच्या दराने त्याचे एकूण मूल्य ८.५ ते ९ कोटी उत्पन्न शेतकºयांच्या पदरी पडणार आहे. यंदा ७५ टक्के नुकसान कापूस उत्पादक शेतकºयांना सहन करावे लागणार आहे. दोन महिने पावसाने उघडीप दिली त्यामुळे कपाशीची वाढ खुंटली, परतीच्या पावसाने थोडी फार आशा निर्माण झाली होती; परंतु बोंडअळीने पुन्हा शेतकºयांच्या हसºया चेहºयावर नैराश्य पसरले. लागवडीसाठी केलेला खर्चदेखील निघणार नाही. सर्वच शेतकºयांना फक्त पहिल्या वेचणीत जास्तीत जास्त कापूस चांगल्या दर्जाचा काढता आला. दुसºया वेचणीत बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले व कपाशी बोंडअळीमुळे बाधित झाल्याने तालुक्यातून नुकसानभरपाईची जोरदार मागणी झाली. त्यानंतर सरकारने कृषी विभागाला पंचनाम्याचे आदेश दिले.अर्ज स्वीकारणे व पंचनामे युद्धपातळीवर सुरूतालुका कृषी कार्यालयामार्फत अर्जांचे वाटप करण्यात आले असून, या अर्जांसोबत कापसाचे बियाणे खरेदीचे बिल, सातबारा, आधार कार्ड व बँक पासबुक आदी कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. बाधित शेतकºयांनी कृषी कार्यालयात अर्ज केल्यानंतर कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी प्रत्यक्ष शेतावर पंचनामा करीत आहे. ७० ते ८० टक्के कापूस बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे.