शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

लातुरात सहावे वारकरी साहित्य संमेलन

By admin | Updated: May 6, 2017 00:20 IST

लातूर : वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने लातूर येथे २७, २८ व २९ मे असे तीन दिवस सहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने लातूर येथे २७, २८ व २९ मे असे तीन दिवस सहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात येणार असून, या संमेलनामध्ये शेतकरी आत्महत्या, स्त्रीभ्रूण हत्या, हुंडामुक्त विवाह आदी विषयांवर परिसंवाद आयोजित केले जाणार असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत दिली. विठ्ठल पाटील म्हणाले, मराठवाड्यात नांदेडनंतर लातुरात हे साहित्य संमेलन होत आहे. मराठवाड्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येविरोधी जनजागृती व्हावी म्हणून संत साहित्य संमेलन लातुरात आयोजित करण्यात आले आहे. पाणी नियोजन, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन या साहित्य संमेलनात होईल. २७ मे रोजी दिंडी स्पर्धा सोहळा आयोजित करण्यात आला असून, सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्षपद लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी स्वीकारले असल्याची माहितीही पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या मराठवाड्यात सर्वाधिक आहेत. त्यामुळे खास शेतकऱ्यांसाठी हे संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता, भोंदूगिरी थोपविण्यासाठी या साहित्य संमेलनामध्ये विचारमंथन होईल, असेही पाटील म्हणाले.