शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

मागितले ६८ अन् मिळाले १४ कोटी

By admin | Updated: June 2, 2016 23:23 IST

परभणी : २०१४-१५ च्या खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्याला १४ कोटी ४१ लाख रुपयांचे अनुदान गुरुवारी प्राप्त झाले आहे़

परभणी : २०१४-१५ च्या खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्याला १४ कोटी ४१ लाख रुपयांचे अनुदान गुरुवारी प्राप्त झाले आहे़ विशेष म्हणजे जिल्ह्याने ६८ कोटी ४७ लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी केली होती़ मागणीच्या तुलनेत केवळ २० टक्के अनुदान प्राप्त झाल्याने अनेक लाभार्थी शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ जिल्ह्यातील ८४८ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाली आहेत़ या दुष्काळी गावांमधील शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून थेट आर्थिक मदत दिली जात आहे़ यापूर्वी दोन टप्प्यात जिल्ह्याला अनुदान प्राप्त झाले होते़ हे संपूर्ण अनुदान वाटप केल्यानंतरही अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्याने एप्रिल महिन्यात जिल्हा प्रशासनाने दुष्काळी भागातील १ लाख ५ हजार शेतकरी आणि साधारणत: ९० हजार हेक्टर क्षेत्रासाठी ६८ कोटी ४७ लाख रुपये वाढीव अनुदानाची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली होती़ या मागणीनुसार गुरूवारी केवळ १४ कोटी २० लाख रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत़ खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपल्याने तातडीने उपाययोजना करीत हे अनुदान तहसीलस्तरावर वितरित केले आहे़ प्राप्त झालेल्या १४ कोटी ४१ लाख रुपयांमधून परभणी तालुक्यासाठी २ कोटी ८८ लाख, गंगाखेड तालुक्याला ९५ लाख, पूर्णा १ कोटी ५ लाख, पालम तालुक्यासाठी २ कोटी ८९ लाख, सोनपेठ तालुक्यासाठी ७६ लाख, मानवत तालुक्यासाठी १ कोटी ३५ लाख, सेलू ३३ लाख आणि जिंतूर तालुक्यासाठी २ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम तहसीलदारांकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़ आतापर्यंत परभणी जिल्ह्याला २०० कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे़ प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी ४०० कोटी रुपयांच्या मदतीची मागणी नोंदविली आहे़ (प्रतिनिधी)एक लाख : शेतकरी वंचितपरभणी जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकरी आहेत़ मागील वर्षी जिल्ह्यातील संपूर्ण खरीप हंगाम हातचा गेला आहे़ त्यामुळे सर्व गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाली़ या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ४०० कोटी रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती़ यापूर्वीच दोन टप्प्यात अनुदान मिळाले़ ४हे अनुदान वाटप केल्यानंतरही अनुदानपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे सर्व्हेक्षण जिल्हा प्रशासनाने केले होते़ त्यानुसार १ लाख ५ हजार शेतकरी वंचित होते़