शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

डीसीसीत ६७१ कोटींच्या ठेवी; ९४९ कोटींचे शेतीकर्ज

By admin | Updated: April 16, 2016 23:26 IST

बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थीक वर्षाचा हिशोब पुर्ण झाला असून सद्य अहवालावरुन बँक पुर्वपदावर येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली

बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थीक वर्षाचा हिशोब पुर्ण झाला असून सद्य अहवालावरुन बँक पुर्वपदावर येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा विश्वास अध्यक्ष आदित्य सारडा यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे सध्या ६७१ कोटींच्या ठेवी, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत कृषी कर्ज ९४९ कोटी ४४ लाख रुपये आहे. कृषी कर्ज हे ८४. ६० टक्के आहे. जिल्ह्यातील साखर कारखाना, सुत गिरणी, औद्यागिक, शिक्षण, संस्था व इतर बिगर शेती संस्थाकडे बँकेचे १०७ कोटी २६ लाख रुपये तर पगारदार संस्थाकडे ६५ कोटी ५२ लाख असे १ हजार १२२ कोटी २२ लाख रुपये कर्ज असल्याची माहिती अध्यक्ष सारडा यांनी दिली. मार्च २०११ अखेर बँकेकडे १ हजार १९७ कोटी ऐवढ्या ठेवी होत्या. म्हणजेच ५२५ कोटी आज पर्यंत ठेवीदारांच्या ठेवी परत केलेल्या आहेत. यामुळे एक वर्षामध्ये ७१ कोटी व्याजारी रक्कम पुर्ण वजा करता ६७१ कोटी इत्या ठेवी शिल्लक आहेत. परंतू बँकेचे मोठ्या प्रमाणात कर्ज येणे आहे. १ हजार १२२ कोटी २२ लाख रुपये इतके कर्ज येणे आहे. म्हणजेच बँकेकडे ४५० कोटी ७७ लाख रुपये स्वनिधी आहे. त्यामध्ये बुडीत व संशयीत कर्ज निधी २१७ कोटी व व्याजापोटीची तरतूद १९९ कोटी ९९ लाख रुपये आहे. नियमाप्रमाणे सरकारी कर्जरोख्यात एकुण ७१ कोटी ६६ लाख रुपये म्हणजे १० टक्के रक्कम गुंतवली आहे. राज्य बँकेमध्ये १६३ कोटी ठेवी आहेत तर बँकेकडे रोखनिधी ४७ कोटी ६७ लाख रुपये असून बँकेची एकुण गुंंतवणूक २४४ कोटी ३८ लाख आहे. महाराष्ट्र राज्य बँकेकडे डीसीसीचे २१७ कोटी व राज्य बँकेतील मुदतठेवीवर ४७ कोटी ४० लाख रुपये कर्ज आहे असे अध्यक्ष सारडा म्हणाले. बँकेचे संचालक मंडळ डीसीसी पुर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षीत आहेत. त्या टप्या-टप्याने काढाव्यात असे आवाहन सारडा यांनी केले. बँकेचे उपाध्यक्ष गोरख धुमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी विकासराव देशमुख, उपव्यवस्थापक रवी उबाळे, दिपक तळकरी, बँकेचे कर्मचारी सचिन गायकवाड, मन्सुर पठाण, उपरे, वाघमारे, कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)