शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

६५७२ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त!

By admin | Updated: March 17, 2017 00:30 IST

उस्मानाबाद : सुमारे ६ हजार ५७२ हेक्टवरील पिकांना ‘अवकाळी’ फटका बसला आहे.

उस्मानाबाद : जिल्हाभरातील शेतकऱ्यांची रबी पिकांच्या काढणीची लगबग सुरू असतानाच बुधवारी सायंकाळी साधारणपणे पाच वाजेच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागत वादळी वाऱ्यासह पाऊस अन् गारपीटही झाली. या पावसामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागाही अक्षरश: उद्ध्वस्त झाल्या आहेत. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार सुमारे ६ हजार ५७२ हेक्टवरील पिकांना ‘अवकाळी’ फटका बसला आहे. यामध्ये ज्वारी ३ हजार ६२५, गहू १ हजार ४७२, हरभरा १ हजार ५७६, द्राक्ष सोळा, आंबा चोवीस, कांदा बारा, टरबूज-खरबूज तीस आणि २१ हेक्टवरील भाजीपाल्याचा समावेश आहे. झाडे उन्मळून पडलीलोहारा : शहरासह तालुक्यातील होळी, आष्टाकासार, रेबे चिंचोली, सालेगाव, माकणी, सास्तुर, खेड, बेंडकाळ, मार्डी, नागराळ, मोघा परिसरात बुधवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. लोहारा मंडळामध्ये १३ मिमी, माकणी १२ मिमी तर जेवळी मंडळामध्ये ५ मिमी पाऊस झाला आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. होळी येथे झाडे उन्मळून पडली तसेच घरावरील पत्रे उडाली. त्याचप्रमाणे शेतशिवारातील ज्वारी, हरभरा, गहू द्राक्ष, आंबा आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील होळी व परिसरात प्रचंड गारपीट झाली. पिकांसोबतच घरांचेही प्रचंड नुकसान झाले. गावातील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. विद्युत पोलही मोडले आहेत. त्याचप्रमाणे गावातीलच बाबू वचने, समिंदर पाटोळे यांच्या घरावर झाड उन्मळून पडले. त्यामुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे. महात्मा गांधी विद्यालयावरील पत्रे डाली आहेत. कास्ती (बु.) येथील शेतकरी मुरलीधर चव्हाण, व्यंकट चव्हाण तसेच नागूर येथील मोरे यांच्या शेतातील आंब्याच्या बागांनाही मोठा फटका बसला आहे. काढणीस आलेली आणि काढून ठेवलेली ज्वारी भिजल्यामुळे काळवंडली आहे. त्यामुळे हाता तोंडाला आलेल्या पिकांवर या अवकाळी पावसाने पाणी पडले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.जागजी मंडळात १९ मिमी पाऊसतेर : उस्मानाबाद तालुक्यातील जागजी मंडळामध्ये जवळपास १९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या अनेकांच्या शेतात हरभरा, गहू, ज्वारी पिके असून या पिकांना मोठा तडाखा बसला आहे. उंबराव त्रिंबक सावंत यांच्या शेतातील ज्वारी पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. अशीच अवस्था अन्य शेतकऱ्यांची आहे. विष्णू सावंत यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे घरातील धान्य भिजले आहे. हनुमंत नामदेवराव देशमुख यांच्या अडीच एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागेलाही फटका बसला आहे. गारांच्या माऱ्यामुळे द्राक्षांचे घड तुटून पडल्याचे पहावयास मिळाले. भिकार सारोळा परिसरातील गहू, ज्वारी, हरभरा आदी पिके अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाली आहेत. एवढेच नाही तर पळसप येथील हरिश्चंद्र माळी यांच्या शेतातील गव्हाचे पीक पूर्णत: वाया गेले आहे. ज्वारी, गव्हाचे अंथरून झाले आह. तेर परिसरातही यापेक्षा काही वेगळे चित्र नाही. ज्वारी, गहू, हरभरा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यामुळे आता नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करण्याची गरज निर्माण झाली आहे.कांद्यालाही फटकातुळजापूर : अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके मातीमोल झाली आहेत. गारांच्या माऱ्यामुळे द्राक्षाचे घड तुटले आहेत. एवढेच नाही तर द्राक्षांना काळे डाग पडू लागले आहेत. अशीच परिस्थिती आंब्याची झाली आहे. झाडाला लगडलेले आंबे गळून पडले आहेत. ज्वारी, गहू, हरभरा आदी रबी पिके शेतकऱ्यांनी मळणीसाठी कापून ठेवली होती. परंतु, या पावसामुळे ही पिके पूर्णत: भिजली असून ती काळी पडण्याची भिती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. कांद्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढून शेतातच ठेवला होता. हा कांदाही भिजला आहे. दरम्यान, वरिष्ठ स्तरावरून पंचनामे करण्याचे आदेश आले असले तरी तालुक्यातील अनेक कर्मचारी मात्र, शेतकऱ्यांकडून शेतसारा, शिक्षण कर वसुलीमध्ये मग्न असल्याचे पहावयास मिळते. तुळजापूर (खुर्द) येथील महिला शेतकरी भागिरथीबाई भगवान भोजने यांच्या अडीच ते तीन एकरावरील द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. विष्णू गाटे यांच्या चार एकरावरील कांदा पिकाला फटका बसला. दत्ता जगदाळे यांच्या तीन एकरावरीेल कापणी करून ठेवलेली ज्वारी भिजल्याने काळवंडली आहे. दरम्यान, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पंढरपूरहून लातूरकडे जात होते. या मार्गावरील पिकांच्या नुकसानीची पहाणी करतील, असे अपेक्षित होते. परंतु, नुकसानीची पहाणी न करताच ते पुढे निघून गेले. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, नुकसानीच्या पंचनाम्याच्या अनुषंगाने तहसीलदार दिनेश झांपले यांच्याशी संपर्क साधला असता, तुळजापूर तालुक्यात कमी प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे फारशे नुकसान झाले नसल्याचे ते म्हणाले. उमरगा तालुक्यातील बलसूर परिसरालाही अवकाळी पावसाने झोडपून काढले. परिसरातील रबी पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. रबी पिकांसोबतच फळ बागांचेही नुकसान झाल्याचे पहावयास मिळाले.