शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

६४ कोटी रुपये पडून

By admin | Updated: July 18, 2014 01:52 IST

औरंगाबाद : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी आर्थिक मदत देण्याच्या हेतूने राज्य सरकारने मराठवाड्यासाठी अडीच महिन्यांपूर्वी ९७० कोटी रुपयांचा निधी दिला.

औरंगाबाद : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी आर्थिक मदत देण्याच्या हेतूने राज्य सरकारने मराठवाड्यासाठी अडीच महिन्यांपूर्वी ९७० कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र, एवढे दिवस होऊनही त्यातील ६४ कोटी रुपयांचा निधी जिल्हास्तरावर वाटपाअभावी पडून आहे. त्यामुळे विभागातील हजारो शेतकरी अजूनही गारपिटीच्या मदतीपासून वंचित आहेत.या परिस्थितीत गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर केले. कोरडवाहूसाठी १० हजार, बागायती १५ हजार आणि फळबागांसाठी २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याचे सरकारने जाहीर केले.त्यानुसार मराठवाड्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ९९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यापैकी ९७० कोटी रुपयांचा निधी २५ मार्च ते १३ मे या काळात तीन टप्प्यांत मराठवाड्यास प्राप्त झाला. मात्र, प्रशासनाकडून अतिशय कासवगतीने त्याचे वाटप सुरू आहे. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जिल्हा प्रशासनाकडून ही मदत जमा करावी, अशा स्पष्ट सूचना राज्य सरकारने प्रशासनाला दिल्या होत्या. तरीही आतापर्यंत केवळ ९०६ कोटी रुपयांचेच वाटप झालेआहे. अद्याप ६४ कोटी रुपयांचा निधी वाटपाअभावी पडून आहे. आतापर्यंत एकूण १५ लाख ४० हजार शेतकऱ्यांनाच ही मदत मिळाली आहे. आणखी सव्वालाख शेतकऱ्यांना मदतीचे वाटप होणे बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर आणि उस्मानाबाद, अशा सर्वच जिल्हाधिकाऱ्यांकडे कमी अधिक प्रमाणात गारपीटग्रस्तांसाठीचा निधी पडून आहे. साडेआठ लाख हेक्टरवरील नुकसानमराठवाड्यात फेबु्रवारीअखेरीस अवकाळी पावसाने थैमान घातले. ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे ८ लाख ५ हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाले.