शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

६४ कोटी रुपये पडून

By admin | Updated: July 18, 2014 01:52 IST

औरंगाबाद : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी आर्थिक मदत देण्याच्या हेतूने राज्य सरकारने मराठवाड्यासाठी अडीच महिन्यांपूर्वी ९७० कोटी रुपयांचा निधी दिला.

औरंगाबाद : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी आर्थिक मदत देण्याच्या हेतूने राज्य सरकारने मराठवाड्यासाठी अडीच महिन्यांपूर्वी ९७० कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र, एवढे दिवस होऊनही त्यातील ६४ कोटी रुपयांचा निधी जिल्हास्तरावर वाटपाअभावी पडून आहे. त्यामुळे विभागातील हजारो शेतकरी अजूनही गारपिटीच्या मदतीपासून वंचित आहेत.या परिस्थितीत गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर केले. कोरडवाहूसाठी १० हजार, बागायती १५ हजार आणि फळबागांसाठी २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याचे सरकारने जाहीर केले.त्यानुसार मराठवाड्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ९९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यापैकी ९७० कोटी रुपयांचा निधी २५ मार्च ते १३ मे या काळात तीन टप्प्यांत मराठवाड्यास प्राप्त झाला. मात्र, प्रशासनाकडून अतिशय कासवगतीने त्याचे वाटप सुरू आहे. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जिल्हा प्रशासनाकडून ही मदत जमा करावी, अशा स्पष्ट सूचना राज्य सरकारने प्रशासनाला दिल्या होत्या. तरीही आतापर्यंत केवळ ९०६ कोटी रुपयांचेच वाटप झालेआहे. अद्याप ६४ कोटी रुपयांचा निधी वाटपाअभावी पडून आहे. आतापर्यंत एकूण १५ लाख ४० हजार शेतकऱ्यांनाच ही मदत मिळाली आहे. आणखी सव्वालाख शेतकऱ्यांना मदतीचे वाटप होणे बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर आणि उस्मानाबाद, अशा सर्वच जिल्हाधिकाऱ्यांकडे कमी अधिक प्रमाणात गारपीटग्रस्तांसाठीचा निधी पडून आहे. साडेआठ लाख हेक्टरवरील नुकसानमराठवाड्यात फेबु्रवारीअखेरीस अवकाळी पावसाने थैमान घातले. ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे ८ लाख ५ हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाले.