शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

६१३ दारू दुकानांना नोटिसा !

By admin | Updated: March 18, 2017 23:23 IST

लातूर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत ५०० मीटरच्या आत असलेल्या ६१३ दारू दुकानांना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

राजकुमार जोंधळे लातूरसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत ५०० मीटरच्या आत असलेल्या जिल्ह्यातील एकूण ६१३ दारू दुकानांना लातूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ३१ मार्चनंतर ५०० मीटरच्या आत असलेल्या दुकानांचे नूतनीकरण होणार नाही, असे या नोटिसीद्वारे दारू दुकान चालकांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.लातूर जिल्ह्यातील राज्यमार्गालगत असलेल्या ६६४ बारचे परवाने धोक्यात आले आहेत. यातील ६१३ दारू दुकान चालकांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ७१० बार, परमिट रुम, देशी दारू दुकान, क्लबची संख्या आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन पथकांनी फेब्रुवारीच्या शेवटच्या आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यमार्गालगत असलेल्या दारू दुकानांचे सर्व्हेक्षण केले आहे. याचा अहवाल संबंधित विभागाने उत्पादन शुल्क विभागाच्या राज्याच्या आयुक्तांकडे पाठविला आहे. ३१ मार्चनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ही दारू दुकाने बंद केली जाणार आहेत. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपल्या दुकानांचे नूतनीकरण होणार नाही, अशा नोटिसा बजावल्या आहेत. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारू दुकानांवर बंदी घालण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यातील एकूण ७१० दारू दुकानांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यापैकी ६१३ दारू दुकाने ५०० मीटरच्या आत असल्याचे पुढे आले आहे. ३१ मार्चनंतर लागू होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे किती दुकानांचा परवाना धोक्यात येईल, याचा आढावा या सर्व्हेच्या माध्यमातून संबंधित विभागाच्या पथकाने घेतला आहे. जवळपास ९० टक्के दुकानांवर या निर्णयामुळे गंडांतर येणार आहे.