शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

पेयजल योजनेअंतर्गत ६१ कामांना सुरूवात

By admin | Updated: November 14, 2014 00:53 IST

उस्मानाबाद : ग्रामीण भागातील पाणीटंचाई लक्षात घेवून शासनाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेला आता गती येण्यास सुरूवात झाली आहे

उस्मानाबाद : ग्रामीण भागातील पाणीटंचाई लक्षात घेवून शासनाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेला आता गती येण्यास सुरूवात झाली आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून २११ गावांच्या योजनांचा कृतीआराखडा तयार करण्यात आला असून सध्या ६१ गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या कामांना सुरूवात करण्यात आली आहे. या विभागाला २०१४-२०१५ मध्ये ४२ गावांतील योजनांची कामे मार्गी लावण्याचे उद्दिष्ट आहे.राष्ट्रीय पेयजल योजनेला लोकवाटा आणि हागणदारीमुक्तीच्या अटीमुळे सुरूवातीचे एक ते दोन वर्ष गती येत नव्हती. वारंवार सूचना देवूनही योजनेला गती येत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर शासनाने लोकवाटा जमा करण्याची अट रद्द करून हागणदारीमुक्तीची अटही काहीप्रमाणात सैैल केली. त्यामुळे आता या योजनेच्या कामांना गती येण्यास सुरूवात केली आहे. पाणीपुरवठा विभागाकडून जिल्हाभरातील २११ गावांतील योजनांचा कृतीआराखडा तयार केला आहे. या योजनांच्या खर्चाचे अंदाजपत्रक ९० कोटीचे आहे. त्यानुसार प्रशासनाला चालू वर्षी किमान ४२ योजनांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु, पाण्याची टंचाई लक्षात घेता प्रशासनाने उद्दिष्टापेक्षा अधिक कामे हाती घेतील आहेत. सध्या ६१ कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, उद्दिष्टापेक्षा जास्तीची कामे सुरू असली तरी भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांतील पाणीपुरवठा योजनांना प्राधान्य देवून कामे तातडीने सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे. असे झाल्यास टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर वा अधिग्रहणावर होणारा खर्च टळणार असून ग्रामस्थांची पायपीटही थांबण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)