शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
4
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
5
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
6
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
7
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
8
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
9
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
10
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
11
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
12
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
13
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
14
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
15
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
16
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
17
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
18
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
19
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
20
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश

गरज नसलेल्या बुलेट ट्रेनला ६ हजार कोटी, तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना छदामही नाही: अंबादास दानवे

By विकास राऊत | Updated: August 10, 2022 15:16 IST

विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपदी अंबादास दानवे यांचे क्रांती चौकात शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले.

औरंगाबाद: महाराष्ट्राला गरज नसलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी राज्य सरकारने ६ हजार कोटी दिले आहेत. मात्र, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना छदामही दिला नाही, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. भाजपने ज्या आमदारांना विरोध केला त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे, यातुने त्यांचा ढोंगीपणा दिसून येत आहे. याविरोधात सामान्य शिवसैनिकांसह रान उठवू असा इशाराही त्यांनी यावेळी  दिला. 

विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपदी अंबादास दानवे यांची निवड झाल्यानंतर त्यांचे आज दुपारी औरंगाबादेत आगमन झाले. क्रांती चौकात शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. दानवे म्हणाले, मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे हे फार्म हाऊस उदघाटन, गद्दाराच्या घरी भेटी देण्यात गुंतले आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. राज्याला गरज नसलेल्या बुलेट ट्रेनला ६ हजार कोटी देण्यात येतात तर शेतकऱ्यांना छदामही दिला नाही,अशी टीका दानवे यांनी केली. तसेच अधिवेशनापूर्वी नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचेही दानवे यांनी जाहीर केले.

भडारा, माहूर येथे महिला अत्याचार घटना घडल्या आहेत. सरकारचा वचक नसल्याने अशा गंभीर घटना घडत आहेत. फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र गद्दाराचा महाराष्ट्र झाला आहे. मंत्रीमंडळातील अब्दुल सत्तार यांचे हात घोटाळ्यात अडकले आहेत, तसेच संजय राठोड यांच्यावर महिला अत्याचाराचे आरोप आहेत. पूर्वी भाजप यांना विरोध करत होती. आता मंत्रिमंडळात घेतले. हा भाजपचा ढोंगीपणा आहे. याविरोधात शिवसेना रान उठवेल असेही दानवे म्हणाले. गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात येईल असेही दानवे म्हणाले.  

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना