शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गरज नसलेल्या बुलेट ट्रेनला ६ हजार कोटी, तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना छदामही नाही: अंबादास दानवे

By विकास राऊत | Updated: August 10, 2022 15:16 IST

विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपदी अंबादास दानवे यांचे क्रांती चौकात शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले.

औरंगाबाद: महाराष्ट्राला गरज नसलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी राज्य सरकारने ६ हजार कोटी दिले आहेत. मात्र, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना छदामही दिला नाही, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. भाजपने ज्या आमदारांना विरोध केला त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे, यातुने त्यांचा ढोंगीपणा दिसून येत आहे. याविरोधात सामान्य शिवसैनिकांसह रान उठवू असा इशाराही त्यांनी यावेळी  दिला. 

विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपदी अंबादास दानवे यांची निवड झाल्यानंतर त्यांचे आज दुपारी औरंगाबादेत आगमन झाले. क्रांती चौकात शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. दानवे म्हणाले, मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे हे फार्म हाऊस उदघाटन, गद्दाराच्या घरी भेटी देण्यात गुंतले आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. राज्याला गरज नसलेल्या बुलेट ट्रेनला ६ हजार कोटी देण्यात येतात तर शेतकऱ्यांना छदामही दिला नाही,अशी टीका दानवे यांनी केली. तसेच अधिवेशनापूर्वी नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचेही दानवे यांनी जाहीर केले.

भडारा, माहूर येथे महिला अत्याचार घटना घडल्या आहेत. सरकारचा वचक नसल्याने अशा गंभीर घटना घडत आहेत. फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र गद्दाराचा महाराष्ट्र झाला आहे. मंत्रीमंडळातील अब्दुल सत्तार यांचे हात घोटाळ्यात अडकले आहेत, तसेच संजय राठोड यांच्यावर महिला अत्याचाराचे आरोप आहेत. पूर्वी भाजप यांना विरोध करत होती. आता मंत्रिमंडळात घेतले. हा भाजपचा ढोंगीपणा आहे. याविरोधात शिवसेना रान उठवेल असेही दानवे म्हणाले. गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात येईल असेही दानवे म्हणाले.  

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना