शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

गरज नसलेल्या बुलेट ट्रेनला ६ हजार कोटी, तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना छदामही नाही: अंबादास दानवे

By विकास राऊत | Updated: August 10, 2022 15:16 IST

विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपदी अंबादास दानवे यांचे क्रांती चौकात शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले.

औरंगाबाद: महाराष्ट्राला गरज नसलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी राज्य सरकारने ६ हजार कोटी दिले आहेत. मात्र, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना छदामही दिला नाही, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. भाजपने ज्या आमदारांना विरोध केला त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे, यातुने त्यांचा ढोंगीपणा दिसून येत आहे. याविरोधात सामान्य शिवसैनिकांसह रान उठवू असा इशाराही त्यांनी यावेळी  दिला. 

विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपदी अंबादास दानवे यांची निवड झाल्यानंतर त्यांचे आज दुपारी औरंगाबादेत आगमन झाले. क्रांती चौकात शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. दानवे म्हणाले, मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे हे फार्म हाऊस उदघाटन, गद्दाराच्या घरी भेटी देण्यात गुंतले आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. राज्याला गरज नसलेल्या बुलेट ट्रेनला ६ हजार कोटी देण्यात येतात तर शेतकऱ्यांना छदामही दिला नाही,अशी टीका दानवे यांनी केली. तसेच अधिवेशनापूर्वी नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचेही दानवे यांनी जाहीर केले.

भडारा, माहूर येथे महिला अत्याचार घटना घडल्या आहेत. सरकारचा वचक नसल्याने अशा गंभीर घटना घडत आहेत. फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र गद्दाराचा महाराष्ट्र झाला आहे. मंत्रीमंडळातील अब्दुल सत्तार यांचे हात घोटाळ्यात अडकले आहेत, तसेच संजय राठोड यांच्यावर महिला अत्याचाराचे आरोप आहेत. पूर्वी भाजप यांना विरोध करत होती. आता मंत्रिमंडळात घेतले. हा भाजपचा ढोंगीपणा आहे. याविरोधात शिवसेना रान उठवेल असेही दानवे म्हणाले. गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात येईल असेही दानवे म्हणाले.  

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना