शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
4
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
5
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
6
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
7
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
8
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
9
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
10
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
11
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
12
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
13
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
14
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
15
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
16
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
17
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
18
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
19
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
20
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

६० टक्के विद्यार्थी वंचित राहणार

By admin | Updated: January 22, 2016 00:20 IST

नजीर शेख , औरंगाबाद राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीचा मोठा गाजावाजा केला असला तरी सुमारे ६० टक्के विद्यार्थ्यांना

नजीर शेख , औरंगाबादराज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीचा मोठा गाजावाजा केला असला तरी सुमारे ६० टक्के विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभच मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे राज्य सरकारची परीक्षा शुल्कमाफीची घोषणा ही फसवी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे. ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी घोषित केलेल्या टंचाईग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासंबंधीचे प्राथमिक आदेश २० आॅक्टोबर २०१६ रोजी देण्यात आले होते. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राज्य शासनाच्या आदेशांचा संदर्भ देऊन १३ जानेवारी २०१६ रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार दुष्काळग्रस्त गावांतील शासकीय व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (ईबीसीधारक) विद्यार्थीच या योजनेसाठी पात्र राहतील. विद्यापीठाने यासाठी उच्च शिक्षण सहसंचालकांच्या पत्राचा संदर्भ दिला आहे. त्याशिवाय १९९३ सालच्या शासन आदेशाचाही संदर्भ देण्यात आला आहे. शिक्षण सहसंचालकांनी केवळ ईबीसी विद्यार्थ्यांनाच परीक्षा फी माफीची सवलत लागू राहील, असे आपल्या आदेशात कुठेही म्हटले नाही; मात्र विद्यापीठाच्या परिपत्रकात ही अट टाकण्यात आली आहे. विनाअनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थी हे मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थांतील विद्यार्थी आहेत. त्यांचे प्रवेशही कायदेशीर आहेत. केवळ शासनाकडे शिक्षणाला पैसा नाही म्हणून हे विद्यार्थी स्वत:च्या खिशाला चाट लावून विनाअनुदानित महाविद्यालयांत प्रवेश घेतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेतली तर ७० टक्के विद्यार्थी हे विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी दुष्काळग्रस्त भागातील असूनही त्यांना परीक्षा फीमाफीचा लाभ मिळणार नाही. काही संस्थाचालकांनी ते विद्यार्थ्यांकडून वसूलही केले आहे. शिक्षण संचालकांनी यासंदर्भात ३ डिसेंबर २०१५ रोजी काढलेल्या आदेशात टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी घेण्यात येऊ नये, असे आदेश काढले असले तरी ते आदेश अनुदानित महाविद्यालयांसाठीच आहेत की, सर्वच महाविद्यालयांसाठी आहेत याचा उलगडा होत नाही. यासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते राहुल तायडे यांनी सांगितले की, दुष्काळग्रस्त विद्यार्थी कोणत्याही महाविद्यालयात शिकत असला तरी त्याची फी माफ व्हावी ही मागणी शासनाने मान्य केली आहे. मात्र, विनाअनुदानित महाविद्यालयांतील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी वसूल करणे अन्यायकारक ठरेल. प्राप्त माहितीनुसार दरवर्षी विद्यापीठाच्या परीक्षांना साडेतीन लाख विद्यार्थी बसतात. यापैकी सुमारे पावणेदोन लाखापेक्षाही अधिक विद्यार्थी हे विनाअनुदानित महाविद्यालयांतील असतात. ४सद्य:स्थितीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यकक्षेत एकूण ३८० महाविद्यालये आहेत. यापैकी १५० महाविद्यालये विनाअनुदानित तत्त्वावरील आहेत. या महाविद्यालयांतील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीचा लाभ मिळणार नाही.