शहरं
Join us  
Trending Stories
1
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
2
Cyclone Ditva: 'दितवाह' चक्रीवादळ भारताच्या दिशेने; श्रीलंकेत ४६ जणांचा बळी, 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा!
3
पैसा तिप्पट करणारी गुंतवणूक! 'या' ५ म्युच्युअल फंडांनी ३ वर्षांत दिले ३१% पेक्षा जास्त रिटर्न!
4
धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी जात असताना डंपर कारवर उलटला, एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
5
पाकिस्तानात जोरदार राडा! खैबर-पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी मारले; इम्रान खान मृत्यू प्रकरण...
6
पुतिन यांच्या भारत दौऱ्याची तारीख ठरली; पीएम मोदींशी ऊर्जा, संरक्षण, व्यापारावर होणार चर्चा
7
Mumbai Rape Case: जाग आली तेव्हा बाजूला बसलेले होते दोन पुरूष, विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक
8
Jara Hatke: चित्ता, बिबट्या आणि जग्वार; तिघांची प्रजाती एकच, पण 'असा' ओळखा फरक 
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: ७ दिवस शक्य नाही, मग ३ दिवसांत गुरुचरित्र पारायण करता येते; कसे? पाहा, नियम
11
स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट
12
दमदार कमाईची संधी! ५४२१ कोटींचा IPO ३ डिसेंबरला उघडणार; जीएमपी-प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
13
वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळणार, संघाचे नेतृत्व 'मराठी मुलगा' करणार !
14
रिलायन्स इंडस्ट्रीजला ५६.४४ कोटी रुपयांची जीएसटी नोटीस, पाहा काय आहे प्रकरण?
15
Maharashtra Crime: प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं?
16
AI च्या मदतीने बनवला एसी लोकल पास, अंबरनाथमधील इंजिनिअर पती- उच्चशिक्षित पत्नीला अटक; दोघे कसे अडकले?
17
Elephant Attack: स्कूटरवरून खेचलं, सोंडेनं उचलून जमिनीवर आपटलं, मग...; हत्तीच्या हल्ल्यात मुलगा ठार
18
संतापजनक! १५ एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज,२२ नोव्हेंबरला पत्नीची हत्या; नेमके प्रकरण काय?
19
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार, स्थगिती नाही: सुप्रीम कोर्ट
20
फायरिंगचा शौक! कपिल शर्मा कॅफे गोळीबार प्रकरणात अटक केलेला बंधू मान सिंह आहे तरी कोण?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात खरिपाची ६० टक्के पेरणी

By admin | Updated: July 2, 2017 00:21 IST

नांदेड : खरीप हंगामाच्या पेरणीला जिल्ह्यात वेग आला असून जिल्हाभरात ३० जूनपर्यंत २ लाख ७८ हजार २०० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : खरीप हंगामाच्या पेरणीला जिल्ह्यात वेग आला असून जिल्हाभरात ३० जूनपर्यंत २ लाख ७८ हजार २०० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. कृषी विभागाकडे प्राप्त अहवालानुसार ३३ टक्के पेरणी झाल्याचे सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात पेरणीचा आकडा ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत गेला आहे़ जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी एकूण ८ लाख २४ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यात खरीप ज्वारीसाठी १ लाख १२ हजार ३०० हेक्टर, उडीद-५० हजार ३०० हेक्टर, मूग-२९ हजार ९०० हेक्टर, तूर- ६९ हजार ८०० हेक्टर, सोयाबीन-१ लाख ९९ हजार हेक्टर तर कापसासाठी ३ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित आहे. त्यापैकी ज्वारी १५ हजार ८०० हेक्टर, उडीद १४ हजार ४०० हेक्टर, मूग १० हजार ९०० हेक्टर, तूर २० हजार ५०० हेक्टर, सोयाबीन १ लाख १० हजार १०० हेक्टर तर कापसाची १ लाख ६ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. तालुकानिहाय पेरणी अशी नांदेड- २८०० हेक्टर १० टक्के, लोहा- ४३ हजार १०० हेक्टर ५० टक्के, भोकर- २०९०० हेक्टर ३० टक्के, देगलूर- ३३ हजार ९०० हेक्टर ७० टक्के, मुदखेड- १४ हजार ९०० हेक्टर ६० टक्के, हिमायतनगर- ९४०० हेक्टर ३० टक्के, नायगाव- २२ हजार १०० हेक्टर ५० टक्के, तालुक्यात ९ हजार ९०० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. असा पेरणीचा अहवाल कृषी विभागाकडे असला तरी प्रत्यक्ष पेरणी मात्र जास्त हेक्टरवर झाली आहे. मात्र आजपर्यंत बिलोली-३७ हजार ५०० हेक्टर ११० टक्के, मुखेड-०० कंधार-१७ हजार हेक्टर ३० टक्के, हदगाव-००, कनवट-३६ हजार ६०० हेक्टर ४० टक्के, माहूर-०० धर्माबाद-२१ हजार ७०० हेक्टर ७० टक्के, उमरी -०० तर अर्धापूर तालुक्यात १७ हजार ८०० हेक्टरवर ८० टक्के एवढी पेरणी झाली आहे. मात्र प्रत्यक्षात कृषी विभागाच्या अहवालापेक्षा जास्त हेक्टरवर पेरणी झालेली आहे.गतवर्षी समाधानकारक पेरणीयोग्य पाऊस झाल्याने खरीप हंगामात ३० जून पर्यंत कृषी विभागाच्या अहवालानुसार ४ लाख ४७ हजार हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती. एकूण क्षेत्राच्या ५४ टक्के प्रमाण होते. तालुकानिहाय- नांदेड तालुका-१८ हजार हेक्टर (५६.४२) टक्के, अर्धापूर- ९६०० हेक्टर (४२.२९) टक्के, मुदखेड-१५७०० हेक्टर (६६.६८) टक्के, लोहा-५६ हजार ९०० हेक्टर (६५.४३) टक्के, कंधार-४५ हजार ५०० हेक्टर ७०.२१ टक्के, देगलूर-३५ हजार ६०० हेक्टर ७८.६८ टक्के, मुखेड- ००, नायगाव-२२ हजार २०० हेक्टर ४६.८३ टक्के, बिलोली-३८ हजार ३०० हेक्टर ११५ टक्के, धर्माबाद-२५ हजार ३०० हेक्टर ८१.८१ टक्के, किनवट-६० हजार १०० हेक्टर ७३ टक्के, माहुर-३१ हजार २०० हेक्टर ५१.६६ टक्के, हदगाव-४३ हजार ३०० हेक्टर ५१.८१ टक्के, हिमायतनगर-१५ हजार ३०० हेक्टर ४०.५८ टक्के, भोकर-२२ हजार ६०० हेक्टर ३४.३५ टक्के, उमरी- ६६०० हेक्टर २२.५२ टक्के याप्रमाणे पेरणी करण्यात आली होती.