शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

जिल्ह्यात खरिपाची ६० टक्के पेरणी

By admin | Updated: July 2, 2017 00:21 IST

नांदेड : खरीप हंगामाच्या पेरणीला जिल्ह्यात वेग आला असून जिल्हाभरात ३० जूनपर्यंत २ लाख ७८ हजार २०० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : खरीप हंगामाच्या पेरणीला जिल्ह्यात वेग आला असून जिल्हाभरात ३० जूनपर्यंत २ लाख ७८ हजार २०० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. कृषी विभागाकडे प्राप्त अहवालानुसार ३३ टक्के पेरणी झाल्याचे सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात पेरणीचा आकडा ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत गेला आहे़ जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी एकूण ८ लाख २४ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यात खरीप ज्वारीसाठी १ लाख १२ हजार ३०० हेक्टर, उडीद-५० हजार ३०० हेक्टर, मूग-२९ हजार ९०० हेक्टर, तूर- ६९ हजार ८०० हेक्टर, सोयाबीन-१ लाख ९९ हजार हेक्टर तर कापसासाठी ३ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित आहे. त्यापैकी ज्वारी १५ हजार ८०० हेक्टर, उडीद १४ हजार ४०० हेक्टर, मूग १० हजार ९०० हेक्टर, तूर २० हजार ५०० हेक्टर, सोयाबीन १ लाख १० हजार १०० हेक्टर तर कापसाची १ लाख ६ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. तालुकानिहाय पेरणी अशी नांदेड- २८०० हेक्टर १० टक्के, लोहा- ४३ हजार १०० हेक्टर ५० टक्के, भोकर- २०९०० हेक्टर ३० टक्के, देगलूर- ३३ हजार ९०० हेक्टर ७० टक्के, मुदखेड- १४ हजार ९०० हेक्टर ६० टक्के, हिमायतनगर- ९४०० हेक्टर ३० टक्के, नायगाव- २२ हजार १०० हेक्टर ५० टक्के, तालुक्यात ९ हजार ९०० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. असा पेरणीचा अहवाल कृषी विभागाकडे असला तरी प्रत्यक्ष पेरणी मात्र जास्त हेक्टरवर झाली आहे. मात्र आजपर्यंत बिलोली-३७ हजार ५०० हेक्टर ११० टक्के, मुखेड-०० कंधार-१७ हजार हेक्टर ३० टक्के, हदगाव-००, कनवट-३६ हजार ६०० हेक्टर ४० टक्के, माहूर-०० धर्माबाद-२१ हजार ७०० हेक्टर ७० टक्के, उमरी -०० तर अर्धापूर तालुक्यात १७ हजार ८०० हेक्टरवर ८० टक्के एवढी पेरणी झाली आहे. मात्र प्रत्यक्षात कृषी विभागाच्या अहवालापेक्षा जास्त हेक्टरवर पेरणी झालेली आहे.गतवर्षी समाधानकारक पेरणीयोग्य पाऊस झाल्याने खरीप हंगामात ३० जून पर्यंत कृषी विभागाच्या अहवालानुसार ४ लाख ४७ हजार हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती. एकूण क्षेत्राच्या ५४ टक्के प्रमाण होते. तालुकानिहाय- नांदेड तालुका-१८ हजार हेक्टर (५६.४२) टक्के, अर्धापूर- ९६०० हेक्टर (४२.२९) टक्के, मुदखेड-१५७०० हेक्टर (६६.६८) टक्के, लोहा-५६ हजार ९०० हेक्टर (६५.४३) टक्के, कंधार-४५ हजार ५०० हेक्टर ७०.२१ टक्के, देगलूर-३५ हजार ६०० हेक्टर ७८.६८ टक्के, मुखेड- ००, नायगाव-२२ हजार २०० हेक्टर ४६.८३ टक्के, बिलोली-३८ हजार ३०० हेक्टर ११५ टक्के, धर्माबाद-२५ हजार ३०० हेक्टर ८१.८१ टक्के, किनवट-६० हजार १०० हेक्टर ७३ टक्के, माहुर-३१ हजार २०० हेक्टर ५१.६६ टक्के, हदगाव-४३ हजार ३०० हेक्टर ५१.८१ टक्के, हिमायतनगर-१५ हजार ३०० हेक्टर ४०.५८ टक्के, भोकर-२२ हजार ६०० हेक्टर ३४.३५ टक्के, उमरी- ६६०० हेक्टर २२.५२ टक्के याप्रमाणे पेरणी करण्यात आली होती.