शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

साठ कोटींची मदत वाटप

By admin | Updated: February 6, 2015 00:55 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीपोटी शासनाकडून पहिल्या टप्प्यात ७३ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

उस्मानाबाद : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीपोटी शासनाकडून पहिल्या टप्प्यात ७३ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ३३२ गावांतील १ लाख ५४ हजारांवर शेतकऱ्यांना यातील ६० कोटी ५१ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.जिल्ह्यात ७३७ गावे असून यातील ३६२ गावे खरिपाची तर ३७५ रबीची आहेत. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. तसेच सोयाबीन पिकांचे उत्पन्न ७० टक्यांनी घटले होते. जिल्ह्यात खरीप पिकांची पैसेवारी ४४ पैसे जाहीर करण्यात आली होती. ३१८ गावातील पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी असल्याने शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १७६ कोटी ४७ लाख रुपयांची मागणी प्रशासनांच्या वतीने करण्यात आली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात ७३ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान प्रशासनाला १२ जानेवारी रोजी प्राप्त झाले होते. सात तालुक्यातील ३३२ गावातील १ लाख ५४ हजार १३१ शेतकऱ्यांना ६० कोटी ५१ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्रीधर तांबे यांनी दिली. (प्रतिनिधी)