शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

साठ कोटींची मदत वाटप

By admin | Updated: February 6, 2015 00:55 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीपोटी शासनाकडून पहिल्या टप्प्यात ७३ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

उस्मानाबाद : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीपोटी शासनाकडून पहिल्या टप्प्यात ७३ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ३३२ गावांतील १ लाख ५४ हजारांवर शेतकऱ्यांना यातील ६० कोटी ५१ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.जिल्ह्यात ७३७ गावे असून यातील ३६२ गावे खरिपाची तर ३७५ रबीची आहेत. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. तसेच सोयाबीन पिकांचे उत्पन्न ७० टक्यांनी घटले होते. जिल्ह्यात खरीप पिकांची पैसेवारी ४४ पैसे जाहीर करण्यात आली होती. ३१८ गावातील पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी असल्याने शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १७६ कोटी ४७ लाख रुपयांची मागणी प्रशासनांच्या वतीने करण्यात आली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात ७३ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान प्रशासनाला १२ जानेवारी रोजी प्राप्त झाले होते. सात तालुक्यातील ३३२ गावातील १ लाख ५४ हजार १३१ शेतकऱ्यांना ६० कोटी ५१ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्रीधर तांबे यांनी दिली. (प्रतिनिधी)