शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

५४३ मूर्तीचे विसर्जन; उत्सवाची सांगता

By admin | Updated: October 6, 2014 00:12 IST

हिंगोली : लाडक्या गणरायास निरोप दिल्यानंतर लगेचच भक्तांनी दुर्गा महोत्सवाची तयारी केली होती. त्यानुसार जिल्हाभरात ५४३ दुर्गा देवी मुर्तीची स्थापना करण्यात आली होती.

हिंगोली : लाडक्या गणरायास निरोप दिल्यानंतर लगेचच भक्तांनी दुर्गा महोत्सवाची तयारी केली होती. त्यानुसार जिल्हाभरात ५४३ दुर्गा देवी मुर्तीची स्थापना करण्यात आली होती. नवरात्रात अखंड सेवा केल्यानंतर शनिवारी भाविकांनी दुर्गा मातेस भावपूर्ण निरोप दिला. ‘डीजे’ऐवजी यंदा बहुतांश मंडळांनी पारंपरिक मिरवणूकीला प्राधान्य दिले. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मंडळांकडून विशेष तयारी करण्यात आली होती. गतवर्षीपेक्षा यंदा अधिक चांगल्या पद्धतीने सजावट करण्यात आली होती. हिंगोली शहरातील सर्वच मंडळांनी आकर्षक मखराची उभारणी केली होती. शिवाय मुर्तीही निरनिराळ्या ठिकाणांहून मागवल्या होत्या; परंतु यंदा मूर्तीस्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत वाद्यांचा आवाज कानी पडला नाही. सुरूवातीला बँण्ड वाद्यानेच मिरवणूक काढून मुर्ती स्थापना केली. अगदी शेवटच्या दिवशीही तेच चित्र पहावयास मिळाले. पहिल्यांदाच डीजेचा वापर करण्यात आला नाही. पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणुकीवर अधिक भर देण्यात आला होता. बहुतांश मंडळांनी बँण्डलाच पसंती दिली होती. काही मंडळांनी टाळ, मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढली. हिंगोली शहरातील ३७ मंडळांकडून उत्साहात मिरवणूक काढली. बहुतांश मंडळांनी मूर्तींचे जलेश्वर तलावात विसर्जन केले. दुसरीकडे औंढा येथे १६ मंडळांनी पारंपरिक पद्धतीने विसर्जन केले. वसमत, सेनगाव, कळमनुरी, शिरडशहापूर येथेही अगदी शांततेत मिरवणुका निघाल्या. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ३६ मूर्तींची स्थापनाहिंगोली शहरात ३६ मंडळांकडून दुर्गा मुर्तींची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाभरात यंदा केवळ १० मंडळांनीच शारदा देवीच्या मुर्तीची स्थापना केली आहे. हिंगोलीत इंदिरा गांधी चौकातील त्रिशूल नवदुर्गा मंडळ, राजहंस दूर्गा मंडळ, रिसाला बाजार, गाडीपुरा, जवाहर रोड, गोलंदाज गल्लीत आकर्षक मूर्ती पहावयास मिळाल्या. सवाद्य मिरवणूक काढून मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. डांगे याचे व्याख्यानहिंगोली : शहरातील बियाणी नगर भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी उत्सवानिमित्त शेषाद्री डांगे यांचे व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमास डॉ. विठ्ठल रोडगे, शिलचंद्र देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना डांगे यांनी स्वयंसेवक कसा असावा? याचे विवेचन केले. देशात महिलांचा सन्मान झाला पाहिजे. त्यांना निर्भयपणे वावरण्याची, काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. मात्र काही अराष्ट्रीय शक्ती त्याला खोडा घालत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय चारित्राची माणसे घडविण्याची खरी गरज आहे. शिवाजी महाराजांनी ज्या प्रमाणे मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या प्रमाणे स्वयंसेवकांमार्फत सुराज्य स्थापनेसाठी प्रयत्न केले जात असल्याचे डांगे म्हणाले. औरंगाबाद येथे आयोजित महासंगम कार्यक्रमास जिल्ह्यातील स्वयंसेवकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही केले. विजयादशमीनिमित्त स्वयंसेवकांनी शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन केले. (प्रतिनिधी)