शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

५४३ मूर्तीचे विसर्जन; उत्सवाची सांगता

By admin | Updated: October 6, 2014 00:12 IST

हिंगोली : लाडक्या गणरायास निरोप दिल्यानंतर लगेचच भक्तांनी दुर्गा महोत्सवाची तयारी केली होती. त्यानुसार जिल्हाभरात ५४३ दुर्गा देवी मुर्तीची स्थापना करण्यात आली होती.

हिंगोली : लाडक्या गणरायास निरोप दिल्यानंतर लगेचच भक्तांनी दुर्गा महोत्सवाची तयारी केली होती. त्यानुसार जिल्हाभरात ५४३ दुर्गा देवी मुर्तीची स्थापना करण्यात आली होती. नवरात्रात अखंड सेवा केल्यानंतर शनिवारी भाविकांनी दुर्गा मातेस भावपूर्ण निरोप दिला. ‘डीजे’ऐवजी यंदा बहुतांश मंडळांनी पारंपरिक मिरवणूकीला प्राधान्य दिले. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मंडळांकडून विशेष तयारी करण्यात आली होती. गतवर्षीपेक्षा यंदा अधिक चांगल्या पद्धतीने सजावट करण्यात आली होती. हिंगोली शहरातील सर्वच मंडळांनी आकर्षक मखराची उभारणी केली होती. शिवाय मुर्तीही निरनिराळ्या ठिकाणांहून मागवल्या होत्या; परंतु यंदा मूर्तीस्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत वाद्यांचा आवाज कानी पडला नाही. सुरूवातीला बँण्ड वाद्यानेच मिरवणूक काढून मुर्ती स्थापना केली. अगदी शेवटच्या दिवशीही तेच चित्र पहावयास मिळाले. पहिल्यांदाच डीजेचा वापर करण्यात आला नाही. पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणुकीवर अधिक भर देण्यात आला होता. बहुतांश मंडळांनी बँण्डलाच पसंती दिली होती. काही मंडळांनी टाळ, मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढली. हिंगोली शहरातील ३७ मंडळांकडून उत्साहात मिरवणूक काढली. बहुतांश मंडळांनी मूर्तींचे जलेश्वर तलावात विसर्जन केले. दुसरीकडे औंढा येथे १६ मंडळांनी पारंपरिक पद्धतीने विसर्जन केले. वसमत, सेनगाव, कळमनुरी, शिरडशहापूर येथेही अगदी शांततेत मिरवणुका निघाल्या. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ३६ मूर्तींची स्थापनाहिंगोली शहरात ३६ मंडळांकडून दुर्गा मुर्तींची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाभरात यंदा केवळ १० मंडळांनीच शारदा देवीच्या मुर्तीची स्थापना केली आहे. हिंगोलीत इंदिरा गांधी चौकातील त्रिशूल नवदुर्गा मंडळ, राजहंस दूर्गा मंडळ, रिसाला बाजार, गाडीपुरा, जवाहर रोड, गोलंदाज गल्लीत आकर्षक मूर्ती पहावयास मिळाल्या. सवाद्य मिरवणूक काढून मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. डांगे याचे व्याख्यानहिंगोली : शहरातील बियाणी नगर भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी उत्सवानिमित्त शेषाद्री डांगे यांचे व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमास डॉ. विठ्ठल रोडगे, शिलचंद्र देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना डांगे यांनी स्वयंसेवक कसा असावा? याचे विवेचन केले. देशात महिलांचा सन्मान झाला पाहिजे. त्यांना निर्भयपणे वावरण्याची, काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. मात्र काही अराष्ट्रीय शक्ती त्याला खोडा घालत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय चारित्राची माणसे घडविण्याची खरी गरज आहे. शिवाजी महाराजांनी ज्या प्रमाणे मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या प्रमाणे स्वयंसेवकांमार्फत सुराज्य स्थापनेसाठी प्रयत्न केले जात असल्याचे डांगे म्हणाले. औरंगाबाद येथे आयोजित महासंगम कार्यक्रमास जिल्ह्यातील स्वयंसेवकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही केले. विजयादशमीनिमित्त स्वयंसेवकांनी शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन केले. (प्रतिनिधी)