शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

यू डायसची ५३ उर्दू शाळांना मान्यता!

By admin | Updated: June 5, 2016 00:30 IST

जालना : जिल्हातील जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या जिल्ह्यातील ५३ उर्दू शाळा आत्ता स्वतंत्र करण्यात आल्या असून

जालना : जिल्हातील जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या जिल्ह्यातील ५३ उर्दू शाळा आत्ता स्वतंत्र करण्यात आल्या असून, आत्ता उर्दू शाळांना स्वतंत्र मुख्याध्यापकासह शाळा अनुदान, देखभाल दुरूस्ती अनुदान आदी मिळणार असल्याने या शाळांतील विद्यार्थ्यांची यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिकच्या २ हजार मराठी माध्यमाच्या शाळा आहेत.त्यात आत्ता ५३ उर्दू माध्यमाच्या शाळांची नव्याने भर पडली आहे. अनेक वर्षांपासून मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापकाच्या अधिपत्याखाली उर्दू शाळांची वाटचाल सुरू होती. परिणामी उर्र्दू माध्यमाच्या शाळांना नेहमीच सापत्न वागणूक मिळत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. मराठी माध्यमाचा मुख्याध्यापक असल्याने त्यांना उर्र्दूचे ज्ञानच नसल्याने शाळेत उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कशी होत आहे. याकडे त्यांचे कायम दुर्लक्ष व्हायचे आत्ता उर्दू माध्यमाची शाळा पूर्णता स्वंतत्र झाल्याने मुख्याध्यापक ही आत्ता उर्दू माध्यमातील असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे.जिल्ह्यातील ५३ उर्दू माध्यमाच्या शाळा आत्ता स्वतंत्र झाल्याने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या योग्य त्या गतीने शैक्षणिक विकास होणार असल्याचे उपशिक्षणाधिकारी अशोक राऊत यांनी सांगितले. मराठी शाळांपासून उर्दू शाळांना स्वंतत्र करणे यासाठी शासनस्तरावर अनेक वेळा पाठपुरावा करावा लागला. शाळांना यू डायसकडून नंबर मिळविण्याचे आव्हान होते. परंतु शिक्षणविभागाकडून करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे तब्बल ५३ शाळांना स्वतंत्र करण्यात यश आले. राज्यातला हा पहिलाच प्रयोग असल्याचे राऊत म्हणाले. जालना तालुक्यातील एकरा, बदनापूर येथील चार, अंबड येथील पाच, घनसावंगी पाच, परतूर येथील सात, मंठा दोन, भोकरदन एक आणि जाफराबाद येथील चार शाळांना मराठी शाळांमधून वेगळी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आत्ता तब्बल ५३ मुख्याध्यापकांची नियुक्ती सुध्दा शिक्षण विभागाला करावी लागणार आहे.जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. उर्दू भाषेचे ज्ञान असणारे अधिकारी, कर्मचारी शाळांचे मुल्यमापन करतील. त्यामुळे त्यांना भेडसावणाऱ्या समस्या समजेल त्याचे निराकरण होईल. त्यामुळे निश्चितच हा निर्णय चांगला आहे. भाषेच्या अडचणीमुळे त्यांचे म्हणावे तसे लक्ष नसायचे आत्ता तसे होणार नाही, असे मोहम्मद इफ्तीकारूद्दीन म्हणाले.